Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्याजदर कमी करण्यावर पीयूष गोयल यांच्याकडून भर; रिझर्व्ह बँकेच्या कार्यात सरकारचा हस्तक्षेप का?

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केले पाहिजेत. अशा सूचना दिल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 24, 2024 | 06:30 AM
Union Commerce and Industry Minister Piyush Goyal gives suggestion to RBI

Union Commerce and Industry Minister Piyush Goyal gives suggestion to RBI

Follow Us
Close
Follow Us:

नुकतेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, “अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केले पाहिजेत. अन्नधान्याच्या किमती वाढल्याचा युक्तिवाद देऊन रिझर्व्ह बँकेने व्याजदराच्या बाबतीत निष्क्रियता दाखवू नये.” गोयल यांची टिप्पणी अशा वेळी आली आहे जेव्हा किरकोळ महागाई ऑक्टोबरमध्ये 6.21 टक्क्यांपर्यंत वाढली होती, जी 4 महिन्यांतील सर्वोच्च आहे.

गोयल यांचे म्हणणे होते की अन्नधान्य चलनवाढीचा संबंध व्याजदराच्या रचनेशी जोडता कामा नये. कमी व्याजदराने कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या औद्योगिक घराण्यांचे हित लक्षात घेऊन व्याजदरात कपात करण्याची मागणी त्यांनी केली. वाणिज्य आणि उद्योगमंत्र्यांच्या या विधानामुळे चलनविषयक धोरण ठरवण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चलनविषयक धोरण समितीची बैठक डिसेंबरमध्ये होणार आहे. याआधी रिझर्व्ह बँकेवर दबाव आणला जात आहे का?

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विशेष म्हणजे केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन डेप्युटी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यात वाद सुरू असताना माजी डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी रिझर्व्ह बँकेचे स्वातंत्र्य कमी होण्याची भीती व्यक्त केली होती. रिझर्व्ह बँकेच्या कामकाजात सरकारचा थेट हस्तक्षेप तिची स्वायत्तता नाकारतो, असे आचार्य म्हणाले होते.

सरकारला रिझव्र्ह बँकेच्या स्वातंत्र्यावर अंकुश ठेवायचा आहे, हेच या प्रकारच्या वृत्तीवरून दिसते. आधीच देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये सरकार ढवळाढवळ करत होते, आता रिझर्व्ह बँकेची पाळी आहे. उद्योगमंत्री गोयल यांची विकासाबाबतची चिंता समजू शकते, पण विकास असा असावा की त्याचा देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर विधायक परिणाम होईल.

बँकांचे उद्दिष्ट केवळ औद्योगिक घराण्यांना कर्ज देणे हे नसून ज्यांच्या ठेवी बँकांमध्ये जमा आहेत अशा मध्यम उत्पन्न गटालाही त्याचा लाभ मिळावा. कॉर्पोरेट घराण्यांना विविध प्रकारे सबसिडी दिली जाते हे उल्लेखनीय आहे. जमीन, वीज, पाणी यांच्या दरात सवलत दिली जाते. उद्योगासाठी मोकळ्या झालेल्या जमिनीसाठी त्यांना अत्यल्प मोबदला द्यावा लागतो.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

उद्योग, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था उघडणारे याचा फायदा घेतात. उद्योग नफा मिळविण्यावर पूर्ण लक्ष देतात परंतु पर्यावरण संरक्षणाशी संबंधित नियम पाळत नाहीत. सर्वसामान्य व्यक्तीला बँकांकडून कर्ज मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, पण सरकारही कर्ज मिळवण्यासाठी उद्योगपतींवर दबाव आणते. सरकार आणि रिझव्र्ह बँकेतील मतभेद चव्हाट्यावर येत नसले, तरी गव्हर्नरने राजीनामा दिल्यावर सर्व काही सामान्य होत नाही, असे दिसते.

 

लेख- चंद्रमोहन द्विवेदी

Web Title: Union commerce and industry minister piyush goyal gives suggestion to rbi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2024 | 06:30 AM

Topics:  

  • Modi government
  • Piyush Goyal
  • RBI
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

Cheque Payments: चेक भरताच काही तासात जमा होणार खात्यात पैसे, 4 ऑक्टोबरपासून RBI ची नवी सिस्टिम
1

Cheque Payments: चेक भरताच काही तासात जमा होणार खात्यात पैसे, 4 ऑक्टोबरपासून RBI ची नवी सिस्टिम

लाभार्थ्यांना १२,००० कोटींचे अनुदान; प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी मोदी सरकारचं मोठं पाऊल
2

लाभार्थ्यांना १२,००० कोटींचे अनुदान; प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी मोदी सरकारचं मोठं पाऊल

भारत रशियातून तेलाची आयात खरंच बंद करणार का? ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफ घोषणेचा किती परिणाम?
3

भारत रशियातून तेलाची आयात खरंच बंद करणार का? ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफ घोषणेचा किती परिणाम?

काय आहे रिझर्व्ह बँकेचा रिटेल डायरेक्ट प्लॅटफॉर्म? ट्रेझरी बिलांमध्ये सुरू करता येईल SIP
4

काय आहे रिझर्व्ह बँकेचा रिटेल डायरेक्ट प्लॅटफॉर्म? ट्रेझरी बिलांमध्ये सुरू करता येईल SIP

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.