Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारविरोधात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक; मंत्री विखेंच्या गावात करणार अन्नत्याग आंदोलन!

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दुधाला योग्य मिळत नसल्याने आक्रमक झाले आहे. अशातच आता शेतकऱ्यांनी आपले आंदोलन अधिक बनवण्यासाठी योजना आखली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडून १ जुलैपासून अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 30, 2024 | 03:07 PM
सरकारविरोधात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक; मंत्री विखेंच्या गावात करणार अन्नत्याग आंदोलन!

सरकारविरोधात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक; मंत्री विखेंच्या गावात करणार अन्नत्याग आंदोलन!

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आधीच दुधाला मिळणारा कमी दर, त्यात सरकारचे दूध पावडर आयात करण्याचे सरकारचे धोरण यामुळे संकटात सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. उद्यापासून अर्थात १ जुलैपासून दुध उत्पादक शेतकरी राज्यभर पदयात्रा काढणार आहे. पदयात्रा संपल्यानंतर अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य शेतकरी दूध उत्पादक संघटनेचे उपाध्यक्ष अजित काळे यांनी दिली आहे.

दूध दरासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार

दरम्यान, राज्यातील अन्य एका दूध उत्पादक संघटनेने याआधीच 25 जूनपासून राज्यभर रास्ता रोको अभियान सुरु केले आहे. अशातच आता महाराष्ट्र राज्य शेतकरी दूध उत्पादक संघटने देखील दूध दराच्या आंदोलनात उडी घेतली आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळावा, अशी या संघटनांची मागणी आहे. संघटनेच्या काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध दराचा प्रश्न आता थेट सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला जाणार आहे. त्या ठिकाणी डेअरी उत्पादक कंपन्यांविरोधात लढाई लढली जाणार आहे.

कसा असेल पदयात्रेचा मार्ग?

दूध उत्पादक शेतकरी संघटनेच्या माहितीनुसार, १ जुलै रोजी दुध उत्पादक शेतकऱ्यांची पदयात्रा सातारा जिल्ह्यातून सुरु होणार असून, ती दुसऱ्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावात पदयात्रेचा थांबा असणार आहे. पुढील तीन ते चार दिवसांत सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास अन्नत्याग आंदोलन केले जाईल. विशेष म्हणजे सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य शेतकरी दूध उत्पादक संघटनेचे उपाध्यक्ष अजित काळे यांनी सांगितले आहे की, “गेल्या 25 जूनपासून राज्यभरात रास्ता रोको आंदोलन केले जात आहे. हे आंदोलन 15 जुलैपर्यंत सुरूच राहणार आहे. विशेष म्हणजे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हे आंदोलन अधिक व्यापक केले जाणार असून, सरकारला दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत या माध्यमातून अवगत केले जाणार आहे.”

Web Title: Milk farmers aggressive against government food sacrifice movement in minister vikhe village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2024 | 03:04 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Radhakrishna Vikhe Patil

संबंधित बातम्या

Almatti Dam: ‘अलमट्टी धरण प्रकरणात केंद्र सरकारने…’; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची महत्वाची मागणी
1

Almatti Dam: ‘अलमट्टी धरण प्रकरणात केंद्र सरकारने…’; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची महत्वाची मागणी

फणसकिंग ठरलेले रत्नागिरी येथील देसाई पितापुत्राची आधुनिक शेतीतील यशोगाथा; फणस शेतीतून कमावतात कोट्यवधी
2

फणसकिंग ठरलेले रत्नागिरी येथील देसाई पितापुत्राची आधुनिक शेतीतील यशोगाथा; फणस शेतीतून कमावतात कोट्यवधी

Sangli News: “सिंचन प्रकल्प विहित वेळेत पूर्ण  होण्यासाठी…”; काय म्हणाले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील?
3

Sangli News: “सिंचन प्रकल्प विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी…”; काय म्हणाले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील?

बजेट, उत्पादन, MSP पासून KCC पर्यंत; गेल्या ११ वर्षांत देशाच्या कृषी क्षेत्रात झाले महत्वाचे बदल
4

बजेट, उत्पादन, MSP पासून KCC पर्यंत; गेल्या ११ वर्षांत देशाच्या कृषी क्षेत्रात झाले महत्वाचे बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.