Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation : मराठा आरक्षण मुद्दा पुन्हा पेटणार! जरांगे पाटलांकडून मुंबईवर धडक मोर्चाचा इशारा

राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरुन त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 11, 2025 | 02:57 PM
Manoj Jarange Patil aggressive on maratha reservation

Manoj Jarange Patil aggressive on maratha reservation

Follow Us
Close
Follow Us:

जालना : राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येणार आहे. मागील दीड वर्षापासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमरण उपोषण, आंदोलन आणि मोर्चा काढून त्यांनी राज्यव्यापी आंदोलन उभे केले होते. सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील करत आहेत. तसेच मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या सर्व तरुणांवरुन गुन्हे काढून टाकावे अशी देखील त्यांची मागणी आहे. यासाठी आता जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला इशारा दिला आहे. संपूर्ण मराठा समाजासह मुंबईमध्ये येऊन मोर्चा करण्याच इशारा त्यांनी दिला आहे.

जालनामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी माध्ममांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “यापुढे सांगायचे आणि बोलायचे कमी, पण आता करून दाखवायचे आहे. म्हणजे आता इथून पुढे सरकारची चाल खेळावी लागणार आहे. सरकार सुद्धा निवडून येईपर्यंत काही कळू देत नाही बोलू देत नाही. फक्त गोड बोलते. आता अचानक आंदोलन करायचे आहे. या भूमिकेशिवाय सरकार ठिकाणावर येणार नाही. सरकार निवडून येईपर्यंत किती पाया पडत होता. किती लाडक्या बहिणींना पैसे दिले. पण आता निकष लावून लाडक्या बहिणींची संख्या कमी करत आहे. सरकार गोरगरिबांना कळू देत नाही. शेवटी बहीण ही बहीण असते, त्यामुळे तिला आता का योजनेतून बाहेर काढले जात आहे,” असा राजकीय टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “आता आम्हाला देखील माहिती आहे की डाव कसा टाकायचा? परंतू यावेळी आम्ही आरक्षण घेणारच. अजून थोडे थांबू, पण तयारी अशी करू की चारही बाजूंनी तुम्हाला जायला रस्ता मिळणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा लक्षात ठेवावे,” अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे मराठा नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “आता खूप ऊन आहे नाहीतर त्यांना आताच हिचका दाखवला असता. मागच्या वेळी मुंबईला गेलो आणि सुखरूप परत आलो. नाहीतर त्यांना तेव्हाच झटका दाखवला असता. आम्ही काय मुंबईला जाऊ नाही का? आम्हालाही बघायचं आहे मंत्री कुठे राहतो, आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना सुद्धा मुंबई बघू नाही का? त्यांनाही बघावी वाटते. आमचा मुंबईला जाण्याचा विचार थोडा थोडा चालू आहे. परंतु मी सध्या काही त्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही. माझ डाव सांगणार नाही,” असे म्हणत पुन्हा एकदा मुंबईला जाण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

Web Title: Manoj jarange patil warns mahayuti government to protest in mumbai for maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • Mahayuti Government
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
1

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु
2

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
3

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…
4

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.