फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत आणि दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 08 नोव्हेंबर, शुक्रवार रोजी खेळवला जाईल. सामना रात्री 8.30 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक रात्री 8 वाजता होईल. कर्णधार सूर्यकुमार यादवला मालिकेतील पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनची निवड करणे सोपे जाणार नाही. त्यामुळे पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन कसे असू शकतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दोन वेगवान गोलंदाजांना पदार्पणाची संधी मिळू शकते. वैशाख मालिकेतील पहिल्या सामन्यात यश दयाल आणि विजयकुमार भारतासाठी पदार्पण कॅप घालू शकतात.
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्यावर सामन्याच्या सलामीची जबाबदारी येऊ शकते. याआधी संजू सॅमसन बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतही ओपनिंग करताना दिसला होता, जिथे त्याने शतक झळकावले होते. त्यानंतर पुढे सरकत कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर दिसू शकतो. यानंतर चौथ्या क्रमांकाची जबाबदारी टिळक वर्मा यांच्याकडे सोपवली जाऊ शकते. त्यानंतर अष्टपैलू हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर दिसू शकतो. हार्दिक व्यतिरिक्त अक्षर पटेलच्या रूपाने अष्टपैलू खेळाडूचा पर्यायही संघाकडे आहे. मात्र, हार्दिकला अधिक प्राधान्य दिले जाण्याची अपेक्षा आहे.
हेदेखील वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माने निवृत्ती घेतली पाहिजे का? वाचा रिटायरमेंट घेण्याचे कारण
त्यानंतर सहाव्या क्रमांकावर जितेश शर्मा आणि सातव्या क्रमांकावर रिंकू सिंग फिनिशर म्हणून दिसू शकतात. यानंतर आठव्या क्रमांकावर रवी बिश्नोई मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून पाहता येईल. त्याचबरोबर आजच्या सामन्यात रमनदीप सिंह संघामध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्मा आणि फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांच्यासाठीही ही चांगली संधी असेल. चक्रवर्तीने बांगलादेशविरुद्ध पाच विकेट घेत प्रभावशाली कामगिरी केली होती. संघाचे वरिष्ठ खेळाडू कर्णधार सूर्यकुमार यादव, अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल हे देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करतील.
Captain & Chef 🧑🍳 SKY introduces two ✌️ new f̶a̶c̶e̶s̶ dishes to the t̶e̶a̶m̶ menu 📜
𝙍𝙚𝙖𝙙𝙮 𝙏𝙤 𝙎𝙚𝙧𝙫𝙚 – SKY like never seen before #TeamIndia | #SAvIND | @surya_14kumar | @Raman___19 pic.twitter.com/brbznUtiZ6
— BCCI (@BCCI) November 8, 2024
बिश्नोई व्यतिरिक्त गोलंदाजी विभागात तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली जाऊ शकते, ज्यामध्ये अर्शदीप सिंग, यश दयाल आणि विजयकुमार वैशाख यांच्या नावाचा समावेश केला जाऊ शकतो. यश आणि विजय आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतात.
संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, रिंकू सिंग, रवी बिश्नोई, अर्शदीप खान, विजयकुमार वैशाख, यश दयाल.