Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘संरक्षणाच्या बाबतीत आपण भारतापेक्षा खूप पुढे…’ पाकिस्तानी व्यक्तीच्या दाव्यावर नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Pakistani defense claims : पाकिस्तानातील एका युट्यूबरच्या व्हिडीओमुळे सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. पाकिस्तानचं लष्कर बलवान असल्याचा दावा करताच एका व्यक्तीला समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 19, 2025 | 02:26 PM
Pakistani man claims they're ahead of India in defense gets mocked online

Pakistani man claims they're ahead of India in defense gets mocked online

Follow Us
Follow Us:

इस्लामाबाद : पाकिस्तानातील एका युट्यूबरच्या व्हिडीओमुळे सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. पाकिस्तानच्या युट्यूबर शोएब चौधरी यांनी नागरिकांशी संवाद साधताना १९७१ च्या युद्धात झालेल्या पराभवावर आणि बांगलादेशच्या माफीच्या मागणीवर प्रतिक्रिया जाणून घेतली. मात्र यावेळी एका व्यक्तीने भारताच्या लष्करापेक्षा पाकिस्तानचं लष्कर बलवान असल्याचा दावा करताच, त्याला समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे.

१९७१ च्या युद्धावरून पाकिस्तानला माफी मागावी का?

पाकिस्तानने १९७१ मध्ये झालेल्या युद्धात बांगलादेश (माजी पूर्व पाकिस्तान) मध्ये केलेल्या अत्याचाराबाबत माफी मागावी, अशी मागणी बांगलादेश सरकारने अधिकृतपणे केली आहे. या पार्श्वभूमीवर शोएब चौधरी यांनी सामान्य जनतेला विचारले की, पाकिस्तानने माफी मागावी का? लोकांच्या प्रतिक्रिया संमिश्र होत्या. काहींनी या मागणीला पाठिंबा दिला, काहींनी याला विरोध केला. पण चर्चा गाजली ती एका वकिलाच्या वक्तव्यामुळे. त्या व्यक्तीने म्हटले की, “आपले लष्कर भारत, चीन आणि रशियापेक्षा अधिक मजबूत आहे. आपल्याकडे खूप ताकद आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भूकंपाने अफगाणिस्तान हादरले, जम्मू-काश्मीरपर्यंत जाणवले धक्के; तीव्रता 5.9 रिश्टर स्केलवर

“चंद्रावर पोहोचलो असतो!”  दुसऱ्या नागरिकाची उपहासात्मक टीका

या विधानावरच दुसऱ्या एका नागरिकाने त्याला थेट सवाल केला, “जर आपले लष्कर खरोखरच चीन, भारत आणि रशियापेक्षा बलवान असेल, तर आपण आजवर एकही युद्ध का जिंकू शकलो नाही?” त्याने पुढे उपहासात्मक शैलीत म्हटले की, “जर ते खरंच असतं, तर आपण चंद्रावर पोहोचलो असतो!” हा संवाद ऐकताच गर्दीत उपस्थित नागरिक हसून दाद देऊ लागले. सोशल मीडियावरही लोकांनी यावर विनोदांचे आणि उपहासपूर्ण प्रतिक्रियांचे स्फोट केले. अनेकांनी म्हटले की, पाकिस्तान अजूनही वास्तव स्वीकारत नाही आणि इतिहासाचे खरे दर्शन घ्यायला तयार नाही.

भारत-पाकिस्तान युद्धांचा इतिहास

भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्वातंत्र्यानंतर चार प्रमुख युद्धे झाली आहेत:

1.  1947-48 चे युद्ध: काश्मीरच्या मुद्यावरुन झालेलं हे पहिले युद्ध होतं.

2. 1965 चे युद्ध: हे युद्ध 17 दिवस चालले आणि दोन्ही बाजूंना मोठं नुकसान झालं.

3. 1971 चे युद्ध: या युद्धात भारताने निर्णायक विजय मिळवला. सुमारे 15,000 चौरस किलोमीटर पाकिस्तानी जमीन भारतीय सैन्याने ताब्यात घेतली होती आणि पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेश बनला.

4. 1999 कारगिल युद्ध: हे पाकिस्तानसाठी सर्वात लज्जास्पद पराभवांपैकी एक मानले जाते. भारतीय सैन्याने पाकिस्तानी घुसखोरांना परत ढकलले आणि उंच पर्वतशिखरांवर कब्जा मिळवला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : श्रीलंकेचा भारताभिमुख निर्णय; उचलले ‘असे’ पाऊल पाकिस्तान पडला तोंडावर

नेटकऱ्यांचा संताप आणि विनोदाचं साम्राज्य

ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या व्हिडीओचे क्लिप्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी वकिलाच्या वक्तव्याला “वास्तवापासून दूर” आणि “स्वप्नातले जग” असे संबोधले आहे. काहींनी लिहिले की, “इतिहास शिकला असता, तर असे बोलले नसते.” तर काहींनी कारगिल युद्धात भारतीय जवानांनी लढवलेली शौर्यगाथा सांगताना लिहिले की, “भारताचे जवान लाहोरपर्यंत पोहोचले आणि चहा प्याले, हे विसरता कामा नये.”

 इतिहासाकडे डोळसपणे पाहण्याची गरज

या घटनेने पुन्हा एकदा हे स्पष्ट केले की इतिहासाचा अभ्यास आणि वास्तवाची स्वीकारार्हता कोणत्याही राष्ट्रासाठी अत्यावश्यक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीला सत्य माहिती सहज उपलब्ध होत आहे, आणि चुकीच्या गोष्टींवर त्वरित प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पाकिस्तानमधील नागरिकांमध्ये विचारमंथन होत असल्याची ही घटना एक सकारात्मक बाब असली तरी, त्यासाठी स्वत:च्या चुका स्वीकारण्याची तयारीही तितकीच महत्त्वाची आहे.

Web Title: Pakistani man claims theyre ahead of india in defense gets mocked online nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • india
  • international news
  • pakistan

संबंधित बातम्या

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?
1

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर
2

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
3

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

चीनला बसणार मोठा धक्का! India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan ; ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा
4

चीनला बसणार मोठा धक्का! India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan ; ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.