
Mumbai Congress, Varsha Gaikwad, Ravi Raja, Politics, Crime News
मुंबई काँग्रेसच्या माजी नगरसेवकांसह ७९ पदाधिकाऱ्यांची पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. या ७९ जणांच्या यादीत माजी नगरसेवक रवी राजा आणि धर्मेश व्यास यांच्याही नावांचा समावेश आहे. रवी राजा यांनी २०२४ काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत धारावीतून निवडणूक लढवली.
Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade
पण आता काँग्रेसच्या या निर्णयावर टिका करत, रवी राजा म्हणाले की, ” मी भाजपचा उपाध्यक्ष आहे आणि निवडणूकही लढवली आहे.तरीही वर्षा गायकवाड यांना हे माहिती नसणे हे हास्यास्पद आहे. दुसरीकडे धर्मेश व्यास यांनी अवघ्या वर्षभरापूर्वी राजीनामा दिला. पण आता धर्मेश व्यास यांनीही वर्षा गायकवाड यांना मानहानीची आणि कायदेशीर नोटी पाठवण्याचा इशारा दिला आहे.
या वादावर बोलताना मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “आमच्या पक्षात लोकशाही आहे. कोणी कायदेशीर नोटीस पाठवत असेल किंवा उत्तर देत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. हा पक्षाचा अंतर्गत विषय असून आम्ही तो हाताळण्यास सक्षम आहोत.”
Pune News: केतनचा हात-पाय मोडून अपंग करण्याचा होता प्लॅन; डिलीट केलेल्या चॅटमधून पोलिसांच्या हाती
काँग्रेच्या सुत्रांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, “माजी नगरसेवक आणि कार्यकत्यांच्य निलंबनाचा निर्णय हा वर्षा गायकवाड यांनी नव्हे तर काँग्रेसच्या प्रशासकीय मंडळाने घेतला होता. अनेक नेत्यांनी पक्षाकडे अधिकृतपण राजीनामा दिला नाही. फक्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांनी पक्ष सोडला होता. पक्ष सोडलेले काही नेते पुन्हा पक्षात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण पक्षाच्या प्रशासकीय कमिटीने त्यांनाही कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्व ७९ जणांना पुढील ६ वर्षांसाठी पक्षात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसकडून विधानसभेचे तिकीट नाकारल्यानंतर तसेच मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वाविरोधात तक्रार करण्यासाठी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने रवी राजा यांनी २०२४ मध्ये काँग्रेसला रामराम केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून सध्या ते मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आहेत.काँग्रेसकडून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना रवी राजा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “मी भाजपच्या तिकिटावर धारावीतून निवडणूकही लढवली आहे. तरीही वर्षा गायकवाड इतक्या अनभिज्ञासारख्या कशा वागू शकतात?” असा सवाल त्यांनी केला.