
World-winning women's team gifts President a signed jersey; Murmu congratulates team on its performance
Women’s team presents President with signed jersey : २ नोव्हेंबर रोजी भारतीय महिला संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करत इतिहास रचला आहे. भारताने आपले पहिले जेतेपद पटकावले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास घडवला आहे. त्यामुळे आता भारतीय संघांवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. भारतीय संघ पंतप्रधान मोदी यांना देखील भेटला आहे. अशातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवनात आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची भेट घेतली, जिथे कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी त्यांना सर्व खेळाडूंच्या स्वाक्षरी असलेले संघ जर्सी भेट दिली. विश्वचषक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने महिला क्रिकेटमधील पहिले जागतिक विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे.
हेही वाचा : 6,6,6,6,6,6… एका षटकात 38 धावा, 12 चेंडूत 55 धावा, पाकिस्तानी फलंदाजाने केला कहर
राष्ट्रपती मुर्मू यांनी संघाचे त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन केले आणि सांगितले की, खेळाडूंनी केवळ इतिहास रचला नाही तर तरुण पिढीसाठी आदर्श देखील बनल्या आहेत. राष्ट्रपती कार्यालयातून जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ही कामगिरी तरुण पिढीला, विशेषतः मुलींना जीवनात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल. मुर्मू यांनी विश्वास व्यक्त केला की, संघ भविष्यातही भारतीय क्रिकेटला जगात सर्वोच्च स्थानावर नेत राहील आणि खेळाडूंना त्यांच्या क्रिकेट प्रवासात येणाऱ्या अडचणींबद्दल ते म्हणाले, कधीकधी खेळाडूंची झोपही उडून गेली असेल. पण त्यांनी सर्व आव्हानांना तोंड दिले. न्यूझीलंडवरील विजयानंतर लोकांना विश्वास होता की सामन्यातील चढ-उतार असूनही, आपल्या मुली जिंकतील.
हहे वाचा : IND vs PAK : आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये होणार धमाकेदार सामना, ‘नो हँडशेक’ वाद कायम राहणार का?
मुर्मू म्हणाल्या की, खेळाडूंचे यश त्यांच्या कठोर परिश्रम, कौशल्य, दृढनिश्चय आणि त्यांच्या कुटुंबियांचे आणि क्रिकेट चाहत्यांचे प्रेम आणि आशीर्वाद यामुळे आहे. राष्ट्रपतींनी संघातील प्रत्येक सदस्याचे अभिनंदन केले. भारत आणि परदेशातील लाखो भारतीय या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. संघाची रचना देखील भारताचे प्रतिबिंब आहे, कारण सर्व खेळाडू वेगवेगळ्या प्रदेशातून आणि पार्श्वभूमीतून येतात. खेळाडू वेगवेगळ्या प्रदेशांचे, वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीचे आणि वेगवेगळ्या परिस्थितीतून येतात. पण ते एक संघ आहेत, ‘भारत’ संघ भारताचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करते.