Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day : स्वातंत्र्य संग्रामातील रणरागिणी; ज्यांच्या पराक्रमाला ब्रिटीश देखील घाबरत होते

चूल आणि मूल सांभाळणारी डोक्यावर पदर घेणारी स्त्री लाजारी आणि अमानुष होणाऱ्या अन्यायाविरोधात फक्त उभी राहते. अत्याचार करणाऱ्या ब्रिटीश सरकारला सळो की पळो करते त्या रणरागिणींचा देखील स्वातंत्र्य संग्रामात मोलाचा वाटा आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 13, 2025 | 06:15 AM
Independence Day : स्वातंत्र्य संग्रामातील रणरागिणी; ज्यांच्या पराक्रमाला ब्रिटीश देखील घाबरत होते
Follow Us
Close
Follow Us:

या देशाला वीर योद्धांची परंपरा लाभलेली आहे. छत्रपती शिवरायांच्या काळापासून ते आजतागायत देशसेवेसाठी आणि गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी शूर वीरांनी वीरमरण पत्कारलं आहे. याच शूरवीरांप्रमाणेच देश ब्रिटीशांपासून स्वतंत्र होण्यासाठी रणरागिणी देखील लढल्या होत्या. जेव्हा बांगड्या भरणारे हात देशसेवेसाठी शस्त्र उचलतात, जेव्हा चूल आणि मूल सांभाळणारी आणि डोक्यावर पदर घेणारी सात्विक स्त्री लाजारी आणि अमानुष होणाऱ्या अन्यायाविरोधात फक्त उभी राहत नाही तर अत्याचार करणाऱ्या ब्रिटीश सरकारला सळो कि पळो करते त्या रणरागिणींचा देखील स्वातंत्र्य संग्रामात मोलाचा वाटा आहे.

भारताच्या आता स्वातंत्र्य मिळवून 79 वर्ष झाली आहे. या स्वातंत्र्याच्या लढ्यात प्राण पणाला लावणाऱ्या रणरागिणींच्या शौर्याचा इतिहास जाणून घेऊयात.

राणी लक्ष्मीबाई

मेरी झाँसी कभी नहीं दूंगी म्हणत जिने ब्रिटीश सरकारच्या नाकी नऊ आणल्य़ा ती म्हणजे राणी लक्ष्मीबाई. 1887 साली झालेल्या पहिल्या वहिल्या स्वातंत्र्य संग्रामाची प्रमुख योद्धा ही राणी लक्ष्मीबाई होती. इंग्रजांनी विविध मार्गाने लक्ष्मीबाईची झाँसी कब्जा करण्याचा प्रयत्न केला. मात्र राणी लक्ष्मीबाईच्या परातक्रमामुळे इंग्रजांना झाँसी मिळवणं कठीण होत गेलं. आपल्या मुलाला पाठीला बांधून इंग्रजांशी दोन हात करणारी ही राणी ग्वालेयरच्या युद्धात धारातिर्थी पडली.

बेगम हजरत महल

1857 च्या उठावात या अवधच्या राणीने इंग्रजांविरुद्धच्या क्रांतीकारी चळवळीत सक्रिय होती. या स्वातंत्र्य संग्रामातील या राणीचं मोलाचं योगदान होतं. बेगम हजरतचा मुलगा बिरजीस कादर गादीवर बसवल्यानंतर, त्याने लखनौमधून इंग्रजांना हाकलून लावले.

भीकाजी कामा

पॅरिसमध्ये राहत असताना, भिकाजी कामा यांनी १९०७ मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ट येथे भारतीय स्वातंत्र्याचा पहिला तिरंगा फडकवला.त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठवला आणि क्रांतिकारकांना गुप्तपणे मदत केली.

 

अरुणा आसफ अली.
1942 च्या ‘छोडो भारत’ चळवळ आंदोलनात अरुणा आसफ अली ही दिल्लीची राणी देखील सहभागी होती. ‘छोडो भारत’ चळवळीत या राणीने इंग्रजांना युद्धाचं आव्हानं दिलं होतं. या राणीने मुंबईत तिरंगा फडकावत आंदोलन छेडलं होतं. या दिल्लीच्य़ा राणीला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं होतं.

सरोजिनी नायडू

शस्त्राबरोबर शब्द सुद्धा तितकेच धारदार असतात. सरोजिनी नायडू या कवयित्री असण्य़ाबरोबरच स्वातंत्र्य संग्रमाच्या चळवळीत देखील त्या सामील होत्या. सरोजिनी नायडू या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. त्य़ानंतर सत्याग्रह, महिलांचे अधिकार आणि स्वातंत्र्य यासाठी त्य़ांनी अनेक संघर्ष केला होता.

 

 

 

Web Title: Independence day the warrior queen of the freedom struggle whose prowess even the british were afraid of

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • Independence Day
  • India History

संबंधित बातम्या

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन
1

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही
2

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
3

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी
4

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.