Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramgiri Maharaj : “त्या रामगिरीला जोड्याने मारण्याची वेळ आली..”; वादग्रस्त विधानावरुन राजकारण रंगलं

रामगिरी महाराज हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. आता पुन्हा एकदा रामगिरी महाराजांनी राष्ट्रगीताबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरुन आता जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 08, 2025 | 03:46 PM
Mahant Ramgiri Maharaj's reaction to the Aurangzeb tomb controversy

Mahant Ramgiri Maharaj's reaction to the Aurangzeb tomb controversy

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामधील राजकीय वर्तुळामध्ये अनेक वादग्रस्त विधाने समोर येत आहे. राजकारण्यानंतर आता महंत देखील अशा प्रकारची विधाने करताना दिसून येत आहे. महंत रामगिरी महाराज यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये वादग्रस्त विधान केले. रामगिरी महाराज हे अयोध्या या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी गेले होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना थेट राष्ट्रगीतावर आक्षेप घेतला. यानंतर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.

महंत रामगिरी महाराज यांनी जन-गण-मन नाही तर वंदे मातरम हे देशाचे राष्ट्रगीत हवे होते या आशयाचे वक्तव्य केले. यावरुन शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. माध्यमांशी संवाद साधून जितेंद्र आव्हाड यांनी महंत रामगिरी महाराज यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच रामगिरी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

जन-गण-मन हे राष्ट्रगीत नको म्हणत असलेल्या रामगिरी महाराजांवर जितेंद्र आव्हाड यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आता त्या रामगिरीला जोड्याने मारण्याची वेळ आली आहे. आता जन गण मन यावर देखील त्याचा आक्षेप आहे. त्याला म्हणाव तू बॅनची मागणी करा बाबा..आता अति व्हायला लागलं आहे रामगिरीचं. देशाने आता इतिहास हा रामगिरीकडूनच शिकायचा आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

पुढे जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार गटाच्या आमदारांना ऑफर देण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुनील तटकरे यांनी फोन नाही केले. ते संसदेमध्ये भेटले. यावेळी त्यांनी खासदारांना सांगितलं की, बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा. आणि या आमच्याकडे. एकीकडे आमचं दैवत आहे म्हणायचं. पक्ष आणि निशाणी घेतली हे ठीक आहे. आता खासदार पण पळवा. आणि वर एकत्र येतात म्हणून बोंबाबोंब करत आहे. बापाला आणि पोरीला सोडा असं सांगतात. यावरुन संस्कार आणि काय तुमची संस्कृती हे दिसून येत, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. तसेच ऑफर देण्याऱ्यांवर अजित पवार गटाच्या नेत्यांवर रोष व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले रामगिरी महाराज?

रामगिरी महाराज हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यापूर्वीही त्यांच्या विधानांवरून वाद निर्माण झाले आहेत. महाराष्ट्र आपण राष्ट्रगीत ऐकतो, आपल्या राष्ट्रगीताचा इतिहास किती लोकांना माहित आहे हे मला माहीत नाही, पण आज मी सत्य सांगणार आहे. कदाचित तुम्हा लोकांना याची माहिती नसेल. रवींद्रनाथ टागोरांनी हे गाणे 1911 मध्ये कलकत्ता येथे गायले होते, जेव्हा भारत स्वतंत्र देश नव्हता. रवींद्रनाथ टागोरांनी पंचम जॉर्ज यांच्या समर्थनार्थ हे गाणे गायले होते. जॉर्ज पंचम कोण होता? तो ब्रिटिश राजा होता आणि तो भारतीयांवर अत्याचार करत होता. राष्ट्रगीत हे भारतातील लोकांसाठी नाही. त्यामुळे भविष्यात यासाठीही संघर्ष करावा लागणार आहे. ते पुढे म्हणाले की, वंदे मातरम हे आपले राष्ट्रगीत असले पाहिजेरवींद्रनाथ टागोर यांनी हे गाणे ब्रिटिश राजे जॉर्ज पंचम यांच्या समर्थनार्थ गायले होते. हे राष्ट्राला उद्देशून कधीच नव्हते, असे वक्तव्य रामगिरी महाराजांनी केले आहे.

Web Title: Ncp jitendra awhad aggressive on ramgiri maharaj controversial statement on the national anthem of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • ramgiri maharaj

संबंधित बातम्या

Aurangzeb Tomb : औरंगजेबाच्या कबरीवर महंत रामगिरी महाराजांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘अशा लोकांच्या कबरी…’
1

Aurangzeb Tomb : औरंगजेबाच्या कबरीवर महंत रामगिरी महाराजांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘अशा लोकांच्या कबरी…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.