Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक भारत, श्रेष्ठ भारत…! स्वातंत्र्यादिनानिमित्त शाळेत वाचून दाखवा ‘हे’ सोपे भाषण, टाळ्यांचा होईल कडकडाट

संपूर्ण देशभरात १५ ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १५ ऑगस्टला भाषण करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाचे मुद्दे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 12, 2025 | 01:53 PM
स्वातंत्र्यादिनानिमित्त शाळेत वाचून दाखवा 'हे' सोपे भाषण

स्वातंत्र्यादिनानिमित्त शाळेत वाचून दाखवा 'हे' सोपे भाषण

Follow Us
Close
Follow Us:

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळेल. जगाचा इतिहासात १५ ऑगस्ट १९४७ चा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये कोरण्यात आला होता. याच दिवशी भारत ब्रिटीश राजवटीतून स्वतंत्र झाला. त्यामुळे १९४७ पासून सगळीकडे स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी शाळा, सरकारी कार्यलय आणि इतर अनेक ठिकाणी ध्व्ज रोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच शाळेमध्ये भाषण स्पर्धा किंवा वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. भाषण स्पर्धेत सहभाग घेतल्यानंतर नेमकं काय बोलावं? हे बऱ्याचदा सुचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १५ ऑगस्टला भाषण करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाचे मुद्दे सांगणार आहोत. या मुद्यांना अनुसरून भाषण केल्यास शाळेत सगळेच तुमचे कौतुक करतील.(फोटो सौजन्य – istock)

Independence day Quiz: स्वातंत्र्यदिनाविषयी १० प्रश्न, तुम्हाला किती उत्तरे माहिती?

१५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनावरील भाषण:

आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि येथे उपस्थित असलेले सर्व आदरणीय अतिथी आणि माझ्या प्रिय मित्रांनो… सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण येथे देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या आनंदात मग्न आहे. मित्रांनो, १५ ऑगस्ट हा शुभ दिवस भारताच्या राजकीय इतिहासात खूप महत्वाचा आहे. १५ ऑगस्ट हाच तो दिवस आहे जेव्हा देशाला ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या गुलामगिरीपासून मुक्ती मिळाली. ब्रिटिश राजवटीत देशातील जनतेवर खूप अत्याचार झाले. ब्रिटिश राजवटीच्या अत्याचारातून देशातील जनतेला मुक्त करण्यासाठी शेकडो स्वातंत्र्यसैनिकांनी आपले प्राण अर्पण केले. त्यामुळे हा दिवस त्या महान क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला स्मरण करण्याचा दिवस आहे, ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, खुदीराम बोस, चाफेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवले. इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली. हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढ्यात भाग घेतला. अनेक क्रांतिकारक जोखडातून हसत-हसत फासावर गेले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अखेर इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो तो दिवस म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ होय. म्हणूनच, हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे.

August Kranti Diwas: स्वातंत्र्याची शेवटची लढाई कशी झाली? ब्रिटिश राजवटीचा पाया हादरवणाऱ्या ‘भारत छोडो’ आंदोलनाचे खरे चित्र

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांनी, समाजसेवकांनी तसेच क्रांतीकारकांनी आयुष्य वाहिले. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मदनमोहन मालवीय, अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी कृपलानी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, रासबिहारी बोस, गोपाळ कृष्ण गोखले, बिपीनचंद्र पाल, लाला लजपतराय, केशवचंद्र सेन, अरविंद घोष, वासुदेव बळवंतरराव फडके, क्रांतीसिंह नाना पाटील, दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, बद्रुद्दिन तयैबजी, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास अशांचा उल्लेख केला जातो. ही यादी संपणार नाही कारण अशा नेत्यांसह प्रत्येक भारतीय व्यक्तीही या लढ्यात उतरला होता म्हणूनच आपण स्वातंत्र्य मिळवले.दुसरीकडे बंकिम चन्‍द्र चटर्जी यांनी लिहलेले ‘वंदे मातरम’ हे प्रत्येकामध्ये स्फुरण चढवत होते. या गीताचे स्थान ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताच्या बरोबरीचे आहे. हे गाणे स्वातंत्र्याच्या लढ्यात लोकांना मोठ्या प्रमाणात प्रेरणा देणारे होते. स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रत्येक क्रांतीकारकांच्या तोंडावर हे गीत होते.
वंदे मातरम्, वंदे मातरम्!
सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्,
शस्यश्यामलाम्, मातरम्!
वंदे मातरम्!

Web Title: Read this simple speech in school on independence day there will be thunderous applause

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 01:53 PM

Topics:  

  • Career
  • Independence Day
  • Independence Day Celebration

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही
1

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही

Indian Navy Job News : भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी, पगार ६३ हजार रुपये; कसे कराल अर्ज?
2

Indian Navy Job News : भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी, पगार ६३ हजार रुपये; कसे कराल अर्ज?

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
3

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी
4

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.