Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळा वाचविण्यासाठी सर्व एकवटले! शाळा व्यवस्थापन ताब्यात घेण्याचा आरोप

महिला उद्योग मंडळ, रसायनी संचलित प्राथमिक शाळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शाळा वाचविण्यासाठी पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी व सामाजिक संस्था एकवटल्या आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 31, 2025 | 06:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राकेश खराडे: महिला उद्योग मंडळ, रसायनी यांच्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळेच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत शाळा वाचविण्यासाठी पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी व विविध सामाजिक संस्था एकवटल्या आहेत. कोणत्याही दबावाला बळी न पडता शाळा सुरूच ठेवून विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करू, असा ठाम निर्धार करण्यात आला आहे. शाळा व संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असे स्पष्ट मत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सरोजिनी साजविन यांनी पत्रकार परिषदेत मांडले. महिला उद्योग मंडळाची प्राथमिक शाळा पराडे-मोहपाडा येथे असून ती बेकायदेशीर असल्याचा आरोप सोशल मीडियावरून पसरविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. ३१) पालक, माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व संस्थांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन शाळेची सविस्तर पार्श्वभूमी मांडण्यात आली.

Chh Sambhajinagar News : दोन तपानंतर भेटले शालेय मित्र-मैत्रिणी! भावनिक प्रतिसाद, आठवणींना मिळाला उजाळा

सरोजिनी साजविन यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल्स (एचओसी) कंपनीची स्थापना १९६५ मध्ये झाली. स्थानिक प्रकल्पग्रस्त व परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी १९८५ च्या सुमारास शाळा सुरू करण्यात आली. कंपनीतील महिला व पुरुष अधिकाऱ्यांच्या पत्नींनी एकत्र येत १९७८-७९ मध्ये महिला उद्योग मंडळाची स्थापना केली. त्यानंतर कंपनीच्या निवासी इमारतीत लहान मुलांसाठी शिशु वर्ग सुरू करण्यात आला. एचओसी व्यवस्थापनानेच ही जागा उपलब्ध करून दिली होती.

पराडे आदिवासी वाडीतील आदिवासी मुलांसाठी कोणतीही शैक्षणिक सोय नसल्याने कंपनीने दोन खोल्या बांधून त्याठिकाणी शाळा सुरू केली. मात्र शाळेला मान्यता नसल्याने पुढील शिक्षणासाठी दाखले देताना अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे १९९७-९८ मध्ये महिला उद्योग मंडळाची नोंदणी करून शाळेला अधिकृत मान्यता घेण्यात आली. त्या काळात शिक्षकांचे वेतन, विद्यार्थ्यांचे कपडे व खाऊ याचा खर्च कंपनीकडून केला जात होता. सन २००० नंतर कंपनीची मदत हळूहळू बंद झाली. आर्थिक अडचणींमुळे फी भरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली. शिक्षणाचा दर्जा चांगला असल्याने विद्यार्थीसंख्या वाढत गेली. २०१४-१५ मध्ये आठवीच्या वर्गाला मान्यता मिळाली. सध्या प्राथमिक विभागात ८०३, शिशु वर्गात ५१० असे एकूण १,३५३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रसायनी-मोहपाडा-खालापूर परिसरात ही शाळा मराठी माध्यमाची दर्जेदार शाळा म्हणून ओळखली जाते.

भरतीबाबत नवा निर्णय! शिक्षक भरती व पदस्थापना प्रक्रिया राज्य परीक्षा परिषदेच्या ताब्यात

दरम्यान, एचओसी कंपनी बीपीसीएलकडे हस्तांतरित झाल्यानंतर अरुण गायकवाड यांनी शाळेची प्रगती करू असे सांगत पदभार स्वीकारला. मात्र नंतर किरकोळ त्रुटी दाखवत संस्थेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला, वयोवृद्ध महिला पदाधिकाऱ्यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. शाळेची इमारत धोकादायक असल्याच्या अफवा पसरवून ती अनाधिकृत ठरवण्याचा डाव असल्याचेही सांगण्यात आले. शाळेला पहिली ते सातवीसाठी ६० टक्के शिक्षक अनुदान असून केवळ आठ शिक्षकांनाच अनुदान मिळते. उर्वरित शिक्षक व कर्मचारी विनाअनुदानित आहेत. त्यामुळे मासिक ३०० ते ३५० रुपये फी घेण्यात येते. ही फी रीतसर पावती व ऑडिटसह घेतली जाते, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. यावेळी अनेक पालक, माजी विद्यार्थी, सामाजिक संस्था व कायदेतज्ज्ञांनी शाळा व्यवस्थापनाला पाठिंबा जाहीर केला. शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

Web Title: Everyone united to save the school accusations of taking over school management

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • Career
  • education

संबंधित बातम्या

इच्छाशक्तीला वयाचे बंधन नसते! वयाच्या १०५ व्या वर्षी चौथ्या इयत्तेची परीक्षा देऊन भागीरथी अम्मांनी रचला शिक्षणाचा नवा इतिहास
1

इच्छाशक्तीला वयाचे बंधन नसते! वयाच्या १०५ व्या वर्षी चौथ्या इयत्तेची परीक्षा देऊन भागीरथी अम्मांनी रचला शिक्षणाचा नवा इतिहास

CA होण्यासाठी वयाची कोणतीही अट आहे का? जाणून घ्या कोणत्याही वयात सीए बनण्याची संपूर्ण प्रक्रिया!
2

CA होण्यासाठी वयाची कोणतीही अट आहे का? जाणून घ्या कोणत्याही वयात सीए बनण्याची संपूर्ण प्रक्रिया!

NDA vs NA: NDA आणि NA मध्ये नेमका काय फरक आहे? सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी ही माहिती नक्की वाचा!
3

NDA vs NA: NDA आणि NA मध्ये नेमका काय फरक आहे? सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी ही माहिती नक्की वाचा!

Resume tips: रेझ्युमेवर फोटो लावावा की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला!
4

Resume tips: रेझ्युमेवर फोटो लावावा की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.