Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारताच्या हाती ऑस्ट्रेलियाने हिसकावली! टीम इंडियाचा मालिकेत पराभव

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेत टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने १-३ असा पराभवाचा सामना करावा लागला आहे. शेवटच्या सामन्यात कांगारूंनी ६ विकेट्स केलं टीम इंडियाला पराभूत, वाचा संपूर्ण मालिकेचा अहवाल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 05, 2025 | 09:40 AM
फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया

फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निकाल : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये नुकताच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा पाचवा सामना संपला आहे. यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. टीम इंडियाला या मालिकेमध्ये १-३ अशी गमवावी लागली आहे. त्याचबरोबर भारताच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जाण्याच्या आशा देखील संपुष्ठात आल्या आहेत. भारताच्या संघाने हा सामना ६ विकेट्सने गमावला आहे. भारताच्या संघाची या मालिकेमध्ये खराब फलंदाजीमुळे पराभवाचा सामोरे जावे लागले असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. भारताचे अनुभवी फलंदाज त्याचबरोबर भारताचे युवा खेळाडू सुद्धा संघासाठी मोठी कामगिरी करू शकले नाही.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात भारताच्या संघाने दमदार सुरुवात करून मालिकेचा दमदार शुभारंभ केला होता. त्यानंतर भारताच्या संघाला दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आणि मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-१ अशी बरोबरी साधली आणि टीम इंडियाला कांगारूंनी एकही संधी कमबॅकची दिली नाही. मालिकेचा तिसरा सामना अनिर्णयीत राहिला आणि त्यामुळे दोन्ही संघाला एकही गुण मिळाला नाही. चौथ्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने सुरुवातीपासूनच दबदबा दाखवला आणि सामना जिंकून मालिकेमध्ये आघाडी घेतली होती.

पाचव्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात प्लेइंग ११ चा भाग नव्हता त्यामुळे जसप्रीत बुमराहकडे कर्णधार पद देण्यात आले होते. पण जसप्रीत बुमराहला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे विराट कोहलीने कर्णधारपद स्वीकारले होते. त्यानंतर भारताच्या संघाने केलेल्या खराब फलंदाजीमुळे पहिल्या इनिंगमध्ये भारताच्या संघाला ऑस्ट्रेलियाने १८५ धावांवर रोखले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करून ऑस्ट्रेलियाला १८१ धावांवर रोखण्यात यशस्वी ठरले. पण टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करू शकले नाही. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा भारताच्या संघाला १५७ धावांवर रोखले त्यामुळे कांगारूंसमोर मोठी धावसंख्या टीम इंडिया उभी करू शकला नाही. टीम ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्यासाठी १६२ धावांचे लक्ष्य होते. ते लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ४ विकेट्स गमावून सहज पूर्ण केले.

5TH Test. Australia Won by 6 Wicket(s) https://t.co/cDVkwfEkKm #AUSvIND

— BCCI (@BCCI) January 5, 2025

सिडनी कसोटी सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. भारताचा पहिल्या डावात १८५ धावा झाल्या. भारतीय गोलंदाजांनी शानदार खेळ करत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १८१ धावांत गुंडाळले. दुस-या डावात भारताने चार धावांची आघाडी घेतली होती, पण अवघ्या १५७ धावांत गुंडाळल्यानंतर त्यांना ऑस्ट्रेलियासमोर साधे लक्ष्य ठेवता आले. भारताच्या दुसऱ्या डावात पंतने ६१ धावा केल्या, पण इतर कोणत्याही फलंदाजाला जम बसवता आला नाही. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आणि दुसऱ्या डावात सहा विकेट गमावून १४१ धावा केल्या. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याकडून मजबूत भागीदारीची अपेक्षा होती जी पूर्ण होऊ शकली नाही. जडेजाला बाद करून कमिन्सने तिसऱ्या दिवशी भारताला पहिला धक्का दिला. जडेजा केवळ १३ धावा करू शकला. कमिन्सने सुंदरचा डाव १२ धावांवर संपुष्टात आणला. येथून भारताला मजबूत धावसंख्या गाठता येणार नाही हे निश्चित झाले होते. मोहम्मद सिराज चार धावा करून बोलंडचा बळी ठरला. स्कॉट बोलंडने कर्णधार बुमराहला गोलंदाजी देत ​​भारतीय डाव संपवला.

Web Title: Team india was defeated by australia in the border gavaskar trophy series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 08:59 AM

Topics:  

  • Border-Gavaskar trophy
  • IND VS AUS

संबंधित बातम्या

IND vs AUS : 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय…भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
1

IND vs AUS : 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय…भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

IND vs AUS : Vaibhav Suryavanshi या तारखेला खेळणार पुढील सामना! वाचा U19 संघाचे संपुर्ण वेळापत्रक
2

IND vs AUS : Vaibhav Suryavanshi या तारखेला खेळणार पुढील सामना! वाचा U19 संघाचे संपुर्ण वेळापत्रक

WCL पॉइंट्स टेबलमध्ये भारताच्या संघाची हालत खिळखिळी! युवराज सिंगचा संघ विजयासाठी आसुसला; पाकिस्तान नंबर 1
3

WCL पॉइंट्स टेबलमध्ये भारताच्या संघाची हालत खिळखिळी! युवराज सिंगचा संघ विजयासाठी आसुसला; पाकिस्तान नंबर 1

IND vs AUS : शिखर धवनची खेळी व्यर्थ! ऑस्ट्रेलियन संघाने भारताला 4 विकेट्सने केलं पराभूत
4

IND vs AUS : शिखर धवनची खेळी व्यर्थ! ऑस्ट्रेलियन संघाने भारताला 4 विकेट्सने केलं पराभूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.