(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूडमध्ये दोन नवीन कलाकार पदार्पण करत आहेत. तेही स्टार किड्स. चित्रपटाची चर्चा होणे स्वाभाविक आहे. अजय देवगण, राशा थडानी आणि अमन देवगण स्टारर ‘आझाद’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चित्रपटालाही चांगले प्रतिसाद मिळत आहेत. हा चित्रपट अॅक्शन, ड्रामा, आयटम नंबर आणि डोळ्यांना धक्का देणारे दृश्यांचे उत्तम मिश्रण आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही थिएटरमध्ये जात असाल तर चित्रपटाचा रिव्ह्यू जाणून घेऊयात.
चित्रपटाची कथा
चित्रपटाची कथा ब्रिटिश राजवटीच्या काळात घडते. १९२० मध्ये, जग खूप वेगळे होते यावरच आधारित चित्रपट आहे. जिथे गोविंद (अमन देवगण) हा एक गावठी मुलगा आहे जो घोड्यांवर खूप प्रेम करतो. एके दिवशी, गोविंद आझादला भेटतो जो विक्रम सिंग (अजय देवगण) चा घोडा आहे. यामुळे गोविंदची विक्रमशी ओळख होते. गोविंदला आझाद परत मिळवायचा आहे, कथेत असेच काहीतरी घडते जेव्हा आझादची काळजी घेण्याची जबाबदारी गोविंदवर सोपवली जाते. दुसरीकडे, राशा जानकी देवीची भूमिका साकारत आहे जी एका जमीनदाराची मुलगी आहे. चित्रपटात नंतर, गोविंग आणि जानकी देखील जवळ येतात.
अभिनय आणि कामगिरी
या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या राशा आणि अमन यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. चित्रपट पाहून असे वाटत नाही की हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. दोघांचेही काम चांगले आणि सुंदर आहे. दोघांच्याही अभिनयात प्रामाणिकपणाची भावना आहे, जी छान दिसते. तर अजय देवगण बागीच्या शैलीत खूप छान दिसत आहे. तो सर्व अभिनय फक्त डोळ्यांनी करतो. डायना पँटी आणि पियुष मिश्रा यांनीही चांगले काम केले आहे. या चित्रपटाची कथा खूपच सुंदर आहे. तसेच प्रेक्षकांना ती खूप आडवली आहे.
दिग्दर्शन आणि छायांकन
या चित्रपटाची छायांकन क्षमताही चांगली आहे. चित्रपटाची पटकथा चांगली आहे आणि ती चांगल्या गतीने पुढे जाते आणि छायांकन सुंदर आहे. बऱ्याच दृश्यांमध्ये संवादांशिवायही बरेच काही व्यक्त होताना या चित्रपटामध्ये दिसले आहे. त्याच वेळी, काही दृश्ये खूप भावनिक दिसत आहेत. चित्रपटाचे एडिटिंगही चांगले आहे. चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत प्रेक्षकांच्या पसंतीस आले आहे. चित्रपटात VFX देखील आहे, जे त्रासदायक नाही. एकंदरीत, अभिषेक कपूरचे दिग्दर्शन खूप उत्कृष्ट आहे. जे लोकांना आवडत आहे.
Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यानंतर शिल्पाने नम्रता आणि महेश बाबूने साथ न दिल्याबद्दल तोडले मौन
प्रेक्षकांनी चित्रपट पहावा की नाही?
या चित्रपटातील कलाकारांमधून तुम्हाला एक नवीन ऊर्जा पाहायला मिळणार आहे, चित्रपटाची कास्टिंग देखील खूपच अनोखी आहे. चांगल्या अनुभवासाठी तुम्ही हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नक्कीच पाहू शकता. हा चित्रपट पाहिल्याने तुम्हाला नक्कीच नवीन अनुभव मिळेल आणि आनंद होईल.