Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर पुन्हा राजकारण तापले, मनोज जरांगेना गिरीश महाजनांचा मोलाचा सल्ला

मराठा आरक्षणाचे राजकारण पुन्हा तापल्याचे दिसून येत आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांना संयम बाळण्याचा सल्ला दिलाय. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी पावलं उचलली होती असंही सांगितलं

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 25, 2025 | 12:04 PM
मराठा आरक्षणाबाबत गिरीश महाजनांचा मनोज जरांगेना सल्ला (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

मराठा आरक्षणाबाबत गिरीश महाजनांचा मनोज जरांगेना सल्ला (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • मराठा आरक्षणावरून पुन्हा राजकारण तापणार
  • मनोज जरांगे करणार 29 ऑगस्टला निदर्शन
  • गिरीश महाजनांचा मोलाचा सल्ला
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा वाद चिघळत चाललेला दिसून येत आहे. मनोज जरांगे वेगवेगळ्या पद्धतीने यासाठी लढा देत असून यावर अजूनही चर्चा चालू आहेत. दरम्यान मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोठे निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी जरांगे यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. 

महाजन म्हणाले की, मराठा समाजासाठी ठोस पावले उचलणारे पहिले व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यावर आता मनोज जरांगे नक्की काय उत्तर देणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. सध्या मराठा आरक्षणावरून आरोप प्रत्यारोपांची फैरी चालू असल्याचेही दिसून येत आहे. 

सरकारची चिंता वाढली! मराठा वादळ मुंबईत धडकणार; पश्चिम महाराष्ट्रातील मराठा आंदोलक सज्ज

फडणवीसांवर जरांगेचा आरोप

बीडमध्ये मनोज जरांगे यांनी आरोप केला की, फडणवीस मराठा समाजाला चिथावण्यासाठी “किरकोळ अडथळे” निर्माण करत आहेत. ते म्हणाले, “फडणवीस यांनी आम्हाला त्रास देण्यासाठी पोलिसांचा वापर करू नये. मी मुंबईत येत आहे आणि तिथे भेटेन.” पोलिसांचा वापर करत असल्याचा खुलेआम आरोप जरांगेने यावेळी केलाय. जरांगे यांनी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी सातत्याने केली आहे. मात्र त्यावर अजूनही काहीही तोडगा निघाल्याचे दिसून न आल्याने आता निदर्शनं करण्यात येणार असल्याचंही सांगितलं आहे. 

फडणवीस यांनी ठोस काम केले – महाजन

दरम्यान या आरोपांवर मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे की, फडणवीस हेच मराठा समाजाला न्याय देणारे पहिले व्यक्ती होते. ते म्हणाले, “फडणवीस हे मराठा आरक्षणासाठी ठोस पावले उचलणारे पहिले होते. दुर्दैवाने, तो निर्णय न्यायालयात टिकला नाही. परंतु मागील सरकारांनी या मुद्द्यावर काहीही केले नाही.”

महाजन पुढे म्हणाले की, जरांगे यांनी फडणवीस यांना क्रूर म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे आणि त्याला कोणताही पाठिंबा मिळणार नाही. आंदोलनात भाषा आणि वर्तन दोन्हीवर संयम राखणे आवश्यक आहे, असा सल्ला त्यांनी दिला.

Maratha Reservation : मराठा आंदोलनाची जोरदार तयारी; माळशिरस तालुक्यातून दीड हजार गाड्या मुंबईला जाणार

उद्धव, राज ठाकरे आणि राहुल गांधींनाही लक्ष्य

मनोज जरांगेच नाही तर गिरीश महाजन यांनीही यावेळी विरोधी पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांवर हल्लाबोल केला. त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. महाजन म्हणाले की, हे नेते केवळ राजकीय फायद्यासाठी विधाने करत आहेत.

२९ ऑगस्ट रोजी मोठे निदर्शन

मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणाबाबत मुंबईत निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वीही त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक वेळा उपोषण आणि आंदोलन केले आहे. या निदर्शनात मराठा समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकतात असे मानले जाते. आता सरकारचे यावर काय पाऊल असणार हेच पहावे लागेल आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यावर काय प्रतिक्रिया देतील याचीही सर्वांना प्रतीक्षा आहे. 

Web Title: Maratha reservation controversy minister girish mahajan gave advice to manoj jarange to be calm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 10:33 AM

Topics:  

  • girish mahajan
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Bhiwandi:  विषारी दारू मृत्यू प्रकरणानंतर आठवलेंचे मोठे विधान
1

Bhiwandi: विषारी दारू मृत्यू प्रकरणानंतर आठवलेंचे मोठे विधान

“फडणवीस आणि भाजपचे सरकार हे आश्वासनांचा कारखाना आणि फसवणुकीचा ब्रँड,” विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका
2

“फडणवीस आणि भाजपचे सरकार हे आश्वासनांचा कारखाना आणि फसवणुकीचा ब्रँड,” विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका

Maratha Reservation वर दादा भुसे यांचे वक्तव्य, “सरकार मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील”
3

Maratha Reservation वर दादा भुसे यांचे वक्तव्य, “सरकार मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील”

Maratha Reservation : मनोज जरांगेंनी मध्यरात्रीच उपोषण सोडलं; चर्चेतून निघाला महत्त्वपूर्ण तोडगा
4

Maratha Reservation : मनोज जरांगेंनी मध्यरात्रीच उपोषण सोडलं; चर्चेतून निघाला महत्त्वपूर्ण तोडगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.