कापून ठेवलेली फळे लगेच काळी पडून जातात? फळांचा ताजेपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
कापून ठेवलेल्या फळांचा रंग बदल्यानंतर सुद्धा फळे खराब होत नाहीत. फळ हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यातील एन्झाइम्सच्या रासायनिक अभिक्रियेमुळे फळांचा रंग बदलून जातो.
उष्ण हवामान आणि अयोग्य साठवणूक यामुळे फळे खराब होण्याची जास्त शक्यता असते. फळांची योग्य साठवणूक केल्यास फळे दीर्घकाळ व्यवस्थित ताजी आणि फ्रेश राहतात.
कापून ठेवलेल्या सफरचंद, केळी, पेर इत्यादी फळांवर थोडासा लिंबाचा रस टाकावा. लिंबामधील विटामिन सी आणि एस्कॉर्बिक ॲसिड असते, ज्यामुळे एन्झाइम्सना हवेच्या संपर्कात आल्यावर रंग बदलण्यापासून रोखते.
कापून ठेवल्यानंतर फळे लगेच हवा बंद डब्यात भरून ठेवावी. हवेचा संपर्क जेवढा कमी येईल तेवढीच फळे जास्त वेळ व्यवस्थित ताजी आणि फ्रेश राहतील.
फळांचा नैसर्गिक रंग कायम टिकवून ठेवण्यासाठी फळे स्वच्छ भांड्यात आणि स्वच्छ सुरीचा वापर करून कापावीत. अन्यथा फळांमध्ये विषाणू झपाट्याने वाढतात.