Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काश्मीरमधील 3 दिवसांत 3 हल्ल्यांना जबाबदार कोण? उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींवर टीकास्र!

Uddhav Thackrey on PM Modi in Marathi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ईशान्येकडील राज्यातील परिस्थितीवर केलेल्या भाष्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला जाणार का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 12, 2024 | 03:43 PM
काश्मीरमधील 3 दिवसांत 3 हल्ल्यांना जबाबदार कोण? उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींवर टीकास्र!
Follow Us
Close
Follow Us:

लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्यातील सर्व पक्षांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले. त्यातच मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून प्रश्नोत्तरांची फेरी सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी ईशान्येकडील राज्यातील परिस्थितीवर केलेल्या भाष्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला जाणार का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर जमिनीच्या पातळीवर काय फरक पडला आहे, असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदे केला.

पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देणार?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख भागवत यांनी सोमवारी मणिपूरमध्ये वर्षभरानंतरही शांतता नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हणाले की, संघर्षग्रस्त ईशान्येकडील राज्यातील परिस्थितीचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. यासंदर्भात पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देणार? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

‘मला देशाच्या भविष्याची काळजी वाटते’

मला एनडीए सरकारच्या भवितव्याची नाही तर देशाच्या भवितव्याची चिंता वाटत असल्याचे शिवसेना (यूबीटी) नेत्याने म्हटले आहे. शिवसेना (यूबीटी), काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) यांचा समावेश असलेल्या विरोधी महाविकास आघाडीमध्ये आगामी राज्य विधान परिषदेच्या चार मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांवर कोणतेही मतभेद नसल्याचेही ते म्हणाले. तसेच ही कुणाची जबाबदारी आहे? आता अब की बारवाले कुठे गेले? आताही पंतप्रधान, गृहमंत्री तिथे जाणार नाही का? काश्मीरमध्ये काय फरक पडला? लोकांचे जीव तर अजूनही जात आहेतच. तीन दिवसांत तीन हल्ले झाले काश्मीरमध्ये. याला जबाबदार कोण? जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यावरून उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींवर टीकास्र केलं आहे.

Web Title: Will pm narendra modi visit violence hit jammu and kashmir manipur uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2024 | 03:43 PM

Topics:  

  • uddhav thackrey

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.