Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नात्यांमधला जमाखर्च

  • By साधना
Updated On: Jul 23, 2023 | 06:00 AM
relationship

relationship

Follow Us
Close
Follow Us:

आज नातं कोणतंही असो आपण इतरांसाठी किती केलं आणि त्यांनी आपल्यासाठी किती केलं, याचा हिशोब लावला जातो. एक काळ होता जेव्हा नात्यांसाठी सर्व काही त्यागण्याची, सहन करण्याची ताकद होती. पण काळ गेला वेळ ही गेली. आज छोट्या छोट्या गोष्टींचा हिशोब ठेवला जातो. मी इतके कॉल आणि मेसेज केले पण समोरच्याने एकही नाही केला, असा ही हिशोब मांडला जातो. त्यावरून ही वाद व्हायला सुरुवात होते. सकाळची सुरुवात कोण ‘गुड मॉर्निंग’चा मेसेज पहिले करतो याची सुद्धा वाट बघितली जाते. किती क्षुल्लक गोष्टींची नोंद ठेवली जाते. पण प्रत्येक नात्यासाठी आपण किती केलंय याचा पाठपुरावा करायला हवा.

हल्ली पैसे काढायचे असतील तर आपलं बँकेत जाणं होत नाही. बँकांनी आता एटीएम कार्डची सेवा, सुविधा ग्राहकांना सहज उपलब्ध करून दिली आहे. एटीएममध्ये गेल्यावर आपण काय करतो? तर आपलं कार्ड काढतो, कार्ड मशिनमध्ये टाकतो. आपला पासवर्ड क्रमांक दाबतो, रक्कम टाकतो. मग मशिनचा खडखड असा आवाज येतो आणि पैसे बाहेर येतात. बरोबर ना? पण जर, एटीएममध्ये गेल्यावर कार्ड काढलं, कार्ड मशिनमध्ये टाकलं, आपला पासवर्ड दाबला, रक्कम टाकली, मग मशिनचा खडखड असा आवाज आला आणि पैसे आलेच नाहीत; मग पुन्हा कार्ड मशिनमध्ये टाकलं, पासवर्ड क्रमांक दाबला, रक्कम टाकली पुन्हा मशिनचा खडखड असा आवाज आला आणि पैसे आलेच नाहीत. का? का? असं का झालं?

आपण कधी हा विचार केलात का? आपण एटीएम कार्डने पैसे काढताना जर का खात्यात रक्कमच शिल्लक नसेल, तर मशिनमधून पैसे येतील का? नक्कीच नाही. मात्र मशिन खडखडाट नक्कीच करेल. याकरिता खात्यात रक्कम असणं गरजेच आहे. याचप्रकारे आपल्या स्नेहसंबंधांच्या बाबतीतही जर आपण नाती टिकविण्यासाठी किंवा दृढ करण्यासाठी कोणतीच सत्कृत्ये केली नाहीत, खात्यात शिल्लक टाकली नाही तर अडचणीच्या, दुःखाच्या वेळी आपल्या सोबत कुणीच नसेल. खात्यात रक्कमच नसेल तर मशिनमधून पैसे कसे येतील? म्हणून आपणही आपल्या नाते संबंधाचा जमाखर्च मांडला पाहिजे. त्यात आपल्या चुकांमुळे, अहंकारामुळे, स्वार्थामुळे, द्वेषबुद्धीने किंवा संपर्कात न राहिल्यामुळे दुरावलेली नाती खर्चात मोडतील, तर नातेसंबंध दृढ करण्यासाठी आपण केलेली सत्कृत्य व इतरांच्या आयुष्यात निःस्वार्थीपणे केलेलं योगदान आपल्या हीतसंबंधांची जमा दाखवतील. हा जमाखर्च आपल्या आयुष्यभर चालू राहतो. अधिक श्रीमंत होण्यासाठी जसं खात्यात जमा असणं गरजेचं आहे, तसं नाती बळकट करण्यासाठी नात्याचाही जमाखर्च पाहायलाच हवा.
जसे बँकेत पैसे जमा करण्यासाठी आपण कसे कसे पैसे जमा करतो, कमवतो. त्यातली काही रक्कम खर्च करतो तर काही पुढचा विचार करून जमा करतो. पुर्ण पगार आपण बँकेत जमा नाही करत. तसेच व्यावहारिक जीवनात नात्यातही आपण तेच करतो. जशी वेळ, जशी आवश्यकता त्याप्रमाणे आपण निर्णय घेतो. व्यवहार आणि नाती यांचा समतोल साधत कार्य करतो. फक्त भावुक झाले तर मग खर्चच खर्च होतो. पण थोडं समजुतीने विचार केला तर जमा आणि खर्च नीट सांभाळता येतो. नात्यांमध्ये जर जमा करायचं असेल तर जो शब्द आपण इतरांना देतो त्याचे पालन करणे महत्वाचे असते. कारण व्यक्ति खूप काही बोलून जातो मात्र करत काहीच नाही असं असेल तर तिथे जमा नाही तर उलट खर्चच होतो. नात्यांमध्ये आवश्यकता असते ती विश्वासाची जर तेच नसेल तर तिथे आपले बोलणे, वागणे हे वादास्पद होते. नातं म्हटलं की तिथे अपेक्षा ह्या आल्याच, आपण जर अपेक्षा करतो तर समोरची व्यक्ति आपल्याकडून अपेक्षा करते. हे सर्व स्वाभाविक असतं पण ते पुर्ण करणं तेवढंच कठीण. कारण सर्वांच्या अपेक्षा आपण पुर्ण नाही करू शकत. ज्यांच्या पूर्ण करतो तिथे थोडं जमा होतंही. मग पुढे वेळप्रसंगी ते नातं आपल्यासाठी काहीही करायला तयार  होतं.
एखाद्या व्यक्तीने काही चांगलं केलं की त्याचे कौतुक करणे, मदत करणे ही अशी गुंतवणूक असते की ती दीर्घकाळ चालते, आपल्या अडी-अडचणीला कामी येते. म्हणून अशी गुंतवणूक अधूनमधून करत राहिले पाहिजे. बाकी खर्चाचे ज्ञान तर आपल्याला आहेच. खर्च कसा करावा हे शिकवायची गरज नसते. पण कुठे करावा हे मात्र शिकणे आवश्यक असते. आयुष्यात नाती जपणे ही सुद्धा एक कला आहे. नाती कमवणं हे सर्वांनाच येत नाही. नात्यांना महत्व द्या, कारण तीच तर खरी पुंजी आहे.
– नीता बेन
bkneetaa24@gmail.com

Web Title: How to maintain relationship know the tips nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • Marathi News
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
2

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
3

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
4

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.