
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट!
महाराष्ट्र हादरवूण सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार वाल्मिक कराडला यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. कराडने जामिनासाठी केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे, त्यामुळे त्यांची तुरुंगवासाची शिक्षा वाढणार आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. देशमुख यांच्या कुटुंबीयांनी खंडणी प्रकरणातून ही हत्या झाल्याचा आरोप केला होता. या घटनेने जिल्ह्यातील राजकारण्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचं चौकशीदरम्यान समोर आलं त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
घटना घडल्यापासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे त्याच्या गावी टिंडा येथे आला आहे आणि तो जिवंत आहे असा दावा करण्यात आला. संतोष देशमुखचा भाऊ धनंजय देशमुखने संबंधित माहिती पोलिसांना दिली. कृष्णा आंधळे हा तीनदा गावात येऊन गेल्याचा दावा त्यांनी केला. तो मोबाईल वापरत नसल्याने त्याचे लोकेशन काढणे कठीण जात असल्याचे म्हटले जाते. पण मग पोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्क कामी येत नसल्याचा आरोपही होत आहे.
वाल्मिक कराड हे परळी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. गेल्या दहा वर्षांपासून ते परळी मतदारसंघाच्या राजकीय व्यवस्थापनाचे प्रभारी आहेत. धनंजय मुंडे राजकारणात आल्यापासून कराड त्यांच्यासाठी सावलीसारखे आहेत. कराड हे जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि सामाजिक कार्यक्रमांवर देखरेख करतात. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्यांनी जवळजवळ जिल्हा चालवला. त्यांना पालकमंत्री म्हणून खूप आवड होती. विशेष म्हणजे, वाल्मिक कराड यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) प्रमुख नेते आहेत. हा त्यांचा तिसरा मंत्रीपदाचा कार्यकाळ आहे. यावेळी त्यांना अन्न पुरवठा खाते देण्यात आले आहे.