Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Disha Salian Case : पाच वर्षापासून बदनामी सुरु; अखेर दिशा सालियान प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी सोडले मौन

Disha Salian Case : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला नवे वळण आले आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मत मांडले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 20, 2025 | 02:50 PM
Disha Salian Case News aaditya Thackeray press conference in mumbai

Disha Salian Case News aaditya Thackeray press conference in mumbai

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला नवीन दिशा मिळाली आहे. हिच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा याचिका दाखल केली आहे. यामध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचे यांच्यावर आरोप केले जात होते. यामुळे सत्ताधारी नेत्यांनी आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावरुन आदित्य ठाकरे यांनी थेट राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे. तसेच माध्यमांशी संवाद साधून आरोप करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिशा सालियान प्रकरणावरुन टीका करणाऱ्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही विरोधकांमी राज्यपालांची भेट घेतली आहे. आम्ही राज्याचे अनेक मुद्दे हे सभागृहामध्ये मांडतो. मात्र सत्ताधारी लोकंच सभागृहाचे कामकाज बंद पाडत आहेत. कारण त्यांच्याकडे कोणताही अजेंठा राहिलेला नाही. सभागृह हे नियमांनुसार चालत नाही. हा महाराष्ट्राच्या विधीमंडळाचा अपमान सत्ताधारी नेत्यांकडून केला जातो आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलून समज द्यावी अशी मागणी केली असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ते म्हणाले की, शेतकरी आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचार यामध्ये तर महाराष्ट्राची परिस्थिती वाईटच आहे. महाझुठीचे जे काही निवडणुकीतील मुद्दे होते ज्यावरुन त्यांनी निवडणूक जिंकण्याचा दावा केला होता. जे दहा मुद्दे होते त्यातील एक सुद्धा मुद्दा अर्थसंकल्पामध्ये आलेला नाही. त्यांचे हिंदूत्व आम्ही उघडे पाडले आहे. हे सगळं केल्यानंतर आता माझ्यावरुन विधीमंडळाचे कामकाज सत्ताधाऱ्यांनी बंद पाडलं आहे. सत्तधाऱ्यांना महाराष्ट्रबद्दल बोलण्यासाठी निवडून दिलेलं आहे, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

पाच वर्षांपासून बदनामी सुरु

आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पुन्हा एकदा याचिका दाखल केल्यानंतर ते म्हणाले की, पाच वर्षांपासून बदनामी सुरु आहे. मात्र कोर्टामध्ये जे होईल ते होईल. याचं उत्तर आम्ही कोर्टामध्ये देणार आहे. मी अशा गोष्टींच्या राजकारणामध्ये पडत नाही. मी कामाचं बोलत असतो, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महायुतीचे नेते करतायेत पाठराखण

एकीकडे महायुतीचे नेते हे आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरेंची साथ दिली आहे. शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड म्हणाले की, “दिशा सालियानच्या प्रकरणात सीआयडी तपास करण्यात आला. मात्र यामध्ये कोणत्याही राजकीय नेत्यांचा समावेश नव्हता. मी आदित्य ठाकरेंची पाठराखण करतोय असे नाही मी जे सत्य आहे ते सांगतो आहे. हे सत्य तपासामध्ये समोर आलं आहे. कोणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे द्यायला हवे होते. पण कोणतेही पुरावे नसल्यामुळे आदित्य ठाकरेंना क्लिन चीट मिळाली आहे त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. आता मागचे तीन वर्षे आमचे सरकार आहे. पण कोणताही पुरावा मिळालेला नाही,” असे स्पष्ट मत संजय गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Disha salian case news aaditya thackeray press conference gives explanation on resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Disha Salian case
  • shivsena

संबंधित बातम्या

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
1

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
2

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?
3

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक
4

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.