साताऱ्यात शिवसेनेच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सज्जड इशारा दिला आहे. "हिशोब चोख ठेवतो" म्हणत त्यांनी जिल्हा परिषदेतील राजकारणावर भाष्य केले.
पाणीपुरवठा योजनेवरून महापालिकेत विरोधकांनी गोंधळ घालत आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे गटनेते Amol Shinde आणि काँग्रेसचे गटनेते Chetan Narote यांना निलंबित करण्यात आले.
भांडुप स्टेशन परिसरात वारंवार होणाऱ्या बस अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात शिवसेना (उबाठा)ने खासदार संजय दिना पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.
भाईंदरमध्ये व्हायरल व्हिडिओवरून राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. भाजप आमदारांच्या ठिय्या आंदोलनानंतर शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी त्यावर पलटवार केला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे.
वसईतील माणिकपूर नाका परिसरातील रस्ता सध्या अपघातांचे केंद्र बनला आहे. फुट्यार्डो इमारतीसमोर पाईपलाईन कामानंतर करण्यात आलेल्या अपुऱ्या दुरुस्तीमुळे रस्त्यावर बारीक खडी साचली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा सुरुंग लागला आहे. तालुकाप्रमुख दत्ताराम भिलारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश
मुंबईत महाराष्ट्राच्या गृहनिर्माण खात्याकडून राबवण्यात आलेल्या समूह पुनर्विकास योजनेची (क्लस्टर रिडेवलपमेंट) देशभरात अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी आज राज्यसभेत केली.
कल्याणमधील सुप्रिया सोसायटी ते वाणी विद्यालय या मार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला.
सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष निवड प्रकरणी झालेल्या राजकारणावरुन आणि धक्काबुक्कीमुळे वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी शिवसेनेने मूक मोर्चा काढून निषेध केला.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील धाराशिव जिल्हा प्रमुख तसेच युवा सेनेच्या प्रमुखांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्याने धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे.
महापालिका स्विकृत नगरसेवकांची नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत आत्ता २५ मार्चपर्यंत आहे. तर निवड २७ मार्चला निवड होणार आहे. आता शिवसेना उबाठाला स्विकृत सदस्यपद मिळणार कि नाही याकडेच लक्ष आहे.
महाविकास आघाडीनंतर आता भाजपनेही आपले सदस्य सहलीच्या नावाखाली एकत्रित केल्याने सत्तासमीकरणांवर नवा सस्पेन्स निर्माण झाला आहे. सदस्य फुटू नयेत आणि संभाव्य राजकीय घडामोडींना आळा घालण्यासाठीच ही रणनीती असल्याची चर्चा रंगली.
पालकमंत्री उदय सामंत यांनी 'अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांवर शिवसेनेचेच सदस्य विराजमान होतील. संबंधित नावांची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, असे संकेत दिले
जिल्हा परिषदेच्या आत राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही,’ अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे अनिल मकरिये यांची निवड झाली आहे. त्यांनी एमआयएमच्या उमेदवाराचा १०-४ अशा फरकाने पराभव केला.
या निवडणुकीवर राज्यातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवले होते.