Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किनारी भागात नारळीपौर्णिमेला विशेष स्थान; जाणून घ्या ‘या’ दिवसाचे महत्व

महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागात नारळी पौर्णिमा सणाला एक विशेष स्थान आहे. किनारी भागात राहणाऱ्या मासेमार बांधवांमध्ये हे सण अतिशय जल्लोषाने साजरे केले जाते. या दिवसाचे महत्व जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 18, 2024 | 09:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतात रक्षाबंधनच्या दिवशी विविध राज्यांमध्ये नारळी पौर्णिमाही साजरी केली जाते. महाराष्ट्रातील कोकण विभागात या सणाला विशेष महत्व आहे. कोकणातील मासेमारी करणाऱ्या कोळी समाजासाठी नारळी पौर्णिमा म्हणजे सगळ्यात मोठ्या सणांपैकी एक असतो. या दिवशी समुद्र देवतेची आराधना केली जाते. दर्या देवाला पुजले जाते. हिंदू पंचांगानुसार, यंदाच्या वर्षी नारळी पौर्णिमा १९ ऑगस्ट २०२४ तारखेला आहे. या सणामध्ये वरुण राजाला एक विशेष मान असतो. कोकणातील तसेच महाराष्ट्रात इतर भागांमध्ये मासेमारी करणाऱ्या समाजात या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केले जाते. असे म्हटले जाते कि, नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागर देवाला नारळ अर्पण केल्याने समुद्र देवता प्रसन्न होतात आणि समुद्र किनारी राहणाऱ्या समाजाची वादळ वार्यांपासून रक्षा करतात.

सागर तटावर राहणारे कोळी समाजातील बांधव नारळी पौर्णिमेला विशेष महत्व देतात. इतकेच नव्हे, तर वर्षभर या सणाची वाट पाहत असतात. मराठी महिन्यानुसार, श्रावणात येणारा नारळी पौर्णिमा या सणाच्या दिवशी भगवान शंकराची आराधना केली जाते. नारळावर असलेल्या तीन छिद्रांना त्रिनेत्रधारीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या दिवशी भगवान शिव शंकराला नारळाचे भोग लावले जातात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी मासेमार बांधव आपल्या मासेमारीसाठी उपयोगात असलेल्या औजारांची स्वच्छता करतात. ज्या मासेमार बांधवांकडे भरपूर संपत्ती असते, ते या दिवशी नवीन बोट घेण्यास पसंती देतात. एकंदरीत, नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी समाज आपल्या कमला तसेच व्यवसायाला देव मानून त्याचे पूजन करतात.

हे सुद्धा वाचा : राखी बांधताना फक्त 3 गाठी का बांधल्या जातात? जाणून घ्या महत्त्व

नारळी पौर्णिमेच्या दिवशी मासेमारी पूर्णपणे बंद असते. त्याचबरोबर माश्यांच्या सेवनासही सक्त मनाई आहे. कोकणातील काही गावांमध्ये समुद्राला सोन्याचा नारळ देण्याची प्रथा आहे. समुद्र देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सागराला नारळ वाहिले जाते. त्याचसोबत नारळ वाहणे शांतीचे प्रतीक मानले जाते. दक्षिण भारतात ही नारळी पौर्णिमेला विशेष स्थान आहे. विशेष म्हणजे तेथील साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रपेक्षा जरा वेगळी आहे.

Web Title: Know the importance of narali purnima festival and how to celebrate it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 09:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.