Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ethiopia Volcano Eruption Ash: इथोपियात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाची राख भारतापर्यंत कशी पोहचली? जाणून घ्या शास्त्रीय कारण

Ethopia Volcanic Eruption: पृथ्वीच्या आत इतकी उष्णता असते की काही खडक हळूहळू वितळतात, ज्यामुळे मॅग्मा नावाचा जाड, वाहणारा पदार्थ तयार होतो. तो त्याच्या सभोवतालच्या घन खडकांपेक्षा हलका असतो, म्हणून मॅग्मा वर येतो

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 25, 2025 | 06:26 PM
Ethiopia Volcano eruption,

Ethiopia Volcano eruption,

Follow Us
Close
Follow Us:
  • इथिओपियामध्ये १२ हजार वर्षानंतर पहिल्यांदाच ज्वालामुखीचा उद्रेक
  • ज्वालामुखीची राख भारतापर्यंत कशी पोहचली
  • जेट स्ट्रीम एअर म्हणजे नक्की काय असते?
Ethiopia Volcano Eruption Ash:  इथिओपियामध्ये १२ हजार वर्षानंतर पहिल्यांदाच ज्वालामुखीचा विस्फोट झाला आहे. हैली गुब्बी या ज्वालामुखीचा विस्फोट झाला असून हवेत राख आणि ढगाचे लोट पसरले आहे. धक्कादायक बाब, म्हणजे इथिओपियातील ज्वालामुखीच्या उद्रेकाची राख दिल्ली आणि शेजारच्या ४५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या राज्यांपर्यंत पोहोचली आहे. इथिओपियाच्या अफार प्रदेशातील हैली गुब्बी ज्वालामुखीचा रविवारी उद्रेक झाला. उपग्रह प्रतिमांमध्ये राखेचे लोट वरच्या दिशेने उडत असल्याचे दिसून आले. ज्वालामुखीतून निघालेला दाट धूर आकाशात १४ किलोमीटरपर्यंत गेला. विशेष म्हणजे, राखेचा लोट केवळ भारतच नाही तर येमेन, ओमान आणि उत्तर पाकिस्तानमपर्यंतही पोहोचल्याची माहिती आहे. त्यामुळे या दिशेने जाणारे अनेक विमाने रद्द करण्यात आली तर काहीचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

हजारो वर्षानंतर इथिओपियात ज्वालामुखीचा विस्फोट; अरब सागर ओलांडून भारतात आली राख

इंडिया मेट स्काय वेदरने सोमवारी संध्याकाळी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये यांसदर्भात निवेदन जारी केले आहे. हैली गुब्बी ज्वालामुखी प्रदेशातून गुजरातपर्यंत राखेचा लोट दिसत होता. ज्वालामुखीचा उद्रेक तर थांबला. पण एवढ्या मोठ्या प्रमाणातच राख वातावरणात उंचावर कशी पोहोचली, असाही प्रश्न उपस्थित होतो.

हा लोट ताशी १००-१२० किमी/तास वेगाने उत्तर भारताकडे सरकला आणि २५,००० ते ४५,००० फूट उंचीवर पसरला. या राखेच्या लोटामुळे जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही, तरीही ज्वालामुखीची राख ४,५०० किलोमीटर प्रवास करून दिल्लीपर्यंत कशी पोहोचली? ज्वालामुखीचा उद्रेक कधी होतो आणि का होतो, यामागची अनेक कारणे आहेत.

ज्वालामुखीचा उद्रेक कधी होतो?

सोप्या भाषेत सांगायचे तर, पृथ्वीच्या आत इतकी उष्णता असते की काही खडक हळूहळू वितळतात, ज्यामुळे मॅग्मा नावाचा जाड, वाहणारा पदार्थ तयार होतो. तो त्याच्या सभोवतालच्या घन खडकांपेक्षा हलका असतो, म्हणून मॅग्मा वर येतो आणि जमा होतो. अखेर, मॅग्मा छिद्रे आणि भेगांमधून पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचतो.त्यावरील दाब वाढला की तो उद्रेक होतो. उद्रेक झालेल्या मॅग्माला लावा म्हणतात. पण प्रत्येक मॅग्मा उद्रेक घडवून आणत नाही. असे अनेक ज्वालामुखी आहेत जिथे मॅग्मा हळूहळू वाहत राहतो.

