Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti: धर्मनिष्ठा, शौर्य आणि विद्वत्तेचा महामेरू म्हणजे छत्रपती संभाजी महाराज

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : आज छत्रपती संभाजी महाराज यांची ३६८ वी जयंती देशभरात श्रद्धा आणि अभिमानाने साजरी केली जात आहे. त्यांचे स्थान सर्वोच्च आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 14, 2025 | 08:46 AM
Chhatrapati Sambhaji Maharaj's birth anniversary is celebrated on May 14 every year

Chhatrapati Sambhaji Maharaj's birth anniversary is celebrated on May 14 every year

Follow Us
Close
Follow Us:

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : आज छत्रपती संभाजी महाराज यांची ३६८ वी जयंती देशभरात श्रद्धा आणि अभिमानाने साजरी केली जात आहे. केवळ मराठा इतिहासातच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात धर्मासाठी प्राणार्पण करणाऱ्या महान योद्ध्यांमध्ये त्यांचे स्थान सर्वोच्च आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र म्हणून संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. सईबाईंच्या पोटी जन्मलेल्या संभाजी महाराजांनी लहानपणापासूनच मराठी, संस्कृत, फारसी आणि हिंदी या भाषांवर प्रभुत्व मिळवले. त्यांची विद्वत्ता केवळ राजकीय किंवा युद्ध कौशल्यातच नव्हे, तर साहित्यिक क्षेत्रातही प्रखरपणे दिसून येते. ‘बुद्धिभूषण’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला असून, तो त्यांच्या विद्वानतेचे प्रतीक मानला जातो.

संभाजी महाराजांचे राज्यारोहण आणि युद्ध कौशल्य

१६८१ साली छत्रपती संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा कारभार हाती घेतला. केवळ २४ व्या वर्षी राजसिंहासनावर विराजमान होऊन त्यांनी मुघल, पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज अशा बलाढ्य शत्रूंशी लढा दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने अनेक लढायांमध्ये विजय मिळवला. त्यांचे शासनकाल तितकाच आव्हानात्मक होता. औरंगजेबाने स्वतः दक्षिणेकडे मोहीम राबवत संभाजी महाराजांना नष्ट करण्याचे ध्येय ठरवले होते. मात्र, संभाजी महाराजांनी पाच वर्षांहून अधिक काळ मुघल सैन्याला रोखून धरले. त्यांच्या धैर्यामुळेच मराठा साम्राज्याचे अस्तित्व टिकून राहिले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘दो भाई दोनो तबाही’; पाकिस्तानला धूळ चारायला भारत-रशिया सज्ज, ‘S-500’ मुळे भरली धडकी!

धर्मासाठी दिलेले बलिदान

१६८९ मध्ये संभाजी महाराजांना मुघलांनी कपटाने कैद केले. औरंगजेबाने त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव आणला. मात्र, संभाजी महाराजांनी धर्मांतरास ठाम नकार देत आपला धर्म, संस्कृती आणि अस्मिता यांचे रक्षण केले. त्यामुळे त्यांना अमानुष छळ सहन करावा लागला आणि शेवटी त्यांना अत्यंत क्रूरपणे शहीद करण्यात आले. त्यांचे बलिदान आजही धर्मनिष्ठा, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रेमाचे सर्वोच्च उदाहरण मानले जाते. त्यांनी दाखवलेले शौर्य केवळ तलवारीच्या बळावर नव्हते, तर त्यामागे होती सत्यासाठी आणि न्यायासाठी झगडण्याची अमर प्रेरणा.

नवीन पिढीसाठी प्रेरणास्रोत

आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करताना, केवळ पुष्पांजली अर्पण करून विसरणे हा त्यांचा अपमान ठरेल. त्यांच्या शिकवणी जीवनात उतरवणे हीच खरी सार्थ श्रद्धांजली ठरेल. त्यांचे तेजस्वी जीवनचरित्र नवीन पिढीला नीतिमूल्ये, धैर्य आणि स्वाभिमानाची शिकवण देते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तुर्कीत सत्तापालट होणार? ‘या’ देशांनी आखली एर्दोगानच्या पाय उताराची योजना, वाचा सविस्तर

संपूर्ण भारताचे धर्मवीर

संभाजी महाराज हे केवळ मराठ्यांचे नाही, तर संपूर्ण भारताचे धर्मवीर आणि राष्ट्रवीर होते. त्यांच्या बलिदानाने भारताच्या इतिहासात अमिट ठसा उमटवला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी त्यांच्या आदर्शांचा स्वीकार करून राष्ट्रसेवेसाठी कटिबद्ध होणे आवश्यक आहे.

Web Title: Chhatrapati sambhaji maharajs birth anniversary is celebrated on may 14 every year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 08:45 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Maharaj
  • day history
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

UNTOC Palermo Convention : यूएनटीओसी म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीविरुद्ध जागतिक पातळीवरील सर्वात मोठे शस्त्र
1

UNTOC Palermo Convention : यूएनटीओसी म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीविरुद्ध जागतिक पातळीवरील सर्वात मोठे शस्त्र

Children’s Day 2025 : जगात 20 नोव्हेंबरला पण भारतातच 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो बालदिन; काय आहे कारण?
2

Children’s Day 2025 : जगात 20 नोव्हेंबरला पण भारतातच 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो बालदिन; काय आहे कारण?

World Kindness Day 2025 : दयाळूपणा म्हणजे शब्दांपलीकडच्या संवादाचं सौंदर्य
3

World Kindness Day 2025 : दयाळूपणा म्हणजे शब्दांपलीकडच्या संवादाचं सौंदर्य

World Pneumonia Day : श्वास एक…धोके अनेक! प्रदूषण, थंडी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती न्यूमोनियाचे तीन गुप्त शत्रू
4

World Pneumonia Day : श्वास एक…धोके अनेक! प्रदूषण, थंडी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती न्यूमोनियाचे तीन गुप्त शत्रू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.