फोटो सौजन्य सोशल मीडिया
पंतप्रधान मोदी यांनी मीराबाई चानू ची प्रशंसा करताना सांगितले कि , तुम्हाला तिसऱ्यांदा गोल्ड मेडल घेताना बघून माझ्या सहित सर्व देशाला तुमचा अभिमान वाटला . तेव्हाच त्यांनी मीराबाईच्या रडण्याचे कारण विचारले असता , मीराबाई ने सांगितले कि पॅरिस ऑलम्पिक मध्ये फक्त एका किलोने माझं मेडल राहिलं होतं .म्हणून काहीही करून या वर्षी ग्लासको मध्ये मेडल भारतात आणायचंच हे स्वप्न मी पाहिले आणि त्यासाठी संघर्ष केला म्हणून माझ्या डोळ्यात आपोआप अश्रू आले . यावर मोदींनी लगेच प्रतिक्रिया देत सांगितले कि तुमचे एक एक अश्रू हे गोल्ड मेडल आहेत . तुमच्या डोळ्यातून त्या दिवशी एक एक गोल्ड मेडल टपकत होते .
भारतीय महिला वेटलिफ्टर ने पुढे सांगितले कि , एक खेळाडू म्हणून तुम्हाला खूप गोष्टींचा सामना करावा लागतो . तुम्हाला कधी परिस्थिती बदलेल आणि त्या वेळी क्षणात काय करता येईल यासाठी माईंड शार्प ठेवावे लागते . या चार वर्षात अश्याच काही गोष्टींचा मी खूप सामना केला आहे . येणारे सगळे अडथळे पार करत सातत्य ठेवले आहे .
बऱ्याच वेळा इन्जरी झाली आणि घरात ही समस्या आल्या , तरीही आज आपल्या ध्येयापर्यंत मी पोहोचले आणि मी पोडियम वर उभी राहिली तेव्हा आपलं राष्ट्रगीत सुरु झालं आणि माझ्या डोळ्यात आपोआप पाणी यायला सुरवात झाली . देशाचा झेंडा उंचावर फडकत असलेला बघून एक वेगळंच समाधान मिळालं असे मीराबाई चानू ने सांगितले .
वेस्ट इंडिजचा ‘गेम ओव्हर’! 2027 World Cupची थेट पात्रता हुकली; सलग तिसऱ्यांदा भंगलं स्वप्न
मीराबाई चानू ने सतत कॉमनवेल्थ स्पर्धेत एक खूपच चांगले प्रदर्शन केले आहे . मीराबाई ने सलग तिसऱ्यांदा कॉमनवेल्थ गेम्स मध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे . आणि त्याचबरोबर ती सलग तिसऱ्यांदा गोल्ड मेडल मिळवणारी जगातली पहिली वेटलिफ्टर बनली आहे . ४८ किलोग्रॅम वर्गात एकूण १९० किलो चा भार उचलत गोल्ड मेडल जिंकले आहे . कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचे चांगले प्रदर्शन झाले आहे . भारताने १३ गोल्ड , १७ सिल्वर , आणि ९ ब्रॉंज सहित टोटल ३९ मेडल्स मिळवले आहेत .






