Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात! शिक्षक समायोजन प्रक्रिया तत्काळ स्थगित करण्याची मागणी

नवीन संच मान्यता निकषांमुळे ग्रामीण, आदिवासी आणि शहरी लहान शाळांवर बंद होण्याचा धोका निर्माण झाल्याने हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आल्याचा इशारा शिक्षक संघटनेने दिला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 26, 2025 | 08:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • शिक्षक समायोजन प्रक्रिया तत्काळ स्थगित करण्याची मागणी
  • २० नोव्हेंबर रोजी जिल्हा आणि विभागीय स्तरावर शिक्षक समायोजन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश
  • अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात
राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील लहान आणि कमी पटसंख्येच्या शाळांवर नवीन संच मान्यता निकषांचे मोठे संकट ओढवले असून, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षणच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने या स्थितीबाबत गंभीर इशारा देत शिक्षक समायोजन प्रक्रिया तत्काळ स्थगित करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पाचवी आठवी शिष्यवृत्तीच्या परीक्षा लांबणीवर! जुना नियम पुन्हा लागू, परीक्षा रचनेत मोठा बदल

शासनाने १५ मार्च २०२४ रोजी जारी केलेले नवीन संच मान्यता निकष ग्रामीण, आदिवासी तसेच शहरी झोपडपट्टी आणि स्थलांतरित कामगारांच्या वस्त्यांतील लहान शाळांसाठी प्रतिकूल ठरत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात विद्यार्थी दूरच्या शाळेत जाण्यासाठी संघर्ष करत असताना, शहरी भागातील भाड्याच्या इमारतींमधील लहान शाळादेखील बंद होण्याच्या भीतीत आहेत. या परिस्थितीमुळे गोरगरीब आणि वंचित विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होण्याचा गंभीर धोका वाढत आहे.

उच्च न्यायालयाच्या अलीकडील आदेशानंतर शिक्षण संचालकांनी २० नोव्हेंबर रोजी जिल्हा आणि विभागीय स्तरावर शिक्षक समायोजन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ५ डिसेंबर आणि १९ ते २२ डिसेंबर या दोन टप्प्यांतील ही प्रक्रिया सध्या मोठा ताण निर्माण करत असून, बोर्ड परीक्षांच्या अगदी तोंडावर शिक्षकांच्या बदल्या, नवीन नियुक्त्या आणि वर्ग व्यवस्थापनातील गोंधळ यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष तानाजी कांबळे यांनी स्पष्ट केले की, “नवीन निकष हे लहान शाळांच्या अस्तित्वावरच घाला घालणारे आहेत. ग्रामीण तसेच शहरी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवणारी ही प्रक्रिया तात्काळ थांबवली पाहिजे. विद्यार्थ्यांचा हक्क सुरक्षित ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे.”

मुंबईतील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत मुंबई पश्चिम विभागाचे संघटक जमील म्हणाले, “मुंबईसारख्या महानगरातही अनेक शाळा अत्यल्प जागेत व स्थलांतरित वस्त्यांमध्ये चालतात. नवीन निकषांमुळे या शाळांनाही मोठा फटका बसणार असून, अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येईल.”

IIT मुंबईचा ‘प्रोजेक्ट आऊटरीच’ पायलट प्रोजेक्ट सुरू! अनेक सोयी-सुविधांचे लाभ लक्षात घेऊन, उभारली जातेय लॅब

एकूणच, नवीन संच निकष आणि सुरू असलेली शिक्षक समायोजन प्रक्रिया यामुळे राज्यभरातील लहान शाळांचे अस्तित्व धोक्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील सातत्य बिघडण्याचा धोका अधिक गंभीर बनला आहे. संघटनेच्या या मागणीमुळे आगामी काळातील शैक्षणिक धोरणावर सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Demand to immediately suspend teacher adjustment process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 08:02 PM

Topics:  

  • Career

संबंधित बातम्या

Indian Railways: RRB Group D 2026 भरतीसाठी अर्जाची मुदत वाढली; अंतिम तारीख काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
1

Indian Railways: RRB Group D 2026 भरतीसाठी अर्जाची मुदत वाढली; अंतिम तारीख काय? जाणून घ्या सविस्तर माहिती

India Post GDS Result 2026:इंडिया पोस्ट कधी जाहीर करणार पहिली मेरिट लिस्ट? जाणून घ्या अपडेट…
2

India Post GDS Result 2026:इंडिया पोस्ट कधी जाहीर करणार पहिली मेरिट लिस्ट? जाणून घ्या अपडेट…

Middle East मध्ये CBSE च्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, समोर आले बनावट सर्क्युलरचे सत्य
3

Middle East मध्ये CBSE च्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, समोर आले बनावट सर्क्युलरचे सत्य

पेपरमध्ये खुणा, तर मानला जाईल गुन्हा! परीक्षेत्तर गैरमार्गांवर कडक कारवाई; बोर्डाने व्हिडीओद्वारे जारी केली ‘शिक्षासूची’
4

पेपरमध्ये खुणा, तर मानला जाईल गुन्हा! परीक्षेत्तर गैरमार्गांवर कडक कारवाई; बोर्डाने व्हिडीओद्वारे जारी केली ‘शिक्षासूची’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.