वसई येथील काँग्रेस भवनात १५ फेब्रुवारी २०२६ रोजी अनधिकृत प्रवेश करून गैरवर्तन व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह काही सहकाऱ्यांवर करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (पर्यावरण विभाग) यांच्या वतीने वसई पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांवर भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून भाजप पदाधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमुळे विरार परिसरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वसई येथील काँग्रेस भवनात १५ फेब्रुवारी २०२६ रोजी अनधिकृत प्रवेश करून गैरवर्तन व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह काही सहकाऱ्यांवर करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (पर्यावरण विभाग) यांच्या वतीने वसई पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांवर भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून भाजप पदाधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमुळे विरार परिसरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.