
फोटो सौजन्य- pinterest
हरतालिका हे व्रत माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी केलं होतं. कठोर तपश्चर्येची आठवण करून देणारं असं हे व्रत आहे. भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी हे व्रत केलं जातं. हरतालिका या शब्दांत हरत म्हणजे हरण करून घेणे आणि आलिका म्हणजेच सखी असा अर्थ होतो. पार्वतीच्या सखीने तिला घरातून दूर नेलं म्हणून या व्रताला हरतालिका असं नाव पडलं.
पूर्वजन्मी सतीने आपल्या पित्याच्या यज्ञात आत्मधन केलं होतं. त्यानंतर ती हिमालय आणि नेना यांच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आली. बालपणापासूनच तिच्या मनात भंगवान शंकरांबाबात अपार अशी भक्ती होती. तिने शंकरांनाच पती म्हणून स्वीकारण्याचा निश्चय केला होता. त्यामुळे ती लहान वयापासूनच त्यांची उपासना आणि तप करू लागली.
एकेदिवशी नारदमुनी हिमालय राज्याच्या भेटीस आले त्यांनी पार्वतीच्या विवाहासाठी भगवान विष्णूंचा प्रस्ताव सांगितला. विष्णूंसारखा श्रेष्ठ वर मिळत असल्यामुळे हिमालय राजांनी आनंदाने होकार दिला. मात्र ही बातमी जेव्हा पार्वती यांना समजली तेव्हा त्या अत्यंत दुखी झाल्या कारण तिच्या मनात शंकराशिवाय अन्य कोणाचाही विचार नव्हता.
पार्वतीची अवस्था पाहून तिच्या जिवलग सखीने तिला विचारलं. पार्वतीने आपल्या मनातील इच्छा देखील सांगितली तेव्हा पार्वतीच्या सखीने तिला घरातून दूर एका घनदाट अरण्यात नेलं. हिमालय राजाला वाटलं कोणीतरी पार्वतीचं अपहरण केलं आहे याच घटनेमुळे पार्वतीचं नाव हरतालिका हे नाव प्रसिद्ध झालं.
अरण्यात एका नदीकिनारी वाळूच शिवलिंग तिने तयार केलं. तिने निर्जळ उपवास करून भगवान शंकरांची मनोभावे पूजा केली. दिवसभर अन्नपाणी त्यागून ती शिवनामस्मरण करत राहिली. रात्रभर जागरण करून तिने शिवध्यान केलं.
तिची भक्ती, श्रद्धा आणि तपश्चर्या इतकी प्रकर होती की संपूर्ण सृष्टी प्रभावित झाली. अखेर पार्वतीच्या अखंड तपश्चर्येमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले ते तिच्यासमोर प्रकट होऊन वर मागण्यासा सांगितला. पार्वतीने नम्रपणे त्यांनाच पती म्हणून मिळावे अशी इच्छा व्यक्त केली.
मग शंकरांने तिची इच्छा मान्य केली आणि योग्य वेळी विवाह करण्याचं वचन दिलं. दरम्यान, हिमालय राज आपल्या मुलीचा शोध घेत अरण्यात आले त्यांनी पार्वतीला परत येण्याची विनंती केली तेव्हा पार्वतीने स्पष्ट शब्दांत सांगितलं माझा विवाह भगवान शंकरांशी करण्याचे वचन दिल्यास मी परत येईल.
आपल्या मुलीचा निर्धार पाहून हिमालय राजाने तिची इच्छा मान्य केली. यानंतर शुभ मुहूर्तावरती भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा भव्य विवाह संपन्न झाला. हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा नव्हता. तर शक्ती आणि शिव यांच्या मिलनाचं ते प्रतीक होतं. म्हणूनच हरतालिका व्रत हे अखंड सौभाग्य, उत्तम पतीप्राप्ती आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)