Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water News: तापमान वाढीमुळे भूजल पातळीत घट; तलाव,विहिरींची पाणीपातळी खालावली

जत तालुका अतिशय कमी पर्जन्यमानाच्या भागात मोडतो. दरवर्षी मर्यादित पावसामुळेच येथे पाणीटंचाई जाणवते. मात्र यंदाच्या वर्षीचा उन्हाळा विशेषतः तापदायक ठरत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 17, 2025 | 02:35 AM
Water News: तापमान वाढीमुळे भूजल पातळीत घट; तलाव,विहिरींची पाणीपातळी खालावली
Follow Us
Close
Follow Us:

जत/जॉकेश आदाटे: उन्हाची तीव्रता प्रचंड वाढू लागली आहे. जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आल्याचे दिसून येत आहे, एप्रिल महिन्याच्या मध्यावर उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. या उष्णतेमुळे जमिनीतील पाणी अधिक वेगाने कमी होत असून, याचा थेट परिणाम भूजल पातळीवर होत आहे. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये विहिरी, बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहेत, नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा देखील तीव्र तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे विहीर, कुपनलिका पुनर्भरणाच्या उपाययोजना तातडीने राबवा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

जत तालुका अतिशय कमी पर्जन्यमानाच्या भागात मोडतो. दरवर्षी मर्यादित पावसामुळेच येथे पाणीटंचाई जाणवते. मात्र यंदाच्या वर्षीचा उन्हाळा विशेषतः तापदायक ठरत असून, सध्याच्या वातावरणात दिवसागणिक तापमान वाढत आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार पुढील काही दिवस तापमान ४२ ते ४४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तालुक्यातील सोन्याळ, माडग्याळ, जाडरबोबलाद, उटगी, उमदी, संख आदी गावांमध्ये भूजल पातळी ९०० ते १००० फुटांपेक्षा खाली गेली आहे. शेतकऱ्यांनी खोदलेल्या बोअरवेलमधूनही आता पाणी येणे मंदावले आहे. काही ठिकाणी पाण्यासाठी बोअर ३ ते ४ वेळा खोदण्यात आल्या, तरीही पाणी लागत नाही, अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाणीटंचाईचा थेट परिणाम शेती आणि पाळीव जनावरांवर होत आहे.

काही शेतकऱ्यांनी भाजीपाला, ऊस व आदी फळपिकांची लागवड केली होती. मात्र पाण्याअभावी पीक करपण्याच्या अवस्थेत आहेत. जनावरांच्या पाण्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागत असून काही गावांमध्ये पाण्याच्या खासगी टँकरने पिण्यासाठी व जनावरांना पाणी घ्यावे लागत आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढली आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक जलसाठा सिंचन प्रकल्पांमध्ये दिसत असला, तरी गेल्या महिनाभरात यात झपाट्याने घट झाल्याचे दिसून येते आहे. जत तालुक्यात पाण्यासाठी एकूण २७ प्रकल्प राबवले जात आहेत. त्यामध्ये एकूण ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन महिन्यात पाणी जपून वापरावे लागणार आहे.

जत शहरात देखील प्रचंड पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जत शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या बिर्नाळ तलावात मुबलक पाणीसाठा असला तरी जत शहराला आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल सुरू आहेत. परिणामी नागरिकांना टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.

Web Title: Water levels have decreased as summer heat increases in the jat taluka maharashtra weather news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Jat taluka
  • Maharashtra Weather
  • water news

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांचे पीक अन् मेहनत गेली वाहून…! सरकारने पूरग्रस्तांची तातडीने मदत करावी हीच अपेक्षा
1

शेतकऱ्यांचे पीक अन् मेहनत गेली वाहून…! सरकारने पूरग्रस्तांची तातडीने मदत करावी हीच अपेक्षा

“अतिवृष्टीग्रस्तांचे सरसकट पंचनामे करत तातडीने मदत करा, अन्यथा.. खासदार प्रणिती शिंदे यांचा इशारा
2

“अतिवृष्टीग्रस्तांचे सरसकट पंचनामे करत तातडीने मदत करा, अन्यथा.. खासदार प्रणिती शिंदे यांचा इशारा

Sharad Pawar News : अशी अतिवृष्टी याआधी पाहिली नव्हती…; माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी राज्य सरकारला दिला मोठा सल्ला
3

Sharad Pawar News : अशी अतिवृष्टी याआधी पाहिली नव्हती…; माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी राज्य सरकारला दिला मोठा सल्ला

बुलडाण्यात मुसळधार पाऊस; शिरपूर येथे तासाभरात 75 मिमी पावसाची नोंद, शेतात पाणीच पाणी
4

बुलडाण्यात मुसळधार पाऊस; शिरपूर येथे तासाभरात 75 मिमी पावसाची नोंद, शेतात पाणीच पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.