Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुसळधार पावसामुळे  ओल्या दुष्काळाचे संकट ; उभ्या पिकांमध्ये पाणी साचल्याने चिंता वाढली

गेली आठवडाभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी साचून शेतकऱ्यांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • By Aparna
Updated On: Jul 14, 2022 | 04:45 PM
मुसळधार पावसामुळे  ओल्या दुष्काळाचे संकट ; उभ्या पिकांमध्ये पाणी साचल्याने चिंता वाढली
Follow Us
Close
Follow Us:

ओतूर : गेली आठवडाभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी साचून शेतकऱ्यांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गेली काही रात्रंदिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिल्हेवाडी, उदापूर, नेतवड, माळवाडी, डिंगोरे, बल्लाळवाडी, ठिकेकरवाडी, हिवरेखुर्द, ओझर आदी गावातील शेतकऱ्यांंच्या शेतात उभ्या पिकात पाणी साचल्याने काकडी, मिरची, सिमला मिरची, टोमँटो, मेथी, कोथिंबीर, भेंडी, गवार आदी पिकांचे पुर्णता नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांंनी काबाडकष्ट करून पिकांसाठी खते व फवारणीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे.शेतात पाणी साचल्याने उभी पिक सोडून देण्याची वेळ आली आहे, तर अति पावसामुळे पिके सडून गेलेली आहे.

पिकांवर बुरशीजन्य रोग
तसेच काही पिकांवर बुरशीजन्य रोग पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.गेली आठवडाभर रात्रंदिवस सूरू असलेला पाऊस कुठे थांबायचं नाव घेत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांनी पिकांसाठी केलेला लाखो रूपयांचा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झालेली आहे.

कांदाचाळीत पावसाचे पाणी
तसेच शेतकऱ्यांनी कांदा साठवण्यासाठी तयार केलेल्या कांदाचाळीत पावसाचे पाणी शिरल्याने कांदा सडून कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली असून शेतात पाणी साचले आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर शेतकऱ्यांवर तुबार पेरणीचे संकट येईल.

भात शेतीचे मोठे नुकसान
तसेच जुन्नर तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील कोपरे, मांडवे, मुथाळणे, मढ, खुबी, पिंपळगाव जोगा, खिरेश्वर ह्या भागातील आदिवासी शेतकऱ्यांचे भात शेतीचे मोठे पीक असते.  या भागात गेल्या आठवड्यापासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे येथील शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत होऊन धो -धो पावसामुळे भात खाचरे वाहून गेली.

शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
तसेच भात लावणीसाठी तयार झालेली रोपे देखील वाहून गेल्याने या शेतकऱ्यांपुढे चिंता ओढवली आहे. मुसळधार पावसामुळे ओढे, नद्या, नाल्यांना पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या विहिरींच्या पाण्याची पातळीत वाढ होणार आहे. बळीराजा पावसामुळे सुखावला असला तरी, अतिवृष्टी मुळे होणाऱ्या शेतीमालाच्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.

Web Title: Wet drought crisis due to heavy rains water logging in standing crops added to the concern nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2022 | 04:44 PM

Topics:  

  • heavy rains
  • water logging

संबंधित बातम्या

राजस्थान, हिमाचलसह देशातील 14 राज्यांत पावसाचा हाहा:कार; नद्या-नाले ‘ओव्हरफ्लो’, पुढील पाच दिवस…
1

राजस्थान, हिमाचलसह देशातील 14 राज्यांत पावसाचा हाहा:कार; नद्या-नाले ‘ओव्हरफ्लो’, पुढील पाच दिवस…

राज्यावर अस्मानी संकट; अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात
2

राज्यावर अस्मानी संकट; अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

राज्यातील विविध भागांत धुवाधार पाऊस; पुणे, रत्नागिरी, मुंबईसह सांगलीला पावसानं झोडपलं
3

राज्यातील विविध भागांत धुवाधार पाऊस; पुणे, रत्नागिरी, मुंबईसह सांगलीला पावसानं झोडपलं

Rain Update : राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज; सातारा, कोल्हापूरसह रत्नागिरीला तर…
4

Rain Update : राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज; सातारा, कोल्हापूरसह रत्नागिरीला तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.