Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किती वर्ष झाल्यानंतर कारचे टायर बदलले पाहिजे? प्रत्येक कार चालकाला ‘ही’ गोष्ट ठाऊक हवीच

आपली कार मेंटेन ठेवणे हे फार महतवाचे असते. जर तिला योग्यरित्या मेंटेन ठेवले नाही तर याचा परिणाम कारच्या परफॉर्मन्सवर होऊ शकतो.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 13, 2024 | 07:30 AM
फोेटो सोैजन्य: iStock

फोेटो सोैजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

आपली स्वतःची कार असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हल्ली हे स्वप्न ईएमआयच्या मदतीने अनेक जण पूर्ण करू शकतात. तसेच मार्केटमध्ये अनेक उत्तम फीचर्स असणाऱ्या दमदार कार्स देखील लाँच होत आहे ज्या ग्राहकांना आकर्षित करत आहे. परंतु कार विकत घेतल्यानंतर समजते की तिला मेंटेन ठेवणे हे तिला विकत घेण्यापेक्षा सुद्धा महाग आहे.

कार मेंटेन ठेवताना अनेक गोष्टींवर लक्ष दिले गेले पाहिजे. यातीलच एक गोष्ट म्हणजे कारचे टायर. कार जुनी व्हायला लागल्यानंतर अनेक जण कारमधील पार्ट्स बदलतात, त्याचप्रमाणे ते कारचे टायर देखील बदलतात का?

जास्त कार चालकांचे लक्ष टायरच्या लाइफवर नसतेच. बहुतेक कार चालक टायर फुटल्यावरच त्यांच्या कारमध्ये नवीन टायर बसवतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. वास्तविक, कारच्या टायर्सची सुद्धा एक लाइफ असते आणि जर ते वयापेक्षा जास्त वापरले गेले तर ते खूप धोकादायक ठरू शकते. यामुळे तुमची कार अपघाताला बळी पडू शकते. जर तुम्ही अजूनही याविषयी अनभिज्ञ असाल तर आज आम्ही तुम्हाला कारचे टायर किती काळ वापरता येऊ शकते, याबद्दल सांगणार आहोत.

Kia Carnival खरेदी करण्यासाठी किती करावे लागेल डाउन पेमेंट? जाणून घ्या EMI चं पूर्ण गणित

वर्षानुसार

जरी टायरचे ट्रेड नीट दिसत असले तरी रबराची गुणवत्ता कालांतराने खराब होत असते. 5-6 वर्षांच्या वापरानंतर ते बदलले गेले पाहिजे. काही उत्पादकांनी शिफारस केली आहे की 10 वर्षांपेक्षा जुने टायर्स बदलले गेले पाहिजेत. जरी ते कमी प्रमाणात वापरले गेले असले तरीही.

मायलेजनुसार

साधारणपणे टायर 40,000 ते 60,000 किलोमीटरपर्यंत टिकू शकतात. तुम्ही नियमितपणे लांब पल्ल्याचा प्रवास करत असल्यास किंवा खराब रस्त्यांवर खूप वाहन चालवल्यास, टायर लवकर खराब होऊ शकतात.

बाप रे! गेल्या 5 वर्षात फक्त E -Challan जारी करून सरकारने कमावला ‘एवढा’ पैसा, मोजायला शून्य कमी पडतील

टायरची स्थिती

टायर ट्रेडची खोली किमान 1.6 मिमी असावी. जर ती या पेक्षा कमी असेल तर टायर बदलणे आवश्यक आहे. हे तपासण्यासाठी तुम्ही “ट्रेड वेअर इंडिकेटर” (TWI) पाहू शकता. टायरमध्ये क्रॅक, कट किंवा फुगवटा दिसल्यास, ते त्वरित बदला. टायर असमानपणे घासत असल्यास, यामुळे व्हील अलाइनमेंट किंवा बॅलन्सिंगची समस्या उद्भवू शकते.

ड्रायव्हिंगची स्थिती

खराब रस्त्यांवर जास्त ड्रायव्हिंग केल्याने टायरचे लाइफ कमी होते. अशा परिस्थितीत, टायर जलद झिजतात. अशावेळी ते लवकर बदलण्याची आवश्यकता असू शकते. कारमध्ये नियमितपणे जड वजन वाहून नेल्यास, टायर लवकर खराब होऊ शकतात.

खबरदारी घ्या

योग्य टायर प्रेशर ठेवा. कमी किंवा जास्त हवेमुळे टायर लवकर खराब होऊ शकतात. तुम्ही तुमच्या टायर्सच्या स्थितीकडे दुर्लक्ष केल्यास, यामुळे तुमची आणि इतरांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. खराब टायरमुळे कारची किंवा बाइकची पकड कमकुवत होऊ शकते, ब्रेकिंगचे अंतर वाढते आणि घसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे टायर वेळेवर बदलणे अत्यंत आवश्यक आहे.

Web Title: After how many years should car tires be changed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 07:30 AM

Topics:  

  • auto news
  • car care tips

संबंधित बातम्या

ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?
1

ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप
2

लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

‘हा’ हिशोब पक्का ठेवा! शोरूमचा मालक स्वतः Maruti Fronx ची चावी देईल हातात, EMI तर 15000 रुपयांपेक्षा कमी
3

‘हा’ हिशोब पक्का ठेवा! शोरूमचा मालक स्वतः Maruti Fronx ची चावी देईल हातात, EMI तर 15000 रुपयांपेक्षा कमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी
4

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.