
नवी दिल्ली : आज (1 फेब्रुवारी) सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2022) अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. या केंद्रीय अर्थसंकल्पात भविष्यातल्या डिजिटल भारताचं प्रतिबिंब स्पष्ट उमटलेलं दिसलं. देशाच्या डिजिटल करन्सीच्या घोषणेसह ई-पासपोर्टची (E-Passport) महत्त्वपूर्ण घोषणाही या वेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. काय आहे ई-पासपोर्टची आणि नेहमीच्या पासपोर्ट पेक्षा यात काय वेगळं आहे जाणून घेउया.
पासपोर्ट हे प्रत्येक नागरिकाचं एक महत्त्वाचं डॉक्युमेण्ट आहे, त्यामुळे ते आपल्याकडे असायलाच हवं. नव्या काळात तर ते अधिक महत्त्वाचं आहे.
आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ई-पासपोर्टची घोषणा केली. तर हा ई-पासपोर्टची (E-Passport) म्हणजे इलेक्ट्रॉनिक चिप (Electronic Chip) बसवलेले ई-पासपोर्ट. या इ -पासपोर्टमध्ये चीप बसवलेली असणार आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी, बायमोमेट्रिक्स आयडेंण्टिफिकेशन याद्वारे फ्युचर टेक्नॉलॉजीने ते अद्ययावत असणार.
या ई-पासपोर्टचा ट्रेंड अनेक देशांमध्ये आहे. अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनी यांसारख्या देशांमध्ये ते आधीच वापरले जात आहे. या देशांमध्ये बायोमेट्रिक ई-पासपोर्ट प्रणाली आहे. या पासपोर्टमध्ये ६४ KB स्टोरेज स्पेस आहे, ज्यामध्ये वापरकर्त्याची माहिती संग्रहित केली जाते. हे सामान्य पासपोर्टसारखे दिसते, त्यात फक्त एक चिप बसविण्यात आली आहे.