Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये; कराव्या लागतील ‘या’ गोष्टी… 31 जुलैपर्यंत अर्जाची मुदत!

राज्यातील अन्नधान्य- कडधान्य तसेच गळीत पिकांच्या उत्पादनात वाढ व्हावी. यासाठी महाराष्ट्र सरकारकडून राज्यांतर्गत पीक स्पर्धा घेतली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ३१ जूलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत असणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 06, 2024 | 09:38 AM
Farming

Farming

Follow Us
Follow Us:

राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पिकांचे उत्पादन घेताना स्पर्धा तयार व्हावी. यासाठी कृषी विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध प्रयोग करुन पीक उत्पादकतेत वाढ करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे बक्षीस मिळणार आहे. कृषी विभागामार्फत खरीप हंगामाच्या सुरुवातीला राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी अन्नधान्य, कडधान्य आणि गळीत पिकांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यपातळीवर प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यास यात ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळणार असून, शेतकऱ्यांना ३१ जूलैपर्यंत या स्पर्धेसाठी अर्ज करता येणार आहे. तालुका पातळीवर ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून, सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकरी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. मूग, उडीद पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असून, भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमुग, व सुर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.
(फोटो सौजन्य : istock)

काय आहे पात्रता?

– प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र शुल्क असून सर्वसाधारण गटातील शेतकऱ्याला ३०० रुपये तर आदिवासी गटासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क आहे.
– स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वत:ची जमीन असणे आवश्यक असून ती तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे.
– एकापेक्षा अधिक पिकांसाठीही शेतकऱ्याला स्पर्धेत भाग घेता येतो.
– सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याला भात पीक किमान २० आर तर इतर पिकांच्या बाबतीत १ एकर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

– स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याला विहित नमुना अर्ज, प्रवेश शुल्क, सातबारा व ८-अ चा उतारा देणे आवश्यक आहे.
– आदिवासी शेतकऱ्याला जात प्रमाणपत्र देणे आवश्यक
– पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याला सातबाऱ्यावर घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकीत नकाशा, बँक खाते, चेक, किंवा पासबूकच्या पहिल्या पानाची प्रत देणे आवश्यक आहे.

किती असेल बक्षिसाची रक्कम?

– तालुका पातळीवर जिंकणाऱ्या शेतकऱ्याला पहिले बक्षीस ५ हजार रुपयांचे, दुसरे ३ हजार रुपयांचे तर तिसरे बक्षीस २ हजार रुपयांचे असणार आहे.
– जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस १० हजार, दुसरे ७ हजार तर तिसरे बक्षीस ५ हजारांचे असणार आहे.
– राज्य पातळीवर पहिले बक्षीस ५० हजार रुपयांचे असून, दुसरे ४० हजार तर तिसरे बक्षीस ३़० हजार रुपयांचे असणार आहे.

Web Title: Farmers will get rs 50000 for intra state crop competition for crops in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 10:08 PM

Topics:  

  • Agriculture News
  • kharif crops
  • maharashtra farmers

संबंधित बातम्या

E-Pik Pahani National Level: महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ मॉडेलची देशात अंमलबजावणी! १ ऑगस्टपासून ‘ॲग्री स्टॅग’शी जोडणी
1

E-Pik Pahani National Level: महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ मॉडेलची देशात अंमलबजावणी! १ ऑगस्टपासून ‘ॲग्री स्टॅग’शी जोडणी

Buldhana News: कपाशीपेक्षा सोयाबीनचाच दबदबा, राज्यात सर्वाधिक ३७.८% क्षेत्र व्यापले, सरासरी ८२ टक्के पेरणी
2

Buldhana News: कपाशीपेक्षा सोयाबीनचाच दबदबा, राज्यात सर्वाधिक ३७.८% क्षेत्र व्यापले, सरासरी ८२ टक्के पेरणी

तांत्रिक निकष रद्द करा; पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच 1068 कोटींचा विमा द्या; मुख्यमंत्र्यांकडे आमदार कैलास पाटील यांची मागणी
3

तांत्रिक निकष रद्द करा; पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच 1068 कोटींचा विमा द्या; मुख्यमंत्र्यांकडे आमदार कैलास पाटील यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.