Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक रुपयात ‘पीक विमा’ बंद होणार का? कृषिमंत्री कोकाटे यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती; म्हणाले…

कोट्यवधींचा हा घोटाळा असल्याची चर्चा आहे. यामुळे ही योजना बंद करण्यात येईल, अशी चर्चा झाली. शेतकऱ्यांसाठी ही योजना फायद्याची असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे ही योजना बंद झाल्यास खऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 14, 2025 | 01:34 PM
एक रुपयात 'पीक विमा' बंद होणार का? कृषिमंत्री कोकाटे यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती; म्हणाले...

एक रुपयात 'पीक विमा' बंद होणार का? कृषिमंत्री कोकाटे यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती; म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची अशी ठरत आहे. याच योजनेत मोठा घोटाळा झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता ही योजना बंद होईल, अशी चर्चा रंगली होती. यावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. ‘एक रुपयातील पीक विमा योजना बंद होणार नसून याच्या निकषात काही सुधारणा होतील’, असे स्पष्टीकरण कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

केंद्र सरकारकडून शेकतऱ्यांसाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली होती; परंतु ही योजना शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्याच्या हिताची असल्याची टीका झाली. त्यानंतर राज्य शासनाने नवीन पीक विमा योजना सुरू आणली. प्रायोगिक तत्त्वावर बीड जिल्ह्यात याचा प्रयोग केल्यानंतर राज्यभरही योजना राबविण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून ही योजना राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी फक्त एक रुपया भरावा लागत आहे. इतर रक्कम शासनाकडून भरण्यात येते; परंतु या योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे समोर आले. बोगस शेतकऱ्यांच्या नावे पीक विमा काढम्यात आला. राज्यभर हा प्रकार घडला.

कृषी विभागातील घोटाळ्याची नाही माहिती

एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात कृषी विभागात मोठा घोटाळा झाला. कृषी विभागाकडून अधिकच्या दराने साहित्य खरेदी करण्यात आले. निविदाही मॅनेज असल्याचे समोर आले. याबाबत कृषिमंत्री कोकाटे यांना याबाबत विचारले असता याविषयाची अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी विभागातील साहित्य खरेदीचा घोटाळा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेला असताना अद्याप विभागाच्या मंत्र्यांनी माहिती घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर कापूस, सोयाबीन खरेदीचा विषय पणन विभागाचा असल्याचे म्हणत बोलण्याचे टाळले.

कोट्यवधींचा हा घोटाळा

कोट्यवधींचा हा घोटाळा असल्याची चर्चा आहे. यामुळे ही योजना बंद करण्यात येईल, अशी चर्चा झाली. शेतकऱ्यांसाठी ही योजना फायद्याची असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे ही योजना बंद झाल्यास खऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असे सांगण्यात येते. परंतु ही योजना बंद होणार नसल्याचे कृषीमंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केले. बोगस विमा काढण्यात आला असून, कुणालाही रक्कम देण्यात आली नाही. संबंधित सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली. ही योजना बंद होणार नसून यात काही सुधारणा करण्यात येणार असल्याचे त्यांना माध्यमांशी बोलताना सांगितले.

Web Title: One rupee crop insurance will not be discontinued says manikrao kokate nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 01:34 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Manikrao Kokate

संबंधित बातम्या

Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक
1

Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक

राजू शेट्टींनी घेतली कृषीमंत्र्यांची भेट; शेतकऱ्यांसाठी केली ‘ही’ मोठी मागणी
2

राजू शेट्टींनी घेतली कृषीमंत्र्यांची भेट; शेतकऱ्यांसाठी केली ‘ही’ मोठी मागणी

Maharashtra Politics: ‘रमी’ प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, “लक्षात ठेवा…”;
3

Maharashtra Politics: ‘रमी’ प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, “लक्षात ठेवा…”;

महाराष्ट्रातील कृषीमंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट; ‘या’ पाच बड्या नेत्यांना सोडावं लागलं मंत्रिपद
4

महाराष्ट्रातील कृषीमंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट; ‘या’ पाच बड्या नेत्यांना सोडावं लागलं मंत्रिपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.