Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मराठा आरक्षण न मिळण्याला जरांगे पाटीलच जबाबदार…”; वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांची आक्रमक भूमिका

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण व शेतकरी कर्जमाफी यावर मत मांडले आहे. त्यांनी जरांगे पाटलांना खडेबोल सुनावले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 25, 2025 | 01:27 PM
“मराठा आरक्षण न मिळण्याला जरांगे पाटीलच जबाबदार…”; वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांची आक्रमक भूमिका
Follow Us
Follow Us:

अकोला : मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणावर बसले आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमध्ये उपोषणाचे हत्यार उगारले आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणावर नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज पहिल्यांदाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची पोलखोल केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन सरकारला घेरले आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन आक्रमक भूमिका घेत प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला घेरले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, याला कारणीभूत म्हणजे शेतकरी मूर्ख आहेत. आधीच्या दोन्ही सरकारने म्हटलं होतं की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो, मग शेतकऱ्यांनी पुन्हा सत्तेवर कोणाला आणलं? मग आता कशाला रडत बसले?” असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

पुढे ते म्हणाले की, “शेतामध्ये जे पेरले तेच उगवणार आहे, जे कर्जमाफी करणारं सरकार नाही ते आता सत्तेवर आले, तर ते कर्जमाफी करणार नाहीत असं म्हणत असतो त्यात नवीन काय? ते आता भोगावं लागतं” असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांवर देखील राग व्यक्त करुन कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच महायुती सरकारला घेरले आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रकाश आंबेडकर यांची पोलखोल केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा प्रकाश आंबडेकर यांनी पोलखोल केली. “मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले हे जरांगे पाटील वर्सेस सुरेश धस अस धरायचं का? की काय म्हणायचं? जस शेतकरी कर्जमाफीला शेतकरी दोषी आहेत तसेच मराठा आरक्षणाला तुम्ही(जरांगे) दोषी आहात. जे तुम्हाला मान्य करायला तयार नव्हते, त्यांनाच तुम्ही सत्तेवर बसवलं” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. “तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं पण बीजेपीला टार्गेट केलं नाही, आणि बीजेपीला तुम्ही सत्तेवर बसवलं आहे, तीच बीजेपी तुम्हाला सर्टिफिकेट द्यायला तयार नव्हती” असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मागील दोन वर्षापासून राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण, आंदोलन आणि मोर्चा काढून जोरदार आरक्षणाची मागणी केली आहे. मराठा समाज हा कुणबी असून सर्व मराठा समाजाला कुणबी अंतर्गत ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे अशी मूळ मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यात महायुतीला अद्याप यश आलेले नाही. यामुळे महायुती सरकार विरुद्ध मनोज जरांगे पाटील असे चित्र अनेकदा राज्यामध्ये दिसून येत आहे.

Web Title: Prakash ambedkar aggressive stand on farmer loan waiver and maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 01:27 PM

Topics:  

  • Adv Prakash Ambedkar
  • Manoj Jarang patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’
1

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’

Manoj Jarange Patil Attack on State Govt: मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना सोडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
2

Manoj Jarange Patil Attack on State Govt: मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना सोडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
3

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू; आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी कार्यवाहीला वेग
4

मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू; आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी कार्यवाहीला वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.