Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Post Office: आता, फक्त पत्रेच नाही तर झाली डिजिटल क्रांती, डिजिटल योद्धा बनला ‘पोस्टमन’

२०२५ हे वर्ष भारतीय टपाल विभागासाठी परिवर्तनकारी वर्ष ठरले. या विभागाने आपली भूमिका केवळ पत्रांपुरती मर्यादित ठेवली नाही, तर सामान्य माणसावर लक्ष केंद्रित करणाऱ्या डिजिटल, आर्थिक आणि प्रशासकीय सेवांचा कणा बनली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 24, 2025 | 10:33 AM
India Post Account: भारतीय पोस्टमध्ये २२ लाख कोटींची बचत; ग्रामीण डाक सेवकांचा मोठा वाटा (फोटो-सोशल मीडिया)

India Post Account: भारतीय पोस्टमध्ये २२ लाख कोटींची बचत; ग्रामीण डाक सेवकांचा मोठा वाटा (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • ग्रामीण भारतासाठी गेमचेंजर ठरले भारतीय टपाल
  • ‘हर घर तिरंगा’मध्ये टपाल विभागाची आघाडी
  • डोअर-स्टेप KYC ते म्युच्युअल फंडसाठी फायदेशीर
 

India Post Office: २०२५ हे वर्ष भारतीय टपाल विभागासाठी परिवर्तनकारी वर्ष ठरले, दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या विभागाने आपली भूमिका केवळ पत्रांपुरती मर्यादित ठेवली नाही, तर सामान्य माणसावर लक्ष केंद्रित करणाऱ्या डिजिटल, आर्थिक आणि प्रशासकीय सेवांचा कणा म्हणून स्वतःला स्थापित केले आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या वर्षअखेरीसच्या पुनरावलोकनानुसार, भारतीय टपालाने विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात सेवांमध्ये असलेली कमतरता दूर करण्यासाठी त्याच्या विशाल नेटवर्कचा वापर केला आहे.

सामान्य नागरिकांना सुविधा प्रदान करण्यात विभागाची सर्वांत मोठी कामगिरी म्हणजे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांचा विस्तार, परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने, ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत देशभरात ४५२ पीओपीएसके कार्यरत होते, ज्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पासपोर्ट सेवा पोहोचल्या. जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान, विभागाने २.९ दशलक्षाहून अधिक पासपोर्टशी संबंधित अर्जावर प्रक्रिया केल्याने अर्जदारांना सुविधा मिळाली आणि यातून विभागाला ११४.८८ कोटींचा महसूल मिळाला.

हेही वाचा: New Zealand Visa: न्यूझीलंडचा मोठा निर्णय, भारतीय व्यावसायिकांना मिळणार ४ वर्षांचा वर्क व्हिसा

२०२५ मध्ये वित्तीय समावेशन विभागासाठी आर्थिक समावेशन आणि कनेक्टिकिटी ही प्राथमिकता राहिली. इंडिया पोस्टने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारासाठी जवळपास ५ लाख डोअर-स्टेप केवायसी पडताळणी पूर्ण केली. एएमएफआय, यूटीआय आणि एसबीआय म्युच्युअल फंड सारख्या प्रमुख कंपन्यांशी केलेल्या करारामुळे गुंतवणूक वितरणासाठी पोस्ट ऑफिस एक विश्वासार्ह माध्यम बनले. विभागाने बीएसएनएलशी करार करून दूरसंचार क्षेत्रात आपली पोहोच वाढवली.

सिम कार्ड विक्री आणि रिचार्ज आता १.६४ लाखांहुन अधिक पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत. ज्यामुळे डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारत आहे, विशेषतः मर्यादित नेटवर्क प्रवेश असलेल्या भागात, इंडिया पोस्टने इसी आणि आयआयटी हैदराबाद यांच्या सहकार्याने ‘डिजीपिन लाँच केले, ही १०-वर्णाची जिओ-कोडेड डिजिटल अॅड्रेस सिस्टम आहे जी भारतातील प्रत्येक ४४४ मीटर ग्रिडला विशिष्टपणे ओळखते.

त्याचप्रमाणे, आधार सेवा मजबूत करण्यात टपाल विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली. देशभरातील पोस्ट ऑफिसमधून १३,००० हुन अधिक आधार केंद्रे चालवली जात होती. राष्ट्रीय टपाल सप्ताहादरम्यान शाळांमध्ये  १,५०० हुन अधिक विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली. २०२५ मध्ये एकूण २३.५ दशलक्षाहून अधिक आधार नोंदणी आणि अपडेट्स करण्यात आले, ज्यामुळे १२९.१३ कोटींचा महसूल मिळाला.

हेही वाचा: Todays Gold-Silver Price: चांदीने घेतली उसळी, सोन्याचे दर काय सांगतात? जाणून घ्या सविस्तर

लघु उद्योग आणि कारागिरांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पोस्ट ऑफिस अंऑफिस एक्सपोर्ट सेंटर उपक्रमाचा विस्तार १,००० हून अधिक केंद्रापर्यंत करण्यात आला. यामुळे सुमारे २८० कोटीची निर्यात शक्य झाली, ज्याचा थेट फायदा महिला उद्योजक आणि एमएसएमईना झाला, रोजगार निर्मितीमध्ये योगदान देत, विभागाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातगत १.६९ लाख युनिट्सची प्रत्यक्ष पडताळणी केली. हर घर तिरंगा’ मोहीम ४.० अंतर्गत टपाल विभागाने २.८ दशलक्षाहून अधिक राष्ट्रध्वजाचे वाटप केले.

Web Title: India post office the digital warrior became a postman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 10:33 AM

Topics:  

  • aadhar card
  • digital
  • Indian Post
  • post office

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.