Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टोमॅटोच्या दरात 20 जुलैपासून घसरण होणार; वाचा… काय आहे नेमकं दर घसरणीचे कारण?

देशभरातील किरकोळ बाजारात शंभरी पार गेलेले टोमॅटो दर लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधून नवीन टोमॅटोची आवक सुरु होणार असल्याने, टोमॅटोच्या दरात ही घसरण होणार आहे. केंद्रीय ग्राहक आणि संरक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 18, 2024 | 05:39 PM
टोमॅटोच्या दरात 20 जुलैपासून घसरण होणार; वाचा... काय आहे नेमकं दर घसरणीचे कारण?

टोमॅटोच्या दरात 20 जुलैपासून घसरण होणार; वाचा... काय आहे नेमकं दर घसरणीचे कारण?

Follow Us
Close
Follow Us:

देशभरात सध्या टोमॅटोच्या दराने शंभरी पार केली आहे. परिणामी, सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. तर सर्वसामान्यांना टोमॅटो देखील खरेदी करणे अवघड झाले आहे. मात्र, आता २० जुलैपासून देशभरातील टोमॅटोचे दर हळूहळू उतरणीला लागतील, अशी माहिती समोर येत आहे. प्रामुख्याने सध्याच्या घडीला महाराष्ट्रात टोमॅटो किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये इतक्या उच्चांकी दराने विकला जात आहे. अन्य राज्यांमध्ये देखील किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ८० ते १०० रुपये प्रति किलोदरम्यान असल्याचे पाहायला मिळत आहे.

का कमी होणार टोमॅटोचे दर?

मागील तीन आठवड्यांपासून टोमॅटोचे दर उच्चांकी पातळीवर स्थिर आहे. मात्र, आता टोमॅटोचे दर हळूहळू कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे दक्षिण भारतातील सर्वच राज्यांमधील टोमॅटोची आवक बाजारात सुरु झाली असून, येत्या काही दिवसांत या राज्यांमधून टोमॅटोची आवक आणखी वाढणार आहे. मागील दीड महिन्यापासून टोमॅटोची बाजारातील आवक प्रभावित झाली आहे. ज्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने, टोमॅटो दराने उसळी घेतली आहे.
(फोटो सौजन्य : istock)

‘या’ राज्यांमधून सुरु होणार आवक

सध्याच्या घडीला काही मोजक्या उत्तरेकडील राज्यांमधून बाजारात टोमॅटोची आवक होत आहे. मात्र, आता आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांसह महाराष्ट्रातील देखील अनेक भागांमध्ये आगाऊ लागवड झालेला टोमॅटो बाजारात येणार आहे. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश चिंतूर जिल्हा आणि कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन होते. ज्यामुळे आता या भागांमधून टोमॅटोची आवक सुरु होणार आहे. दरम्यान, मागील वर्षी याच कालावधीत किरकोळ बाजारात टोमॅटो १५० रुपये प्रति किलोपर्यंत विकला जात होता.

काय म्हटलंय ग्राहक आणि संरक्षण मंत्रालयाने?

केंद्रीय ग्राहक आणि संरक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, सध्याच्या घडीला राजधानी दिल्लीसह देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये टोमॅटो, कांदा आणि बटाटा यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील काही काळापासून या भाजीपाल्याच्या दरात झालेली मोठी वाढ कायम आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सध्याच्या घडीला राजधानी दिल्लीत ७५ रुपये प्रति किलो दराने टोमॅटो उपलब्ध होत आहे. तर मुंबई, महाराष्ट्र वगळता अन्य शहरांमध्ये देखील टोमॅटोचे दर काहीसे याच पातळीवर आहेत. मात्र, आता दक्षिणेकडील राज्यांमधून टोमॅटोची आवक सुरु होणार असून, २० जुलैपासून दर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Tomato prices to fall from july 20 arrivals will start from southern states

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2024 | 02:38 PM

Topics:  

  • Andhrapradesh
  • maharashtra

संबंधित बातम्या

Dharashiv News : बेंबळी जल जीवन मिशनमध्ये दोन कोटींचा अपहार? निकृष्ट कामामुळे गाव तहानलेलेच
1

Dharashiv News : बेंबळी जल जीवन मिशनमध्ये दोन कोटींचा अपहार? निकृष्ट कामामुळे गाव तहानलेलेच

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडला सुप्रीम दणका; जामीन अर्ज फेटाळला
2

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडला सुप्रीम दणका; जामीन अर्ज फेटाळला

एसटीचा उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त; दररोज दीड कोटीची तूट, अडचणीतून सावरण्यासाठी आता…
3

एसटीचा उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त; दररोज दीड कोटीची तूट, अडचणीतून सावरण्यासाठी आता…

Karjat News: कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण
4

Karjat News: कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.