
सुनो गाँववालों! Aadhar Card हॅक होण्याची भीती वाटतेय? मग 'या' फीचरबद्दल एकदा वाचाच...
आधार कार्ड प्रत्येक भारतीयाची ओळख
आधार कार्डमध्ये एक खास फीचर्स
हॅक होऊ नये म्हणून आताच करा सुरू
आपण या देशात राहतो, आपण भारतात राहतो याचा काही ना की पुरावा असणे अवशेक असते. त्यातील प्रत्येक भारतीयांची ओळख सांगणार महत्वाचा पुरावा म्हणजे आधार कार्ड, आधार कार्ड आपण भारतीय आहोत याची ओळख आपल्याला देतो. सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी आधार कार्ड हा महत्वाचा भाग आहे. दरम्यान आधार आपली ओळख आहे. मात्र यातील आपली माहिती चोरी होऊ नये किंवा आपल्या आधार कार्डचा दुरुपयोग होऊ नये यासाठी यामध्ये एक खास फीचर देण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान यामध्ये वापरण्यात आले आहे.
सध्याच्या काळात आपली वैयक्तिक माहिती आणि डेटा सुरक्षित राहणे अत्यंत गरजेचे आहे. आधार कार्ड अधिक सुरक्षित करण्यासाठी UIDAI आपल्याला एक खास फीचर देते. यामध्ये आधार नंबर लॉक किंवा अनलॉक करण्याची सुविधा देते. यामुळे आधार कार्डचे काही फंक्शन्स प्रतिबंधित होतात.
आधार कार्ड आपण mAadhar वेबसाइट वर जाऊन ब्लॉक करू शकतो. लॉक केल्यानंतर आधार वापरकर्ते बायोमेट्रिक्स, डेमोग्राफिक्स, ओटीपीसाठी पुढील प्रक्रिया करू शकत नाहीत. चल तर मग आपण आधार कार्ड लॉक कसे करायचे त्याबाबत जाणून घेऊयात.
आधार कार्ड कसे लॉक करायचे?
1.सर्वात प्रथम तुम्ही http:/uidai.gov.in या वेबसाइटवर जावे.
2. त्यानंतर माय सेक्शनमध्ये जाऊन आधार लॉक/ अनलॉक या पर्यायावर क्लिक करावे.
3. तिथे तुम्हाला यूआयडी लॉक क्लिक करावे. त्यामध्ये पिन कोड टाकावा.
4. ओटीपीचा पर्याय देखील तुम्ही निवडू शकता.
5. लॉक झाल्यावर तुम्हाला एक मेसेज येईल.
देशात इंटरनेट युजर्सची संख्या ९५ कोटींपेक्षा जास्त
आजच्या युगात इंटरनेट हे मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. माहिती मिळवण्यापासून ते मनोरंजनापर्यंत सर्व गोष्टींसाठी आपण इंटरनेटवर अवलंबून आहोत. कोणत्याही विषयाची माहिती अवघ्या काही सेकंदात गुगल किंवा इतर सर्च इंजिनवर उपलब्ध होते. व्हॉट्सॲप, फेसबुक आणि ईमेलद्वारे जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी आपण त्वरित संवाद साधू शकतो. याचसंदर्भात एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये देशात इंटरनेट युजर्सची संख्या किती आहे, ही आकडेवारी समोर आली आहे.
देशात इंटरनेट युजर्सची संख्या सातत्याने वाढत असून गेल्या वर्षी, भारतातील इंटरनेट युजर्सची संख्या ८% ने वाढून ९५ कोटी ५० लाख झाली. इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) आणि Kantar यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे की इंटरनेट युजर्समध्ये ही वाढ ग्रामीण भागात इंटरनेटची उपलब्धता, लघु व्हिडिओंची वाढती लोकप्रियता आणि AI ची लोकप्रियता यामुळे झाली आहे.