काही ज्वालामुखी स्फोटक असतात, तर काही शांत असतात. ज्वालामुखीचा उद्रेक होतो की नाही हे मॅग्माच्या रचनेवर अवलंबून असते. जर वाहणारा मॅग्मा पातळ असेल तर वायू सहजपणे बाहेर पडू शकतात. जेव्हा तो उद्रेक होतो तेव्हा कोणताही स्फोट होत नाही, कोणतेही नुकसान होत नाही. जर मॅग्मा जड आणि चिकट असेल तर वायू बाहेर पडू शकत नाहीत. वायूंचा दाब वाढला की त्यांचा स्फोट होतो. ज्वालामुखीच्या उद्रेकाचे असे दूरगामी परिणाम होतात. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर वाऱ्यांच्या माध्यमातून या ज्वालामुखीची राख शेकडो किलोमीटर वाहून नेली जाते.

Russia Ukraine War : युद्ध थांबवण्याच्या चर्चा… पण रशियाचा युक्रेनवर प्रहार सुरुच; कीववर एका रात्रीत २४९ ड्रोन्सचा मारा

इथिओपियातील ज्वालामुखीची राख दिल्लीपर्यंत कशी पोहोचली? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

इथिओपियातील ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्याची राख दिल्लीसह इतर देशांत कशी पोहोचली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे जेट स्ट्रीम एअर —आकाशाच्या उंच थरात अतिवेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह.

जेट स्ट्रीम एअरमुळे राखेचा प्रवास हजारो किलोमीटर

ज्वालामुखीतून निघणारा राखेचा थर साधारण ४,५०० किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. काही वेळा ज्वालामुखीची राख ५,००० किलोमीटरच्या त्रिज्येपलीकडे ही जाऊ शकते. ही मर्यादा ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.

राख १० ते ४० किमी उंचीवर पोहोचते

मोठ्या आणि तीव्र उद्रेकांच्या वेळी ज्वालामुखीची राख आणि वायू प्रचंड दाबामुळे थेट १० ते ४० किलोमीटर उंचीवर जातात. ही उंची म्हणजे वातावरणातील ती पातळी जिथे जेट स्ट्रीम वारे अत्यंत वेगाने वाहतात.

जेट स्ट्रीम वारे—राख वाहून नेणारा “एक्सप्रेस हायवे”

जेट स्ट्रीमचे वारे ताशी शेकडो किलोमीटर वेगाने वाहत असल्याने ते राखेचे कण हजारो किलोमीटर दूर नेऊ शकतात. त्यामुळे इथिओपियातील ज्वालामुखीची राख अगदी दिल्लीपर्यंत पोहोचली.

थोडक्यात कारण

* तीव्र उद्रेक → राख आकाशात खूप उंच नेली
* उंचीवर जेट स्ट्रीमचे वेगवान वारे → राखेला हजारो किलोमीटर दूर वाहून नेले
* त्यामुळे राख आफ्रिकेतून थेट भारतापर्यंत पोहोचू शकली

ज्वालामुखींच्या उद्रेकानंतर हवामान आणि वायुगुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांबाबत सतत अभ्यास सुरू असतो.

Web Title: Ethiopia volcano eruption ash how did the ash from the volcanic eruption in ethiopia reach india know the scientific reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 06:26 PM

Topics:  

  • international news
  • science news

संबंधित बातम्या

चर्चेनंतर इराणी नेत्यांना ठार मारण्याचा पाकचा होता कट; विमान सोडून बस-ट्रेनने गाठले तेहरान
1

चर्चेनंतर इराणी नेत्यांना ठार मारण्याचा पाकचा होता कट; विमान सोडून बस-ट्रेनने गाठले तेहरान

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच येणार भारत दौऱ्यावर; बिक्स शिखर परिषदेत राहणार उपस्थित
2

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच येणार भारत दौऱ्यावर; बिक्स शिखर परिषदेत राहणार उपस्थित

Iran America War : उंबरठ्यावर आलं, भारतानं नाकारलं! 20 लाख बॅरल घेऊन आलेल्या Irani जहाजाला No Entry,नेमकं कारण काय?
3

Iran America War : उंबरठ्यावर आलं, भारतानं नाकारलं! 20 लाख बॅरल घेऊन आलेल्या Irani जहाजाला No Entry,नेमकं कारण काय?

Andaman Sea : 250 जणांचा मृत्यू, 36 तासांचा थरार आणि एक ‘पाण्याची बाटली’! वाचा रफिकुलने ‘कसं’ हरवलं मृत्यूला?
4

Andaman Sea : 250 जणांचा मृत्यू, 36 तासांचा थरार आणि एक ‘पाण्याची बाटली’! वाचा रफिकुलने ‘कसं’ हरवलं मृत्यूला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.