Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वात मोठी बँक ‘देशाची तिजोरी’, ओसंडून वाहत आहेत रू. 6,76,55,99,50,00,000, कोण आहे मालक?

भारताच्या स्वातंत्र्याला चिरडून टाकण्यासाठी सुरू केलेली बँक, ज्याचे नाव, ओळखही अनेकदा बदलली, ज्या बँकेद्वारे भारताचे स्वतःचे पैसे भारतीयांविरुद्ध वापरले गेले, ती बँक आज देशातील सर्वात मोठी बँक आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 01, 2025 | 03:20 PM
देशातील सर्वात मोठी बँक नक्की कोणती (फोटो सौजन्य - iStock)

देशातील सर्वात मोठी बँक नक्की कोणती (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

भारताचे स्वातंत्र्य चिरडून टाकण्यासाठी खरं तर ही बँक सुरू झाली होती, जिचे नाव अनेक वेळा बदलले गेले, जिची ओळखही बदलली, ज्या बँकेद्वारे भारताचे स्वतःचे पैसे भारतीयांविरुद्ध वापरले गेले, ती बँक आज देशातील सर्वात मोठी बँक आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना? मनात कुतूहलही जागृत झालं असेल ना?  

ही देशातील सर्वात श्रीमंत बँकेची, स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) कहाणी आहे. देशातील ५० कोटी लोकांची या बँकेत खाती आहेत. याला ‘देशाची तिजोरी’ असेही म्हणतात, परंतु ही बँक नक्की कशी सुरू झाली आणि कशा पद्धतीने पुढे आली याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. आपण या लेखातून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStocK) 

SBI ची सुरूवात कशी झाली?

१७९८ मध्ये, रिचर्ड वेलेस्ली ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आले. त्यांनी एका वर्षानंतर म्हैसूरवर हल्ला केला. या हल्ल्यात टिपू सुलतानचा पराभव झाला, त्यानंतर दुसरे अँग्लो-मराठा युद्ध सुरू झाले. युद्धादरम्यान इंग्रजांना आर्थिक मदत करण्यासाठी, ईस्ट इंडिया कंपनीने एक बँकिंग व्यवस्था निर्माण केली. 

या बँकिंग व्यवस्थेद्वारे, भारताचे स्वतःचे पैसे इंग्लंडमार्गे भारतात परत येत होते आणि भारतीयांना फसवण्यासाठी वापरले जात होते. युद्ध संपल्यानंतर, इंग्रजांनी या व्यवस्थेचे बँकेत रूपांतर केले. १८०६ मध्ये, इंग्रजांनी निधी देणाऱ्या संस्थेचे नाव ‘बँक ऑफ कलकत्ता’ ठेवले.

SBI नाव कसे मिळाले?

१८०९ मध्ये ब्रिटिशांनी या बँकेचे नाव बदलून ‘बँक ऑफ बंगाल’ असे ठेवले, त्यानंतर हळूहळू या बँकेच्या शाखा सुरू होऊ लागल्या. नंतर बँकेचे नियंत्रण इंग्लंडच्या राणीच्या हाती गेले. १८४० मध्ये ब्रिटिशांनी ‘बँक ऑफ बॉम्बे’ आणि १८४३ मध्ये ‘बँक ऑफ मद्रास’ सुरू केले. १९२१ मध्ये या तिन्ही बँकांना एकत्र करून ‘इम्पीरियल बँक ऑफ इंडिया’ असे नाव देण्यात आले. 

स्वातंत्र्यानंतर १९५५ मध्ये तिचे नाव इम्पीरियल बँक ऑफ इंडिया वरून स्टेट बँक ऑफ इंडिया असे बदलण्यात आले. जर आपण बँकेच्या मालकाबद्दल माहिती घेत असू तर या बँकेचे मालक हे भारत सरकार आहे. ही बँक एकेकाळी ब्रिटिशांनी सुरू केली असली तरीही आता भारत शासन या बँकेचे मालक आहेत. 

GST मुळे सरकारची तिजोरी मालामाल! 5 वर्षात दुप्पट कलेक्शन; करदात्यांच्या संख्येतही कमालीची वाढ

SBI कशी बनली सर्वात मोठी बँक?

SBI च्या शाखा केवळ देशातच नव्हे तर परदेशातही पसरल्या. अनेक बँका त्यात विलीन झाल्या. एसबीआयच्या ग्राहकांची संख्या ५० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. तिच्या शाखा केवळ परदेशातच नव्हे तर देशातील खेड्यांमध्येही पोहोचल्या आहेत. 

एसबीआय म्हणजेच बँक असा बँकेचा अर्थ लोक समजू लागले आहेत. SBI देशाच्या आर्थिक रचनेत कणा म्हणून भूमिका बजावते. ही बँक ग्रामीण आणि शहरी भागात विस्तारत आहे. इतकेच नाही तर ती परदेशातही वेगाने विस्तारत आहे. कर्जाद्वारे बँक देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत आहे.

100 वर्ष जुनी खाती 

स्टेट बँक ऑफ इंडियाची नवी दिल्ली मेवात शाखा १०० वर्षांहून अधिक जुनी आहे. भारत आणि पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी या शाखेत आपली खाती उघडली होती. आजही १०० वर्षांहून जुनी अनेक बँक खाती या बँकेत सुरक्षित आहेत. रायसीना रोड शाखा ४ जानेवारी १९२६ रोजी सुरू झाली. 

दिल्ली सर्कलच्या व्यवसायात बँकेची ही शाखा सुमारे १४% योगदान देते. म्हणजेच सुमारे ७०,००० कोटी रुपये. जर आपण SBI बद्दल बोललो तर ती भारतातील सर्वात मोठी बँक आहे, ज्याचा भारती बँकिंग सिस्टीममध्ये २३% वाटा आहे. त्याच वेळी, एकूण कर्ज आणि ठेवी बाजारात तिचा २५% वाटा आहे.

Stock Market Today: गुंतवणूकदारांनो इकडे लक्ष द्या! अशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिला सल्ला

Web Title: India s biggest and richest bank sbi aka state bank of india who started how it becomes rich

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • Bank
  • Business News
  • SBI
  • State Bank of India

संबंधित बातम्या

Explainer: Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताय? ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
1

Explainer: Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताय? ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

बेरोजगारीचा धोका वाढतोय, भारताने रोजगार निर्मितीवर दुहेरी भर द्यावा; मॉर्गन स्टॅनलीचा अहवाल
2

बेरोजगारीचा धोका वाढतोय, भारताने रोजगार निर्मितीवर दुहेरी भर द्यावा; मॉर्गन स्टॅनलीचा अहवाल

Share Market Crash: शेअर बाजारात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले
3

Share Market Crash: शेअर बाजारात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

India’s GDP Growth: आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.5 टक्के दराने वाढेल, अमेरिकेच्या करांमुळे निर्यातीवर परिणाम
4

India’s GDP Growth: आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.5 टक्के दराने वाढेल, अमेरिकेच्या करांमुळे निर्यातीवर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.