Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ने दहशतवाद्यांची उडवली झोप; जाणून घ्या 29 सप्टेंबरचा इतिहास

भारतीय सैन्यावर दहशदवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केली होती. नवीन भारत सैन्यांवरील हल्ले सहन करणार नाही. घरात घुसून प्रत्युत्तर दिले जाईल या आशयाचा संदेश या सर्जिकल स्ट्राईकमधून जगभरामध्ये परसला. 29 सप्टेंबर रोजी भारताने सर्जिकल स्ट्राईक केले होते.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 29, 2024 | 03:32 PM
India's 'Surgical Strike' on 29th September

India's 'Surgical Strike' on 29th September

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय सैन्यासाठी 29 सप्टेंबर हा एक अविस्मरणीय दिवस आहे. आजच्या दिवशी भारताच्या शूर सैनिकांनी पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचे धाडस केले. भारताच्या या नव्या धाडसी पाऊलाचा साक्षीदार म्हणून आजच्या दिवसाची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी आहे. भारताने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडल्याचा दावा केला असला तरी पाकिस्तानने अशी कोणतीही कारवाई नाकारली.

जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराच्या स्थानिक मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले. भारतीय लष्करावरील हा सर्वात मोठा हल्ला मानला जात होता. 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरी हल्ल्याचे श्रेय सीमेपलीकडे बसलेल्या दहशतवाद्यांना देण्यात आले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने अवघ्या काही दिवसांत प्रतिहल्ला केला. 29 सप्टेंबर रोजी पाकिस्तानवर भारताने ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. या ‘सर्जिकल स्ट्राईक’ने पाकिस्तानची आणि दहशदवाद्यांची झोप उडवली होती. या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे नवीन भारताचे आक्रमक पवित्रा दिसून आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामधील भारत सरकार दहशवाद्यांचे भ्याड हल्ले सहन करणार नाही. जवानांच्या प्राणांच्या आहुतीचा बदला हा हल्ला करुन केला जाईल असा संदेश ‘सर्जिकल स्ट्राईक’ मधून शेजारील खुरापती करणाऱ्या देशांना देण्यात आला. त्याचबरोबर जागतिक राजकारणामध्ये देखील घरात घुसून दहशदवाद्यांना मारण्याच्या भारताच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’ मधून भारताबद्दल इतर देशांमध्ये मजबूत असा संदेश दिला गेला.

मागील वर्षी 29 सप्टेंबर रोजी महिलांबाबत देशाच्या राजकीय क्षेत्रामध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. 29 सप्टेंबर 2023 रोजीच्या कायदा मंत्रालयाच्या अधिसूचनेत महिला आरक्षणाबाबत नमूद करण्यात आले. 28 सप्टेंबर रोजी लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या तरतुदीसह महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींनी मान्यता दिली. त्यानंतर 2023 या विधेयकांचे रुपांतर कायद्यामध्ये झाले. त्यामुळे देशातील स्त्रियांना राजकीय क्षेत्रात ठोस भूमिका मांडण्याची आणि देशाच्या जडणघडणीमध्ये हातभार लावण्याची संधी मिळाली.

इतिहासातांच्या पानांमध्ये 29 सप्टेंबर रोजी नोंदवलेल्या काही इतर घटना –

  • 1836: मद्रास चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची स्थापना.
  • 1942: बंगालमधील तमलूक येथे ऑगस्ट आंदोलनात काँग्रेसच्या मिरवणुकीचे नेतृत्व करत असताना वयाच्या ७२ व्या वर्षी मातंगिनी हाजरा यांची गोळ्या झाडून हत्या
  • 1923: बाल्फोर जाहीरनाम्यानुसार (1917), पॅलेस्टाईनमध्ये ज्यू वस्ती स्थापन करण्याच्या ब्रिटनच्या संमतीला अखेर प्रमुख राष्ट्रांच्या परिषदेने मान्यता दिली.
  • 1938: पोलंडने टेशेनवर आपला पुन्हा अधिकार सांगितला. पहिल्या महायुद्धानंतर, हा समृद्ध प्रदेश पोलंड आणि चेकोस्लोव्हाकियामध्ये विभागला गेला. या क्षेत्रावरील हक्काबाबत दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव कायम होता.
  • 1959: भारताची आरती साहा हिने ‘इंग्लिश चॅनल’ पाण्यामध्ये पोहून ओलांडली. असे करणारी ती आशियातील पहिली महिला ठरली. उसळणाऱ्या लाटा आणि बर्फाळ पाण्यामुळे, पाण्याचा हा विशाल भाग ओलांडून पोहणे कठीण आव्हान होते आणि त्याला ‘पोहण्याचा माउंट एव्हरेस्ट’ म्हणतात. आरतीने वयाच्या 19 व्या वर्षी हा धोकादायी प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला.
  • 1961: ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांचा जन्म. वेल्समध्ये जन्मलेल्या ज्युलिया 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान झाल्या.
  • 1962: कलकत्ता येथे बिर्ला तारांगणाचे उद्घाटन.
  • 1970: युनियन कार्बाइडने मुंबईतील त्यांच्या रसायने आणि प्लास्टिक प्लांटमध्ये पहिले जलशुद्धीकरण केंद्र स्थापन केले. प्रक्रिया केलेले सांडपाणी औद्योगिक कारणांसाठी वापरले जाणार होते.
  • 1977: भारत आणि बांगलादेशमध्ये गंगा नदीचे पाणी वाटप करार झाला.
  • 1988: अमेरिकेने चॅलेंजर अपघातानंतर अडीच वर्षांनी आपले पहिले मानवयुक्त अंतराळयान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
  • 2016: भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि घुसखोरीच्या प्रयत्नात सीमेवर लपलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकठिकाणी हल्ला करण्याचा दावा केला.
  • 2020: कुवेतचे अमीर (शासक) शेख सबाह अल अहमद अल सबाह यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. 2006 मध्ये ते कुवेतचे अमीर बनले.
  • 2023: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिला आरक्षण विधेयकाला संमती दिल्यानंतर कायदा मंत्रालयाने अधिसूचना जारी केली. या कायद्यात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे.

याचे मूळ आर्टिकल वाचण्यासाठी आपण https://navbharatlive.com/ यावर क्लिक करावे

Web Title: India surgical strike made the terrorists sleepless know the history of september 29

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 03:32 PM

Topics:  

  • India vs Pakistan
  • indian army
  • Surgical Strike

संबंधित बातम्या

WCL 2025 : या एका खेळाडूच्या कृत्यामुळे भारताने WCL 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही, मोठे सत्य आलं समोर
1

WCL 2025 : या एका खेळाडूच्या कृत्यामुळे भारताने WCL 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही, मोठे सत्य आलं समोर

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल
2

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल

७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लष्कराने घेतली विशेष खबरदारी! नियंत्रण रेषेवर ‘३-स्तरीय सुरक्षा कवच’ तयार; शत्रूंसाठी ठरणार ‘काळ’
3

७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लष्कराने घेतली विशेष खबरदारी! नियंत्रण रेषेवर ‘३-स्तरीय सुरक्षा कवच’ तयार; शत्रूंसाठी ठरणार ‘काळ’

आशिया कप 2025 पूर्वी पाकिस्तानचा संघ घाबरला? 14 सप्टेंबरला भारत हरवेल का…पराभवाचं भय स्पर्धेआधीचं
4

आशिया कप 2025 पूर्वी पाकिस्तानचा संघ घाबरला? 14 सप्टेंबरला भारत हरवेल का…पराभवाचं भय स्पर्धेआधीचं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.