मृत्यूनंतर Aadhaar Card कोणत्या कामी येतो? बंद करण्याबाबत काय नियम आहेत?
सध्याच्या या डिजिटल युगात आधार कार्ड हे आपले महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. हे एक ओळखपत्रासारखे काम करते. आधार कार्ड हे सरकारद्वारे जारी केलेले सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. ओळखीचा एक प्रकार म्हणून त्याची मागणी केली जाते. कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड ही पहिली मागणी आहे. आधार बनवताना, नाव, पत्ता आणि फिंगरप्रिंट यासारखे तपशील घेतले जातात, त्यानंतर एक युनिक 12 अंकी क्रमांक दिला जातो, जो व्यक्तीला आयुष्यात एकदाच दिला जातो. अशा परिस्थितीत अनेकांच्या मनात प्रश्न येतो की मृत्यूनंतर आधार कार्डचे काय होते? आधार जारी करणारी संस्था UIDAI ने यासाठी काही नियम केले आहेत का? आधार डिएक्टिवेट करण्याचा मार्ग काय आहे? तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे आज या लेखात मिळणार आहेत.
मृत्यूनंतर आधार कार्डचे काय होते?
आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI ने आधार बनवण्याबाबत अनेक नियम केले आहेत, पण मृत्यूनंतर आधार कार्डचे काय करायचे. याबाबत कोणताही नियम नाही. जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार सरेंडर किंवा बंद करायचा असेल तर ते शक्य नाही. तथापि, एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण त्याचा गैरवापर होण्यापासून रोखू शकता.
टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा
लॉक करू शकता आधार कार्ड
आधार लॉक करण्याची एक विशेष सुविधा उपलब्ध आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, तुम्ही UIDAI साइटवर जाऊन त्याचे आधार कार्ड लॉक करू शकता, असे केल्याने कोणीही आधार कार्ड वापरू शकत नाही. आधार लॉक केल्यानंतर, तुम्ही ते सुरक्षित ठेवावे.
आधारे कार्ड लॉक करण्याची पद्धत
टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा
कोणीही लॉक करू शकतं का आधार कार्ड?
फसवणूक टाळण्यासाठी, आधार कार्डचे बायोमेट्रिक तपशील लॉक केले जाऊ शकतात आणि आवश्यकतेनुसार पुन्हा अनलॉक केले जाऊ शकतात. लॉक/अनलॉक करण्यासाठी, मोबाईल नंबर आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. तुमचे आधार कार्ड मोबाईलशी लिंक नसल्यास तुम्हाला हे लॉक करता येणार नाही.