Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानात पुन्हा रक्तरंजित मोहीम! खैबर पख्तूनख्वात लष्कराची मोठी कारवाई; 55 हजार विस्थापित, लाखो लोक कर्फ्यूमध्ये कैद

Operation Sarbakaf : सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बाधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे आणि अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था केली जात आहे. जाणून घ्या काय आहे सद्यस्थिती?

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 13, 2025 | 09:56 AM
Pakistan army’s major Khyber Pakhtunkhwa offensive against TTP displaces 55k locks lakhs under curfew

Pakistan army’s major Khyber Pakhtunkhwa offensive against TTP displaces 55k locks lakhs under curfew

Follow Us
Close
Follow Us:

Operation Sarbakaf : दहशतवादाविरुद्धच्या मोहिमेत स्वतःच्या नागरिकांवर कारवाई करण्याची कुप्रसिद्ध परंपरा असलेल्या पाकिस्तानी लष्कराने पुन्हा एकदा खैबर पख्तूनख्वा प्रांताला रणांगण बनवले आहे. बाजौर जिल्ह्यातील लोई मामुंड आणि वार मामुंड तहसीलमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) विरुद्ध मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू झाली आहे. या ऑपरेशनमुळे ५५ हजारांहून अधिक नागरिकांनी घर सोडले असून, सुमारे ४ लाख लोक कठोर कर्फ्यूमुळे घरातच अडकले आहेत.

अयशस्वी शांतता चर्चेनंतर पुन्हा कारवाई

अहवालानुसार, अलीकडेच तालिबान कमांडर्ससोबत झालेल्या शांतता चर्चेला अपयश आल्याने २९ जुलै रोजी “ऑपरेशन सरबकाफ” पुन्हा सुरू करण्यात आले. चर्चेद्वारे दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात पाठविण्याचा प्रयत्न झाला होता; परंतु सलग अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्यानंतर लष्कराने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने २७ संवेदनशील भागांमध्ये १२ ते ७२ तासांचा कर्फ्यू लागू केला आहे. परिणामी हजारो कुटुंबांचा अन्न, पाणी आणि औषधांच्या टंचाईचा सामना होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-US Relations: भारत-अमेरिका संबंधांमध्ये निर्णायक क्षण? जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदी-ट्रम्प भेटीची शक्यता

नागरिकांचे हाल : “सरकारने पुरेशी व्यवस्था नाही”

अवामी नॅशनल पार्टीचे खासदार निसार बाज यांनी खैबर पख्तूनख्वा विधानसभेत सरकारवर तीव्र आरोप केले. त्यांनी स्पष्ट केले की, “कर्फ्यूमुळे लाखो लोक घरातच कैद झाले आहेत. सुरक्षित ठिकाणी जाण्याचा मार्ग बंद आहे. विस्थापित नागरिकांसाठी सरकारकडे ना पुरेशी साधने आहेत ना नियोजन.” अनेकांना तंबूंमध्ये, तर काहींना सार्वजनिक इमारतींमध्ये रात्र काढावी लागत आहे. वाहतूक सुविधा ठप्प झाल्याने महिलां, लहान मुलां व वृद्धांचा त्रास प्रचंड वाढला आहे.

अधिकाऱ्यांचा दावा : “सुरक्षित स्थळी हलवले जात आहे”

दरम्यान, सरकारी अधिकाऱ्यांचा दावा आहे की बाधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी नेले जात आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार मुबारक खान झैब यांनी सांगितले की, शाळांना तात्पुरते निवारे बनवण्यात आले असून, अन्न आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने खार तहसीलमधील १०७ शैक्षणिक संस्थांना मदत छावण्या म्हणून निश्चित केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Missile Test : पुतिन-ट्रम्प बैठकीपूर्वी रशियाची अणुशक्तीची धमाकेदार चाचणी? ‘बुरेवेस्टनिक’मुळे जागतिक तणाव वाढणार

दीर्घ इतिहासाचा पुनरुच्चार

मानवाधिकार संघटनांच्या मते, दहशतवादविरोधी कारवाईच्या नावाखाली पाकिस्तानी लष्कर स्वतःच्या नागरिकांवर अन्याय करत असल्याचा इतिहास जुना आहे. खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान आणि आदिवासी भागांमध्ये पूर्वीही अशा मोहीमांत हजारो लोक विस्थापित झाले होते. आज पुन्हा त्याच पद्धतीने ‘दहशतवाद निर्मूलन’च्या आड निरपराध नागरिकांवर संकट कोसळले आहे. एका बाजूला तालिबानच्या धमक्या आणि दुसऱ्या बाजूला लष्कराची कठोर कारवाई या दुहेरी टोकांमध्ये अडकलेले सामान्य नागरिक सुरक्षिततेसाठी संघर्ष करत आहेत.

Web Title: Pakistan armys major khyber pakhtunkhwa offensive against ttp displaces 55k locks lakhs under curfew

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 09:56 AM

Topics:  

  • pakistan
  • pakistan army
  • Taliban Government
  • third world war

संबंधित बातम्या

Kissing To CM: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन; पाकिस्तानमध्ये बवाल! Viral Video पाहून तुम्हीही व्हाल गपगार
1

Kissing To CM: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन; पाकिस्तानमध्ये बवाल! Viral Video पाहून तुम्हीही व्हाल गपगार

युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? 25 वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारी
2

युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? 25 वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारी

Fake Indian Currency Case : पाकिस्तान-नेपाळशी संबंधित बनावट नोटा प्रकरणात NIAने आणखी एका आरोपीला केली अटक
3

Fake Indian Currency Case : पाकिस्तान-नेपाळशी संबंधित बनावट नोटा प्रकरणात NIAने आणखी एका आरोपीला केली अटक

Independence Day 2025 Live: लाल किल्ल्यावरून PM मोदींचे सर्वात दीर्घकाळाचे भाषण, 103 मिनिट्स बोलून पाकिस्तानला इशारा
4

Independence Day 2025 Live: लाल किल्ल्यावरून PM मोदींचे सर्वात दीर्घकाळाचे भाषण, 103 मिनिट्स बोलून पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.