भारतातील 'या' मंदिरांमध्ये मोठ्या जलौषात साजरा केली जाते हनुमान जयंती
राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात असलेले मेहेंदीपूर बालाजी मंदिर अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. जे लोक काळ्या जादू आणि दुष्ट आत्म्याने प्रभावित होतात,मी अशी लोक या मंदिरात गेल्यानंतर बरे होतात, अशी मान्यता आहे.
वाराणसीमध्ये असलेले संकट मोचन हनुमान मंदिर अतिशय प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिराची स्थापना गोस्वामी तुलसीदास यांनी केली आहे. या मंदिराचे दर्शन घेतल्यामुळे जीवनातील अनेक संकटं दूर होतात.
मारघाटात असलेले हनुमान मंदिर जमना बाजार हनुमान मंदिर म्हणून सगळीकडे ओळखले जाते. पौराणिक कथांनुसार, भगवान हनुमान यांनी लक्ष्मणासाठी संजीवनी आणण्यासाठी गेलेल्या काळात या मंदिरात विश्रांती घेतली होती.
दिल्लीमधील प्राचीन मंदिरांपैकी असलेले मंदिर म्हणजे प्राचीन हनुमान मंदिर. कौरवांशी युद्ध जिंकल्यानंतर पांडवांनी दिल्लीमध्ये हनुमान मंदिर बांधले होते.
अयोध्यातील हनुमान गुढी हे मंदिर १० व्या शतकातील मंदिर आहे. इथे असे मानले जाते की, येथे असलेल्या गुहेमध्ये हनुमानजी राहत होते. त्यांनी रामजन्मभूमी किंवा रामकोटचे रक्षण केले.