Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहलगाम हल्ल्यानंतर भारताची आक्रमक भूमिका; पाकिस्तान सतर्क, अरबी समुद्रात क्षेपणास्त्रांचा सराव सुरू

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निर्घृण हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 24, 2025 | 10:11 AM
India's aggressive stance after Pahalgam attack, Pakistan on high alert; Missile drills begin in Arabian Sea

India's aggressive stance after Pahalgam attack, Pakistan on high alert; Missile drills begin in Arabian Sea

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निर्घृण हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर भारताने तातडीने कडक कारवाईचे संकेत दिले असून, त्यानंतर पाकिस्तानने आपल्या युद्धनौकांना अरबी समुद्रात क्षेपणास्त्र सरावासाठी सज्ज केले आहे.

भारताच्या तात्काळ हालचालींमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून, पाक नौदलाने २४ एप्रिलच्या सकाळपासून २५ एप्रिलच्या दुपारी ४ वाजेपर्यंत अरबी समुद्रात क्षेपणास्त्र डागण्याचा सराव सुरू केला आहे. पाकिस्तानने याची माहिती आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा संस्था UKMTO (United Kingdom Maritime Trade Operations) ला दिली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला, एक धक्का बसवणारी घटना

जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरवून सोडले आहे. अज्ञात दहशतवाद्यांनी २६ नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करत त्यांची हत्या केली. या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘अर्जन सिंह स्मृती व्याख्यानात’ बोलताना या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले, “भारत हे सहन करणार नाही. आम्ही योग्य वेळेवर योग्य उत्तर देऊ. दोषींना शिक्षा होईलच.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताच्या कारवाईच्या संकेताने पाकिस्तान हादरला; संरक्षण मंत्र्यांचा इशारा, सिंधू पाणी करारावरही चिंता

#BREAKING Pakistan announces live-fire naval drills for tomorrow, in the Arabian Sea, near its maritime border with India.@rwac48@arunp2810@SPS_Shahid@LancerFlying @goldenarcher @reportersujan @VishnuNDTV @ParthSatam pic.twitter.com/3rwADW3Nvo

— Sandeep Mukherjee (@Libertarian196) April 24, 2025

credit : social media

भारताची तातडीने प्रतिक्रिया, पाकिस्तान घाबरले

भारताने पहलगाम हल्ल्यानंतर तातडीने केंद्रीय सुरक्षा समितीची (CCS) उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी संभाव्य प्रतिसादाबाबत चर्चा केली. यानंतर, पाकिस्तानने देखील घाईघाईने आपली राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे, जी २४ एप्रिल रोजी होणार आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केली. त्यांनी सांगितले की, भारताच्या कारवाईच्या संभाव्यतेमुळे ही बैठक आयोजित केली जात आहे.

पाकिस्तानचा बचावात्मक पवित्रा

दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या हल्ल्याशी इस्लामाबादचा काहीही संबंध नसल्याचे वक्तव्य केले. परंतु त्यांनी या हल्ल्याचा निषेध करण्याचे टाळले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करत हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त केली, मात्र त्यास ‘दहशतवादी हल्ला’ म्हणणे टाळले. भारताने या दुहेरी भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पाकिस्तानवर हल्ल्याला पाठिंबा देणाऱ्या गटांचे समर्थन केल्याचा आरोप केला आहे.

अरबी समुद्रात तणावाची छाया

पाकिस्तानच्या युद्धनौकांनी सुरू केलेला सराव, विशेषतः अत्याधुनिक क्षेपणास्त्र डागण्याचा सराव, हा भारताच्या हालचालींना उत्तर देण्यासाठी असल्याचे लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे. हा सराव सामान्य सराव नसून, भारताला संदेश देण्याचा एक प्रयत्न असल्याचे मानले जाते. मात्र भारत या प्रकारच्या दडपणांना भीक घालणार नाही, असे स्पष्ट संकेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025: पंचायती राज म्हणजे काय? पंतप्रधान मोदी आज ‘या’ व्यक्तींना करणार पुरस्कार प्रदान

भारत निर्धाराने पुढे, कारवाई अपरिहार्य

पहलगाममधील निर्दोष नागरिकांच्या हत्येमुळे भारत आता निर्णायक भूमिका घेण्याच्या मार्गावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत, आणि दहशतवाद्यांना, तसेच त्यांच्या पाठराखण करणाऱ्यांना याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. पाकिस्तानचा क्षेपणास्त्र सराव आणि राजकीय बचावात्मक पवित्रा हे फक्त घबराटीचे लक्षण आहेत, पण भारताची कारवाई केवळ सुरक्षेची गरज नाही, तर राष्ट्राच्या आत्मसन्मानाशी जोडलेली आहे – आणि ती लवकरच प्रत्यक्षात दिसू शकते.

Web Title: India on offensive after pahalgam attack pakistan on alert as missile drills start

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन
1

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
2

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल
3

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल

Pakistan airspace crores loss : पाकिस्तानचं निघालं दिवाळं! भारताला हवाई क्षेत्र बंद केल्याने झाले कोट्यवधींचे नुकसान
4

Pakistan airspace crores loss : पाकिस्तानचं निघालं दिवाळं! भारताला हवाई क्षेत्र बंद केल्याने झाले कोट्यवधींचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.