Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतंकी कारवायांना सफल करण्यासाठी भारतात ‘मॅरेज जिहाद’; गुणरत्न सदावर्ते यांचे धक्कादायक विधान

पाकिस्तानी महिला आणि भारतीय पुरुषांशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा आता समोर आला आहे. यावरुन आता गुणरत्न सदवर्ते यांनी मत मांडले असून गंभीर आरोप केले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: May 04, 2025 | 04:32 PM
Gunaratna Sadavarte reaction on Marriages between citizens of India and Pakistan

Gunaratna Sadavarte reaction on Marriages between citizens of India and Pakistan

Follow Us
Close
Follow Us:

यवतमाळ : पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये पर्यटकांना लक्ष्य करुन आणि त्यांना धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.यामुळे संपूर्ण देशभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून अनेक पाऊले उचलण्यात आली आहे. भारतामध्ये असणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले आहे. तसेच पाकिस्तानी सिलेब्रिटीचे अकाऊंट भारतामध्ये वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र अनेक पाकिस्तानी महिला या लग्न करुन भारतामध्ये आल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, याबाबत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मत मांडले आहे.

यवतमाळमध्ये ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत आणि पाकिस्तानी नागरिकांमध्ये झालेल्या विवाहाच्या मुद्द्यावर मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की,”हजारो पाकिस्तानी महिला लग्न करून भारतात वसल्या आहेत. भारतात आतंकी कारवाया सफल करण्यासाठी हा मॅरेज जिहाद तर नाही ना असा खळबळजनक सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे. तसेच लग्न ही संकल्पना नसून बॉस बॉर्डर टेररिझम असल्याचे गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी मॅरेज जिहाद बद्दल बोललं पाहिजे. पत्रकारांना भीती घालण्याचं कारण नाही, असे देखील सदावर्ते म्हणाले आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “मुंब्रा आणि कौसामध्ये कोणी पाकिस्तानी आहे का? हे सांगावं. आपण लोकप्रतिनिधी आहात. मात्रं पत्रकारांना भीती घालण्याचं काम करताय. शेतकऱ्यांना कष्टाचा मोबदला द्यावा, सोयाबीनला साडेसात हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी विदर्भातील शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही शासनास करतो. पुसद तालुक्याला पुष्पावंती नगरी म्हणून जिल्हा घोषित करावा, अशी आमची भूमिका आहे. या तालुक्याने महाराष्ट्राला नाईकांच्या रुपात दोन मुख्यमंत्री दिले. राज्यमंत्री इंद्रनील नायकांनी स्वतंत्र विदर्भासाठी पुढाकार घ्यावा. विदर्भातीलच महसूल मंत्री व मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बाबींचा विचार करायला हवा व पुसद जिल्हा करावा. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी हा आमचा दौरा सुरू आहे,” मत वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी पुसद येथील दौऱ्या दरम्यान केले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पाकिस्तानी तरूणीशी लग्न केल्यामुळे CRPF जवानाच्या अडचणीत वाढ

केंद्रीय राखीव पोलिस दलातील (CRPF) कॉन्स्टेबल मुनीर अहमद यांना सेवा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांनी एका पाकिस्तानी महिलेशी विवाह केला होता, पण याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली नव्हती. शिवाय, हा विवाह कोणत्याही अधिकृत मान्यतेशिवाय करण्यात आला होता. त्यामुळे नियमभंगाच्या कारणास्तव त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करत त्यांना सेवेतून हटवण्यात आले आहे. मुनीर अहमद यांनी सुमारे अडीच महिन्यांपूर्वू पाकिस्तानच्या मीनल खान या नागरिकासोबत विवाह केला होता. विवाहानंतर मीनल खान व्हिजिटिंग व्हिसावर भारतात आली आणि पुढे दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला. मात्र, तिच्या व्हिसाची मुदत 22 मार्च 2025 रोजी संपूनही ती भारतातच थांबली होती.

Web Title: Gunaratna sadavarte reaction on marriages between citizens of india and pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 04:32 PM

Topics:  

  • Jammu Kashmir Terror Attack
  • Pahalgam Terrorist Attack

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात  गुडघे टेकायला लावल्याचा दावा
1

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात गुडघे टेकायला लावल्याचा दावा

कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! ४८ तासांत पाकिस्तानी नेत्यांची तिसऱ्यांदा भारताला पोकळ धमकी
2

कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! ४८ तासांत पाकिस्तानी नेत्यांची तिसऱ्यांदा भारताला पोकळ धमकी

एकीकडे अणुहल्ल्याची धमकी तर दुसरीकडे पाण्याची भीक; पाकिस्तानने पसरले भारतापुढे हात
3

एकीकडे अणुहल्ल्याची धमकी तर दुसरीकडे पाण्याची भीक; पाकिस्तानने पसरले भारतापुढे हात

असीम मुनीरची अमेरिकेच्या बिळात घुसून भारताला धमकी; अणुहल्ला करण्याचा सोडला फुसका बार
4

असीम मुनीरची अमेरिकेच्या बिळात घुसून भारताला धमकी; अणुहल्ला करण्याचा सोडला फुसका बार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.