Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव; फवारणी खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीला!

राज्यात यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला. ज्यामुळे शेतकऱ्यांनी मृगाच्या पहिल्याच टप्प्यात पेरण्या आटोपल्या. मात्र, आता काही भागांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनसह अन्य पिकांवर पाने कुडतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 08, 2024 | 05:38 PM
ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव; फवारणी खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीला!

ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव; फवारणी खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीला!

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या वर्षी एल-निनोचा फटका त्यातच सोयाबीन पिकाला हमीभावाइतका दरही मिळाला नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या हंगामात उत्पादन खर्चही मिळाला नाही. अशातच आता यावर्षीच्या हंगामात सोयाबीन पिकावर आलेल्या पाने कुडतडणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी मेटाकुटीला आल्याचे पाहायला मिळत आहे. उगवण झालेल्या सोयाबीनचे जवळपास ३० ते ४० टक्के पाने ही अळी खाऊन टाकत आहे. ज्यामुळे ऐन प्राथमिक अवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात औषध फवारण्या घ्याव्या लागत आहेत.

वाढीच्या अवस्थेतच फवारणीची वेळ

यावर्षी राज्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला. ज्यामुळे अनेक भागांमध्ये मृग नक्षत्रातच शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. मृगाची पेरणी ही रोगराईमुक्त असे म्हटले जाते. मात्र, यावर्षी पेरणी झाल्यानंतर पावसाने उघडीप दिली. त्यातच ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन व इतर पिकावरील अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रामुख्याने ही अळी सोयाबीनची पाने कुरतडून खात आहे. ज्यामुळे आपले सोयाबीन पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची फवारणीसाठी लगबग सुरू असून, अवघ्या दहा ते पंधरा दिवसात पहिली फवारणी करावी लागत आहे. परिणामी, यंदाच्या हंगामात फवारणीवरील खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. ज्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले असून, फवारणी खर्चाबाबत चिंताग्रस्त आहेत.

मागील वर्षीच्या हंगामात सोयाबीन पिकाचे गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झाले. तर यंदा पावसाळा लवकर सुरु झाला. ज्यामुळे शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिली असून, ढगाळ वाटावरणामुळे सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकाचे जवळपास ३० ते ४० टक्के नुकसान करत आहे. ज्यामुळे सोयाबीन पिकाला यंदा लवकरच फवारणी घ्यावी लागली आहे. एका फरवणीसाठी जवळपास एकरी २००० रुपये इतका खर्च येत आहे.

– संतोष काळे, (शेतकरी) – तेर, उस्मानाबाद.

बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला आधीच भाव नाही. मात्र, शेतकऱ्यांनी यंदा चांगला पाऊस झाल्याने, शेतकऱ्यांनी आशेपोटी सोयाबीनची लागवड लवकरच पूर्ण केली. मात्र, गेले काही दिवस पावसाने ओढ दिल्याने, ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच औषधांचा खर्च देखील अधिक आहे. ज्यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे.

– अमोल नाईकवाडी, (शेतकरी) – तेर, उस्मानाबाद.

Web Title: Soybean borer infestation due to cloudy weather cost of spraying farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2024 | 05:38 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Soyabean Rate

संबंधित बातम्या

फणसकिंग ठरलेले रत्नागिरी येथील देसाई पितापुत्राची आधुनिक शेतीतील यशोगाथा; फणस शेतीतून कमावतात कोट्यवधी
1

फणसकिंग ठरलेले रत्नागिरी येथील देसाई पितापुत्राची आधुनिक शेतीतील यशोगाथा; फणस शेतीतून कमावतात कोट्यवधी

बजेट, उत्पादन, MSP पासून KCC पर्यंत; गेल्या ११ वर्षांत देशाच्या कृषी क्षेत्रात झाले महत्वाचे बदल
2

बजेट, उत्पादन, MSP पासून KCC पर्यंत; गेल्या ११ वर्षांत देशाच्या कृषी क्षेत्रात झाले महत्वाचे बदल

Mosoon Update : पेरणीची घाई करू नका : राज्य सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन
3

Mosoon Update : पेरणीची घाई करू नका : राज्य सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन

दुकानदारांनो सावधान! शेतकऱ्यांची फसवणूक पडेल महागात; कृषी विभागाकडून भरारी पथके तयार
4

दुकानदारांनो सावधान! शेतकऱ्यांची फसवणूक पडेल महागात; कृषी विभागाकडून भरारी पथके तयार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.