Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने केले तीन मोठे बदल; संजू सॅमसनसह या दोन नवीन खेळाडूंना संधी; वाचा सविस्तर रिपोर्ट

सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज म्हणजेच १७ जानेवारीला बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 17, 2024 | 07:28 PM
तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने केले तीन मोठे बदल; संजू सॅमसनसह या दोन नवीन खेळाडूंना संधी; वाचा सविस्तर रिपोर्ट
Follow Us
Close
Follow Us:
बंगळुरू : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने पहिले 2 सामने जिंकून मालिका जिंकली आहे. मात्र, रोहित सेनेला तिसरी टी-२० जिंकून अफगाणिस्तानला क्लीन स्वीप करायचे आहे. बेंगळुरूमध्ये नाणेफेक आधीच झाली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या T20 साठी भारतीय संघात 3 मोठे बदल करण्यात आले आहेत. अक्षर पटेल, अर्शदीप सिंग आणि जितेश शर्मा यांना तिसऱ्या टी-२०साठी संघातून वगळण्यात आले आहे.
संजू सॅमसनला सुवर्णसंधी
अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात जितेश शर्माच्या जागी भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. संजूला ही सुवर्णसंधी मिळाली आहे. या सामन्यात त्याची फलंदाजी आली तर त्याला स्वत:ला सिद्ध करावे लागेल, कारण यानंतर भारत आयपीएलनंतर थेट टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपला पुढचा टी-२० खेळणार आहे. विकेटकीपिंगसाठी खूप स्पर्धा आहे. अशा परिस्थितीत संजूला तो वर्षानुवर्षे आयपीएलमध्ये करत असलेला पराक्रम गाजवावा लागेल.
कुलदीप यादवचाही तिसऱ्या टी-२०मध्ये समावेश
संजू सॅमसनशिवाय कुलदीप यादवचाही तिसऱ्या टी-२०मध्ये समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेलच्या जागी कुलदीपला संधी देण्यात आली आहे. यादव बेंगळुरूच्या खेळपट्टीवर कहर करू शकतात. टीम इंडियाने वेगवान गोलंदाजाच्या रूपात तिसरा बदल केला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या जागी आवेश खानला संधी मिळाली आहे.
भारतीय खेळाडू 11 खेळाडू : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.

Web Title: Team india made 3 major changes in third t20 match chances for these 2 new players along with sanju samson read detailed report nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2024 | 07:26 PM

Topics:  

  • M Chinnaswamy Stadium

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.