
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं प्रकरण काय?
मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचे नाव खुशबू गुप्ता असे आहे. उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अरविंद कुमार गुप्ता यांनी आपल्या मुलीचे लग्न हिमांशू गुप्ता याच्याशी लावून दिले होते. खुशबूचा पती, हिमांशू हा गुरुग्राममधील एका नामांकित कोचिंग सेंटरमध्ये शिक्षक म्हणून काम करतो आणि गेल्या दोन वर्षांपासून सेक्टर ३९ मधील एका भाड्याच्या घरात खुशबूसोबत राहत होता. लग्नानंतर लगेचच हिमांशू, त्याची आई आणि बहीण यांनी अतिरिक्त हुंड्याची मागणी करत खुशबूचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली.
३ ऑगस्ट रोजी खुशबूने आपल्या वडिलांना फोन केला होता. तिने फोन करून सांगितले की हिमांशूने तिला जबर मारहाण केली आहे. त्याच रातराणी केव्हा खुशबूच्या कुटुंबीयांनी तिच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या सासरच्या मंडळींनी सांगितले की खुशबूची प्रकृती अचानक खालावली. तिला रुग्णालयात घेऊन जात आहेत. त्यानंतर थोड्याच वेळात खुशबूचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांना देण्यात आली.
पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत खुशबूच्या वडिलांनी हिमांशू, त्याची आई सुनीता गुप्ता आणि बहीण अपराजिता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. लग्नाच्या काही दिवसात हिमांशु, त्याची आई आणि बहिणीने अतिरिक्त हुंड्याची मागणी करत खुशबूचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली अशी तक्रार खुशबूच्या वडिलांनी केली.
गुन्हा दाखल
त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, सदर पोलीस ठाण्यात पती, सासू आणि नणंद यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे. डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण काय आहे हे स्पष्ट होईल. एक विशेष पोलीस पथक आरोपी पती हिमांशू, सासू सुनीता आणि नणंद अपराजिता यांची चौकशी करत असून पुरावे गोळा केले जात आहेत असे पोलिसांनी सांगितले.
पुणे पोलीस अॅक्शन मोडवर; ड्रग्जविरोधात नवी रणनिती; पोलिस आयुक्तांनी दिले आदेश
Ans: तिच्या वडिलांना.
Ans: पती, सासू आणि नणंद.
Ans: शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) अहवालाची.