Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानला बालाकोट एअर स्ट्राईक विसरणे अशक्य; भारताविरोधात पुन्हा अपप्रचार सुरू

बालाकोट एअर स्ट्राईकच्या पाचव्या वर्षपूर्तीनिमित्त पाकिस्तानने भारताविरोधात नवा अपप्रचार सुरू केला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने केलेल्या बालाकोट एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तान अजूनही हादरला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 25, 2025 | 12:14 PM
Pakistan unable to forget Balakot air strike propaganda against India resumes

Pakistan unable to forget Balakot air strike propaganda against India resumes

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : बालाकोट एअर स्ट्राईकच्या पाचव्या वर्षपूर्तीनिमित्त पाकिस्तानने भारताविरोधात नवा अपप्रचार सुरू केला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने केलेल्या बालाकोट एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तान अजूनही हादरला आहे. आता या हल्ल्याला खोटे ठरवण्यासाठी आणि काश्मीरबाबत चुकीचे कथन निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडून सोशल मीडियावर आणि सार्वजनिक कार्यक्रमांद्वारे अपप्रचार सुरू करण्यात आला आहे.

सोशल मीडियाद्वारे भारताविरोधात षडयंत्र

पाकिस्तान सरकारने सोशल मीडियाला एक महत्त्वाचे शस्त्र बनवले असून, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून भारताविरोधात खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. पाकिस्तानकडून ट्विटरवर #FalseFlagOperations, #IndianSurgicalDrama, #OperationSwiftRetort, #TeawasFantastic आणि #TeaisFantastic असे हॅशटॅग वापरून भारतविरोधी प्रचार केला जात आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानी लष्कर आणि ISI काश्मीरमधील काही संघटनांचा वापर करून भारताच्या विरोधात खोटे दावे करत आहेत. या माध्यमातून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न करत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Germany cannabis export : जर्मनीमध्ये दरवर्षी होते 9 अब्ज रुपये कमाई तरीही गांजाची शेती का आली धोक्यात?

बालाकोट हल्ल्यामुळे पाकिस्तान अजूनही अस्वस्थ

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेने भ्याड हल्ला करून ४० भारतीय जवानांना शहीद केले होते. या घटनेनंतर भारताने २६ फेब्रुवारी रोजी बालाकोटमध्ये हवाई हल्ला करून जैश-ए-मोहम्मदच्या तळाचा निःपात केला. या स्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली. भारतीय लष्कराच्या या प्रभावी प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान आजही अस्वस्थ आहे. त्यामुळेच या हल्ल्याविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित करत तो या कारवाईला चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करत आहे.

पाकिस्तानचा नवा कट, २७ फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय परिषद’

पाकिस्तानने २७ फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) “काश्मीर संघर्ष, शांतता आणि स्थिरतेसाठी पाकिस्तानच्या उपाययोजनांची पुष्टी” या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. CISS AJK नावाची संस्था या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे, आणि तो मुझफ्फराबादमधील पर्ल कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये होणार आहे. या परिषदेत पाकिस्तानी पंजाब सरकारचे मंत्री आणि शीख नेते सरदार रमेश सिंग अरोरा यांच्यासह काही विशिष्ट लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. “बालाकोट स्ट्राइक्स: रीइन्फोर्समेंट ऑफ पाकिस्ताननेस” या विषयावर भाषणही होणार आहे, ज्याचा हेतू बालाकोट स्ट्राईकला खोटे ठरवणे हा आहे.

भारतीय सुरक्षा यंत्रणांची करडी नजर

पाकिस्तानच्या या नापाक कारस्थानावर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे. पाकिस्तानच्या सोशल मीडिया नेटवर्कचे बारकाईने निरीक्षण केले जात असून, कोणत्या गटांकडून भारतविरोधी प्रचार केला जात आहे, हे शोधण्यासाठी व्यापक विश्लेषण सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी एजन्सींनी नुकतेच “पुलवामा क्रायसिस: ब्रेचरचे फोर-स्टेज क्रायसिस मॉडेल” नावाचे दिशाभूल करणारे इन्फोग्राफिक प्रसिद्ध केले आहे. यात पुलवामा हल्ल्यात ४४ भारतीय जवान शहीद झाल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे, प्रत्यक्षात ही संख्या ४० होती. एवढेच नव्हे, तर या बनावट अहवालात भारताने पाकिस्तानला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिल्याचा असत्य आरोप करण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आशिया खंडाला धडकणार ऑस्ट्रेलिया; वेगाने सरकत आहे उत्तरेकडे, जाणून घ्या काय होणार परिणाम

भारताविरोधात अपप्रचाराची नवी खेळी

बालाकोट हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या अपयशाची कटुता त्याच्या मनात कायम आहे. त्यामुळेच तो भारताविरोधात खोटे कथानक रचून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, भारतीय सुरक्षा यंत्रणांचे सततचे निरीक्षण आणि कठोर रणनीतीमुळे पाकिस्तानचा हा अपप्रचार यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे. भारतातील संरक्षण तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानकडून सातत्याने अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात असून, भारताने त्याला योग्य उत्तर देण्याची तयारी ठेवली पाहिजे.

Web Title: Pakistan unable to forget balakot air strike propaganda against india resumes nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • india
  • pakistan
  • Pulwama Attack

संबंधित बातम्या

India Real Estate : भारतीय हाऊसिंग मार्केटवर फिडेलिटीचा विश्वास; लोधा डेव्हलपर्समध्ये विकत घेतला 2% हिस्सा
1

India Real Estate : भारतीय हाऊसिंग मार्केटवर फिडेलिटीचा विश्वास; लोधा डेव्हलपर्समध्ये विकत घेतला 2% हिस्सा

काय सांगता! भारताच्या पहिल्या Mumbai-Ahmedabad Bullet Train ची प्रतीक्षा संपणार, ‘या’ मार्गावर होणार हाय-स्पीड ट्रेनची चाचणी
2

काय सांगता! भारताच्या पहिल्या Mumbai-Ahmedabad Bullet Train ची प्रतीक्षा संपणार, ‘या’ मार्गावर होणार हाय-स्पीड ट्रेनची चाचणी

Jan Vishwas Act : ‘चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा’; जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि MSME क्षेत्राला केंद्र सरकारचा मोठा दिलासा
3

Jan Vishwas Act : ‘चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा’; जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि MSME क्षेत्राला केंद्र सरकारचा मोठा दिलासा

Terrorist Death : भारताच्या आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा अंत! हाफिज सईदचा निकटवर्तीय आणि LeT कमांडर गाझी मुमताजचा मृत्यू
4

Terrorist Death : भारताच्या आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा अंत! हाफिज सईदचा निकटवर्तीय आणि LeT कमांडर गाझी मुमताजचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.