Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

J&K attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याने जग हादरले, 26 निष्पापांचा मृत्यू, आंतरराष्ट्रीय निषेध

J&K attack: जम्मू आणि काश्मीरमधील शांततेच्या प्रतिक मानल्या जाणाऱ्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड हल्ला करत 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 23, 2025 | 08:24 AM
काश्मिरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याची तयारी सुरु; दोन विमानं सज्ज

काश्मिरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याची तयारी सुरु; दोन विमानं सज्ज

Follow Us
Close
Follow Us:

श्रीनगर (22 एप्रिल) : जम्मू आणि काश्मीरमधील शांततेच्या प्रतिक मानल्या जाणाऱ्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड हल्ला करत 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. बैसरन या पर्यटनस्थळी झालेल्या या क्रूर हल्ल्यामुळे संपूर्ण जगातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत, तर भारतात शोक आणि संतापाचं वातावरण आहे.

भ्याड हल्ला, निष्पापांचा मृत्यू

मंगळवारी, २२ एप्रिल रोजी, पहलगामच्या बैसरन भागात दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला, यात अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिक जखमी झाले. २६ लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना त्या भागातील पर्यटन व्यवसायासाठी मोठा धक्का ठरली आहे. दहशतवादी संघटना TRF ने या भ्याड कृत्याची जबाबदारी स्वीकारली आहे. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेल्या या संघटनेने यापूर्वीही अनेक वेळा अशा प्रकारचे हल्ले केले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Myanmar Earthquake: म्यानमारमधील भूकंपाबद्दल धक्कादायक खुलासा; जमीन 20 फूट सरकली

पाकिस्तानी तज्ज्ञांकडून निषेध

या घटनेबाबत पाकिस्तानी युट्यूबर कमर चीमा आणि अमेरिकास्थित पाकिस्तानी वंशाचे तज्ज्ञ साजिद तरार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. कमर चीमा यांनी “हा हल्ला निष्पाप नागरिकांवर असून, अशा घटनांचा कोणताही न्याय नाही” असे स्पष्टपणे सांगितले. साजिद तरार यांनी अधिक ठाम भूमिका घेत, “या हल्ल्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. भारत-पाकिस्तान संबंध आधीच तणावपूर्ण आहेत. अशा घटनांमुळे ते आणखी बिघडू शकतात” असे म्हटले. त्यांनी हेही सांगितले की, “जर भारताकडे पाकिस्तानविरोधी पुरावे असतील, तर पाकिस्तानने ते मान्य करून योग्य स्पष्टीकरण द्यावे, हीच जबाबदारीची भूमिका असेल.”

जागतिक पातळीवर संताप, भारताला पाठिंबा

पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिका, रशिया, इस्रायल, इराण आणि श्रीलंका या देशांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. “दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे”, अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे. या घटनांमुळे जागतिक स्तरावर भारतावरील दहशतवादी हल्ल्यांविषयी पुन्हा चिंता व्यक्त होत आहे.

भारतीय लष्कराची तात्काळ कारवाई

या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने प्रतिक्रिया देत सांगितले की, “संयुक्त सुरक्षा दल परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.” याचबरोबर जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत संयुक्त शोध मोहीमही सुरू झाली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम परिसरात विशेष पथके तैनात करण्यात आली असून, हल्लेखोरांना लवकरात लवकर शोधून शिक्षा देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जिना हाऊस’ बनणार डिप्लोमॅटिक एन्क्लेव्ह; परराष्ट्र मंत्रालयाने दिली मंजुरी, हैदराबाद हाऊससारखे काम करणार

दहशतवादाला ठोस उत्तर देण्याची गरज

पहलगाम येथील हल्ल्याने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, दहशतवादी अजूनही जम्मू-काश्मीरच्या शांततेला बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा हल्ल्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून ठोस उत्तर देणे आवश्यक आहे. भारत सरकार आणि सुरक्षा यंत्रणा या घटनेनंतर अधिक सक्रिय झाल्या असून, नवे उपाययोजना आखून अशा घटनांना आळा घालण्याची गरज अधोरेखित झाली आहे. जगभरातून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे भारत अधिक ठामपणे दहशतवादाविरोधात उभा राहील, आणि या हल्ल्याचा सूड घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, ही भावना देशभरात तीव्रतेने उमटत आहे.

Web Title: Pahalgam terror attack kills 26 draws global outrage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 08:24 AM

Topics:  

  • Jammu Kashimir
  • Jammu Kashmir News
  • Terrorist Attack

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.