(फोटो सौजन्य-Social Media)
टीव्हीवरील सगळ्यात नंबर 1 मालिका अनुपमा सर्व प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. राजन शाहीची ही मालिका गेल्या काही वर्षांपासून टॉपवर आहे. या शोला टीआरपीच्या सिंहासनावरून आजपर्यंत कोणीही हटवू शकले नाही. अनुपमा असो की अनुज किंवा वनराज या मालिकेमधील प्रत्येक पात्र प्रसिद्ध आहे. आणि प्रेक्षकांच्या पसंतीस आहे. 2020 मध्ये ‘अनुपमा’ सुरू झाली. पारस कलनावतसारख्या अनेक स्टार्सनी या मालिकेचा निरोप घेतला आहे. अलीकडेच अशी बातमी आली होती की अनुज उर्फ गौरव खन्ना आणि ‘अनुपमा’ रुपाली गांगुली देखील लीपनंतर शो सोडणार आहेत, परंतु राजन शाही यांनी या सर्व अफवा अभिनेत्याने स्वतःच केला असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
आता ‘अनुपमा’वर ‘वनराज’ची सावली फिरणार नाही.
या शोमध्ये वनराजची भूमिका अभिनेता सुधांशू पांडे याने साकारली होती, जेव्हा ही मालिका नवीन असताना त्याच्याशी संबंधित होती. मालिकेमध्ये ‘अनुपमा’चा हा पहिला नवरा दाखवण्यात आला आहे. शोमधील त्याची व्यक्तिरेखा थोडी नकारात्मक होती, जी आपल्या पत्नीला आपल्यापुढे काहीही मानत नाही आणि दुसऱ्या स्त्रीला घरात आणून तो तिच्यासह राहत असतो.
सुधांशूला त्याच्या पात्राबद्दल थोडं प्रेम आणि थोडी नाराजी मिळाली. ‘अनुपमा’ लाइव्ह सोडल्याची माहिती खुद्द सुधांशू पांडेने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर दिली आहे. तो म्हणाला, “तुम्हा सर्वांना माहित आहे की मी गेली चार वर्षे रोज तुमच्या घरी येत आहे, एक पात्र साकारत आहे ज्यासाठी मला प्रेम पण राग सुद्धा मिळाला आहे. मात्र, मला तुमची नाराजी देखील आवडते. मला समजले आहे, कारण मला वाटते की तुम्ही होता म्हणून तुम्हाला मी साकारलेल्या पात्राचा राग आला, जर तो आला नसता तर मला असे वाटेल की मी काही करू शकलो नाही.” असे अभिनेत्याने सांगितले.
हे देखील वाचा- रजनीकांत आणि आमिर खान 30 वर्षांनंतर पडद्यावर दिसणार एकत्र, ॲक्शन चित्रपटात ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ची एन्ट्री!
मी आता अनुपमा मालिकेचा भाग नाही- सुधांशू पांडे
सुधांशू पांडे त्याच्या लाइव्हमध्ये पुढे म्हणाला, “मला जड अंतःकरणाने सांगायचे आहे की मी आता अनुपमा शोचा भाग नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी मी तो शो सोडला आहे. इतके दिवस उलटून गेले होते आणि मला तुम्हाला नाराज करायचे नव्हते. मी तुम्हाला न सांगता कसा गेलो हे तुम्हाला जाणून घ्यायचे होते, म्हणून मी तुम्हाला आता सांगत आहे मी ‘अनुपमा’ मध्ये वनराज शाहची भूमिका करणार नाही हे सांगणे ही माझी जबाबदारी आहे. असा अचानक निर्णय घ्यावा लागला याबद्दल मी तुमची माफी मागतो, पण कधीतरी पुढे जावे लागते. असेच तुमचे प्रेम देत राहा.” असं सुधांशू पांडे म्हणाला. २०२० मध्ये अनुपमा मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच या मालिकेला चाहत्यांनी भरपूर प्रेम देखील दिले आहे.